शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

माहिती आयोगाकडे ४९ हजार ‘अपिल’ प्रलंबित; पाच वर्षांच्या तुलनेत वाढली प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 4:45 AM

जानेवारी २०१९ मध्ये राज्य माहिती आयोगाकडे आठ खंडपीठांमध्ये ३९ हजार ३१५ प्रकरणे प्रलंबित होती.

- योगेश पांडेनागपूर : राज्य माहिती आयोगाकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये गेल्या वर्षभरात वाढ झाली आहे. डिसेंबर २०१९ अखेरीस आयोगाकडे तब्बल ४९ हजारांहून अधिक द्वितीय अपिल प्रलंबित होते. वर्षभरातच प्रलंबित अपिलांची टक्केवारी २५ टक्क्यांहून अधिक वाढली आहे.जानेवारी २०१९ मध्ये राज्य माहिती आयोगाकडे आठ खंडपीठांमध्ये ३९ हजार ३१५ प्रकरणे प्रलंबित होती. वर्षभरात आयोगाकडे ४५ हजार ७२ द्वितीय अपिले आली तर या कालावधी २९ हजार ५ अपिले निकाली काढण्यात आली. उर्वरित अपिले ही दुसऱ्या खंडपीठांकडे वर्ग करण्यात आली. २०१९ च्या अखेरीस प्रलंबित अपिलांची संख्या ४९ हजार ३८५ वर पोहोचली. वर्षभरात प्रलंबित प्रकरणांमध्ये तब्बल १० हजार ७० ने वाढ झाली.राज्य माहिती आयोगाचे मुख्यालय मिळून एकूण आठ विभाग असून प्रत्येक ठिकाणी माहिती आयुक्तांचे पद आहे.पूर्णवेळ आयुक्त नाहीतराज्य माहिती आयोगाच्या आठही कार्यालयांपैकी चार ठिकाणी पूर्णवेळ आयुक्त नसल्याचे चित्र आहे. केवळ मुख्यालय (सुमित मलिक), बृहन्मुंबई (सुनील पोरवाल), कोकण (के.एल. बिष्णोई), अमरावती (संभाजी सरकुंडे) येथे पूर्णवेळ माहिती आयुक्त आहेत. नागपूर ही राज्याची उपराजधानी असतानादेखील येथे पूर्णवेळ आयुक्त नाहीत ही आश्चर्याची बाब असल्याचे मत माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.पुण्यात १० हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबितराज्यात सर्वात जास्त प्रलंबित प्रकरणे पुणे कार्यालयांतर्गत आहेत. डिसेंबर २०१९ अखेरीस पुण्यामध्ये १२ हजार ६८७ प्रकरणे प्रलंबित होती. वर्षभरात पुण्यातील प्रलंबित प्रकरणांची संख्या ३ हजारांनी वाढली. अमरावती येथे ८ हजार ३८६ प्रलंबित होती. सर्वात कमी प्रलंबित अपिले नागपूर कार्यालयात २ हजार १७८ इतकी होती. याशिवाय बृहन्मुंबईत ४ हजार ४४५, कोकणात ३ हजार ७९७, औरंगाबादमध्े ५ हजार ३२१ प्रकरणे प्रलंबित होती.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र