शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

...तर जिल्हा परिषदेच्या ४४७ वर शाळा होऊ शकतात बंद?

By मंगेश व्यवहारे | Updated: September 26, 2022 15:39 IST

० ते २० आहे पटसंख्या : शाळा बंद करण्यास सरकार आग्रही

नागपूर : मंत्रालयाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी शिक्षण आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात राज्यात ० ते २० पटसंख्येच्या शाळा किती आहेत, या शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर आहे, अशी विचारणा केली आहे. या पत्राचा संदर्भ लक्षात घेतल्यास कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यासाठी सरकार आग्रही असल्याचे दिसून येते. असे झाल्यास जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ४४७ शाळा बंद होऊ शकतात. या शाळांची पटसंख्या ० ते २० च्या आत आहे.

१९९२ पर्यंत जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा कमी होता; परंतु ब्लॅक बोर्ड ऑपरेशन नंतर जवळपास ८०० शिक्षकांची भरती त्या दोन वर्षांत झाली. गाव तिथे शाळा ही सरकारची भूमिका होती. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा वाढल्या; पण २००७ पासून जि.प.च्या शाळेत शिक्षकांच्या भरती बंद झाल्या. गेल्या ५ वर्षांत सरासरी शिक्षकांच्या निवृत्तीची संख्या २०० ते २५० च्या जवळपास आहे. येणाऱ्या ५ वर्षांत आणखी ५०० च्या जवळपास शिक्षक निवृत्त होणार आहे. सध्याच्या घडीला जिल्ह्यात ६०० च्या जवळपास शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. शिक्षकांच्या भरतीमुळे सरकारवर बोजा वाढतो, अशी सरकारची भूमिका असल्याने शिक्षक नसतील तर शाळा बंद पडू शकतात.

- शिक्षण हक्क कायद्याचा भंग ठरेल

कमी पटसंख्या हा निकष प्रमाण मानून शाळा बंद करणे म्हणजे तांडा, वाडी, वस्ती व आदिवासी क्षेत्रातील शाळा बंद करून गोरगरीब दलित व बहुजनांच्या बालकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आहे. ही बाब शिक्षण हक्क कायद्याचा भंग करणारी आहे. शिक्षणावर होणाऱ्या खर्चाशी याचा संबंध जोडणे ही बाब महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यास अशोभनीय आहे.

लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

- समायोजनाच्या माध्यमातून केल्या शाळा बंद

२००० साली जिल्हा परिषदेच्या १५७९ शाळा होत्या. २०२० मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या १५३५ वर आली आहे. कमी पटसंख्येच्या शाळा प्रशासनाने शाळा समायोजनाच्या माध्यमातून बंद केल्या; पण शिक्षक भरती न केल्यास पुढच्या ५ ते १० वर्षात मोठ्या प्रमाणात शाळा बंद होऊ शकतात.

परसराम गोंडाणे, उपाध्यक्ष, कास्ट्राइब शिक्षक संघटना

त्याचबरोबर २ मे २०१२ पासून शासनाने शिक्षक भरतीला बंदी घातली आहे. २८ ऑगस्ट २०१५ शासन निर्णयानुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची संख्या मोठी आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले नाही. सरकार आकड्यांचा हवाला देऊन शिक्षण व्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे.

- सुधाकर अडबाले, सरकार्यवाह, वि.मा. शि. संघ

शिक्षण देणे ही शासनाची नैतिक जबाबदारी असताना २० पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शासन शिक्षणाप्रती उदासीन असल्याचा संदेश जाईल.

- बाळा आगलावे, राज्य सचिव, महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक महासंघ

सरकारने शिक्षकांना अनुत्पादक समजले आहे. शिक्षण व आरोग्यावर खर्च करणे ही नैतिक जबाबदारी सरकारची आहे.

- शरद भांडारकर, सरचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक शिक्षकेतर सेना

तालुकानिहाय २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांची संख्या

तालुका - शाळांची संख्या

  • नागपूर - ३३
  • कामठी - १३
  • हिंगणा - ३४
  • नरखेड - ३९
  • काटोल - ५१
  • कळमेश्वर - २५
  • सावनेर - ३९
  • पारशिवणी - २७
  • रामटेक - ३५
  • मौदा - २५
  • कुही - ४६
  • उमरेड - ४७
  • भिवापूर - ३३
टॅग्स :Educationशिक्षणzp schoolजिल्हा परिषद शाळाnagpurनागपूरSchoolशाळा