शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

झुकझूक गाडीची धमाल, ८३ कोटींच्या उत्पन्नाने मालामाल

By नरेश डोंगरे | Updated: September 21, 2023 15:37 IST

कार, जीपसह ४८ हजार वाहनांनी केला रेल्वेने प्रवास

नागपूर : स्वत:ची कार, जीप तसेच अन्य वाहने आपल्याला पाहिजे त्या वेळी, पाहिजे त्या ठिकाणी पोहचवून देत असली तरी या वाहनांना ठिकठिकाणी पोहचवून देण्याची कामगिरी रेल्वेगाडी करते. मध्य रेल्वेने गेल्या पाच महिन्यात अशा प्रकारे कार, जीप, एम्बुलन्ससह वेगवेगळ्या ४८,५०० वाहनांना ठिकठिकाणी पोहचवून दिले आहे.

धावत्या जगात टिकून राहण्यासाठी आणि वेळीच पाहिजे त्या ठिकाणी पोहचविण्यासाठी स्वत:चे वाहन असणे आवश्यक आहे. प्रारंभी चैनीची आणि प्रतिष्ठेचे साधन मानले जाणारी कार, जीप आता दैनंदिन जीवनातील गरजेचे आवश्यक साधन बनले आहे. चैनीचे आणि प्रतिष्ठेचे साधन म्हणून मोजकी मंडळी कोट्यवधींची वाहने खरेदी करून वापरतात. तर, समाजातील मध्यमवर्गीय मंडळी दगदगीच्या आणि धावत्या जिवनात ऐनवेळी ताप नको म्हणून छोटे मोठे वाहन खरेदी करून स्वत:च्या प्रवासाची सोय करून घेतात. ही वाहने काही विशिष्ट ठिकाणीच निर्माण केली जाते. 

वाहन निर्माण (उत्पादन) करणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्या (उदा. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, मारुती उद्योग) आपली वाहने विविध शहरात पोहचवण्यासाठी रेल्वेची मदत घेतात. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, सोलापूर विभागातील दौंड आणि विलाड तसेच पुणे विभागातील खडकी, चिंचवड, मिरज आणि लोणी या ठिकाणाहून वाहतुकीसाठी मोटारींचे लोडिंग करण्यात येते. उपरोक्त रेल्वे यार्डातून १ एप्रिल ते १० सप्टेंबर २०२३ दरम्यान मध्य रेल्वेने विविध प्रकारच्या एकूण ४८, ५०० वाहनांची वाहतूक केली. त्यातून रेल्वेला ८२ कोटी, ७८ लाखांचा महसुल प्राप्त झाला.

वर्षभरात २१ कोटींची वाढ

१ एप्रिल २०२२ ते १० सप्टेंबर २०२२ या कालावधीतील रेल्वेने ऑटोमोबाईल्स कंपन्यांच्या वाहनांची वाहतूक करून ६१ लाख, ८१ कोटींचे उत्पन्न मिळवले होते. या वर्षी त्यात सुमारे २१ कोटींची अर्थात ३३ टक्के महसुलाची वाढ झाली आहे.

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे