शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

४० दिवस... अन् नक्षलवादाच्या सावटातून गडचिरोलीची मुक्ती ?

By राजेश शेगोकार | Updated: February 23, 2026 14:36 IST

Nagpur : साठच्या दशकाच्या उत्तरार्धात नक्षलबारी या छोट्याशा गावातून पेटलेली ठिणगी महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा अशा राज्यांत भडकत गेली.

राजेश शेगोकारनागपूर : साठच्या दशकाच्या उत्तरार्धात नक्षलबारी या छोट्याशा गावातून पेटलेली ठिणगी महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, बिहार, ओडिशा अशा राज्यांत भडकत गेली. महाराष्ट्रातील गडचिरोली हा जिल्हा घनदाट जंगलांमुळे नक्षल्यांसाठी सुरक्षित किल्ला मानला गेला अन् गेल्या चार दशकांपासून नक्षलवादाने येथील सामान्य नागरिक, आदिवासी कुटुंबे आणि विकासाची स्वप्ने सगळेच या संघर्षात भरडले गेले.

नक्षलवाद ही मध्य भारताला अशांत करणारी मोठी समस्या असल्याने तिचा बीमोड करण्यासाठी सरकारने बंदुकीसोबतच विकासाचे सूत्र हाती घेतले. गेल्या साडेतीन वर्षांत नव्या नक्षली भरतीचा अभाव हीच त्या प्रयत्नांची पावती आहे. सुरक्षा यंत्रणांच्या अंदाजानुसार देशात आता केवळ ३०० च्या आसपास सशस्त्र नक्षलवादी उरले आहेत.

गडचिरोलीत तर जेमतेम सहा. प्रभाकरच्या खात्म्यानंतर तेही छत्तीसगडमध्ये पळाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही आकडेवारीच नक्षलवादाच्या उतरत्या कळसाची साक्ष देते असून ३१ मार्चपर्यंत नक्षलमुक्त गडचिरोलीच्या दिशेने दमदार प्रवास सुरू असल्याचे प्रत्यंतरही देत आहे.

माओवादी चळवळीत भरकटलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी २२ पुनर्वसन योजना राबवल्या जात आहेत. बंदुकीऐवजी नांगर, औजार आणि रोजगाराची साधने त्यांच्या हातात देण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावोगावी रस्ते, पूल, शाळा, आरोग्य केंद्रे उभी राहत आहेत; उद्योगधंद्यांची चाके फिरू लागली आहेत. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य पोलिसांना आधुनिक शस्त्रसज्जता, तांत्रिक बळ आणि प्रभावी समन्वय दिल्याने कारवाया अधिक अचूक ठरत आहेत. गेल्या १५ महिन्यांत ४००हून अधिक नक्षलवादी ठार, याच कालावधीत ताराक्का, भूपतीसारख्या हार्डकोअर नक्षल्यांसह १५०हून अधिक नक्षल्यांनी केलेले आत्मसमर्पण अन् त्यानंतरची त्यांची बदललेली भूमिका या चळवळीलाच वास्तवाचे भान आले आहे याचे दर्शन घडविते.

नक्षलवादाविरोधात सुरू असलेली ही लढाई केवळ बंदुकीची नाही; ती विकास, विश्वास आणि वैचारिक प्रबोधनाचीही आहे. रस्ते, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांच्या माध्यमातून जेव्हा राज्य लोकांच्या दारी पोहोचते, तेव्हा बंदुकीची भाषा आपोआपच क्षीण होते. पुढील ४० दिवस निर्णायक आहेत. गडचिरोली 'नक्षलमुक्त' झाले, तर तो केवळ सुरक्षा यंत्रणा व प्रशासनाचाच विजय नसेल तो लोकशाहीवरील विश्वासाचा पुनर्जन्म ठरेल.

शेवटचे दोन बुरूज

आता देशाच्या सुरक्षा यंत्रणांचे संपूर्ण लक्ष दोन नावांवर केंद्रित झाले आहे. पहिले नाव म्हणजे चळवळीचा मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ गणपती आणि दुसरे म्हणजे मिशीर बेसरा ऊर्फ सागर. हे दोन नेते म्हणजे नक्षलवादाचे शेवटचे बुरूज मानले जात आहेत.

मुपाल्ला लक्ष्मण राव ऊर्फ 'गणपती'

तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यातील बिरपूर हे गणपतीचे मूळ गाव. गणपती हा एकेकाळी शाळेत शिक्षक होता. ७० च्या दशकात तो 'पीपल्स वॉर ग्रुप'मध्ये सामील झाला. २००४ मध्ये जेव्हा पीपल्स वॉर ग्रुपचे विलीनीकरण होऊन 'भाकपा (माओवादी)' संघटना स्थापन झाली, तेव्हा तो या संघटनेचा पहिला सरचिटणीस बनला. त्याच्यावर ३ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, सध्या पंचाहत्तरीत असलेला गणपती छत्तीसगडच्या दक्षिण बस्तर किंवा अबुझमाडच्या अतिदुर्गम जंगलात असल्याची शक्यता आहे.

मिशीर बेसरा ऊर्फ सागर ऊर्फ श्यामल

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील मिशीर बेसरा हा नक्षलवाद्यांच्या सर्वात शक्तिशाली 'पॉलीट ब्युरो'चा सदस्य आहे. संघटनेच्या 'सेंट्रल मिलिटरी कमिशन'वर त्याचे वर्चस्व आहे. तो तांत्रिकदृष्ट्या खूप प्रगत मानला जातो. बेसरावर झारखंड, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मिळून सुमारे १ कोटी रुपयांचे बक्षीस आहे. बेसरा हा प्रामुख्याने झारखंड-छत्तीसगड सीमेवरील 'बूढा पहाड' किंवा सारंडाच्या जंगलात वावरत असतो. सुरक्षा दलांनी 'ऑपरेशन ऑक्टोपस' राबवून त्याचे अनेक गड उद्ध्वस्त केले आहेत, तरीही तो अतिशय सावधगिरीने आपले स्थान बदलत असतो. तो गनिमीकाव्याचा तज्ज्ञ असल्याचे सांगितले जाते.

English
हिंदी सारांश
Web Title : Gadchiroli's freedom from Naxalism in 40 days? A hopeful outlook.

Web Summary : Gadchiroli aims to be Naxal-free by March 31st, with development initiatives and surrenders weakening the insurgency. Security forces target remaining leaders, Ganpati and Besra.
टॅग्स :nagpurनागपूरGadchiroliगडचिरोलीnaxaliteनक्षलवादी