शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

By मंगेश व्यवहारे | Updated: September 26, 2022 15:39 IST

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही

नागपूर : मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात राज्यात ० ते २० पटसंख्येच्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, अशी विचारणा केली आहे. या पत्राचा संदर्भ लक्षात घेतल्यास कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी सरकार आग्रही असल्याचे दिसून येते. असे झाल्यास जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ४४७ शाळा बंद होऊ शकतात. या शाळांची पटसंख्या ० ते २० च्या आत आहे.

१९९२ पर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कमी होता; परंतु ब्लॅक बोर्ड ऑपरेशन नंतर जवळपास ८०० शिक्षकांची भरती त्या दोन वर्षांत झाली. गाव तिथे शाळा ही सरकारची भूमिका होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा वाढल्या; पण २००७ पासून जि.प.च्या शाळेत शिक्षकांच्या भरती बंद झाल्या. गेल्या ५ वर्षांत सरासरी शिक्षकांच्या निवृत्तीची संख्या २०० ते २५० च्या जवळपास आहे. येणाऱ्या ५ वर्षांत आणखी ५०० च्या जवळपास शिक्षक निवृत्त होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात ६०० च्या जवळपास शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षकांच्या भरतीमुळे सरकारवर बोजा वाढतो, अशी सरकारची भूमिका असल्याने शिक्षक नसतील तर शाळा बंद पडू शकतात.

- शिक्षण हक्क कायद्याचा भंग ठरेल

कमी पटसंख्या हा निकष प्रमाण मानून शाळा बंद करणे म्हणजे तांडा, वाडी, वस्ती व आदिवासी क्षेत्रातील शाळा बंद करून गोरगरीब दलित व बहुजनांच्या बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ही बाब शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारी आहे. शिक्षणावर होणाऱ्या खर्चाशी याचा संबंध जोडणे ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यास अशोभनीय आहे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

- समायोजनाच्या माध्यमातून केल्या शाळा बंद

२००० साली जिल्हा परिषदेच्या १५७९ शाळा होत्या. २०२० मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या १५३५ वर आली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा प्रशासनाने शाळा समायोजनाच्या माध्यमातून बंद केल्या; पण शिक्षक भरती न केल्यास पुढच्या ५ ते १० वर्षात मोठ्या प्रमाणात शाळा बंद होऊ शकतात.

परसराम गोंडाणे, उपाध्यक्ष, कास्ट्राइब शिक्षक संघटना

त्याचबरोबर २ मे २०१२ पासून शासनाने शिक्षक भरतीला बंदी घातली आहे. २८ ऑगस्ट २०१५ शासन निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले नाही. सरकार आकड्यांचा हवाला देऊन शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- सुधाकर अडबाले, सरकार्यवाह, वि.मा. शि. संघ

शिक्षण देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असताना २० पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शासन शिक्षणाप्रती उदासीन असल्याचा संदेश जाईल.

- बाळा आगलावे, राज्य सचिव, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघ

सरकारने शिक्षकांना अनुत्पादक समजले आहे. शिक्षण व आरोग्यावर खर्च करणे ही नैतिक जबाबदारी सरकारची आहे.

- शरद भांडारकर, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना

तालुकानिहाय २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या

तालुका - शाळांची संख्या

  • नागपूर - ३३
  • कामठी - १३
  • हिंगणा - ३४
  • नरखेड - ३९
  • काटोल - ५१
  • कळमेश्वर - २५
  • सावनेर - ३९
  • पारशिवणी - २७
  • रामटेक - ३५
  • मौदा - २५
  • कुही - ४६
  • उमरेड - ४७
  • भिवापूर - ३३
टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूरSchoolशाळा