शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

साखर व्यवसायाच्या नावावर ४० कोटीने फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 11:08 AM

Nagpur News साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ४० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीविरोधात आर्थिक शाखेत गुन्ह्याची नोंद झाली आहे.

ठळक मुद्देइतवारीतील अनेक व्यापाऱ्यांना गंडविले आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार

 

जगदीश जोशी

 लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : साखरेच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरपूर नफा मिळवून देतो, असे आमिष दाखवून व्यापाऱ्यांना ४० कोटी रुपयांचा चुना लावणाऱ्या टोळीविरोधात आर्थिक शाखेत गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी साखरेच्या दलालाला अटक केली आहे. तक्रारीच्या सव्वा वर्षानंतर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गांधीबाग निवासी ६२ वर्षीय दिलीप जैन धान्याचे व्यापारी आहे. २०१९ मध्ये आरोपी अमर खनवानी, पंकज सोमय्या, तुलसीदास सोमय्या व उमाकांत ऊर्फ उमेश सोमय्या जैन त्यांच्याकडे आले. त्यांनी स्वत:ला सोलापूरच्या गोकुल शुगर इंडस्ट्रीजचे सुपर स्टॉकिस्ट सांगून आमच्यासोबत व्यवसाय केल्यास भरपूर लाभ होईल, असे सांगितले. त्यांनी सांगितले की, गोकुल शुगर इंडस्ट्रीजमधून कमी किमतीत साखरेचा पुरवठा होतो, साखर विकून भरपूर नफा मिळू शकतो. जैन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये अमर खनवानी यांच्यासोबत ५० ते १०० टन साखरेचा व्यवहार केला. ज्यात त्यांना नफाही झाला. त्यामुळे जैन यांचा आरोपीवर विश्वास निर्माण झाला. ते खनवानी व सोमय्या यांच्या सांगण्यानुसार साखर खरेदी करू लागले. सोमय्या यांचे बाजारपेठेत नाव असल्याने जैन यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

खनवानी याने जैन यांची साखर एका मोठ्या ब्रॅण्डच्या डेअरी कंपनीला विकल्याचे सांगितले. जैन यांनी जेव्हा त्या कंपनीकडे विचारणा केली तेव्हा कळले की, खनवानी यानेही त्या कंपनीकडून साखर खरेदीसाठी पैसे घेतल्याचे लक्षात आले. जैन यांनी अमर खनवानी, सोमय्या परिवार व गोकुल शुगर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक दत्ता शिंदे यांनी सांगितल्यानुसार साखर खरेदी करण्यासाठी ४ कोटी ११ लाख रुपये गुंतविले होते. मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर आरोपी जैन यांना साखरेचा पुरवठा करण्यास अथवा पैसे परत करण्यास टोलवाटोलवी करीत होते. जैन यांच्याबरोबरच इतवारी व पूर्व नागपुरातील अनेक व्यापाऱ्यांनी आरोपींनी सांगितल्यानुसार गुंतवणूक केली होती. आरोपींनी व्यापाऱ्यांकडून ४० ते ५० कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. यासंदर्भात जैन यांनी २०२० मध्ये आर्थिक शाखेकडे तक्रार केली होती. परंतु, पोलिसांनी चौकशी फार गांभीर्याने केली नाही. त्यामुळे दोन आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविला. जैन यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे घटनेची तक्रार केली. त्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपी अमर खनवानी यांना अटक केली.

- आरोपींकडून धमकी, आत्महत्येचे नाटक

या फसवणुकीचा भंडाफोड झाल्यानंतर आरोपींनी पीडित व्यापाऱ्यावर दबाव निर्माण केला. एका आरोपीने आत्महत्येचे नाटक करून रुग्णालयात भरती झाला. तो पीडित व्यापाऱ्यालाच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्या प्रकरणात धमकी देऊ लागला. या प्रकरणात ज्या व्यापाऱ्यांनी रोख रक्कम दिली, त्यांनी चुप्पी साधल्याने सव्वा वर्षापूर्वी पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करू शकले नाही.

- २० ते २५ व्यापाऱ्यांना लावला चुना

सूत्रांच्या माहितीनुसार २० ते २५ व्यापाऱ्यांना आरोपींनी चुना लावला आहे. सव्वा वर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर व्यापारी तक्रार करण्यास पुढे येत नाही. यातील काही व्यापाऱ्यांना मूळ रक्कम मिळाली आहे. एका व्यापाऱ्याने गुंतवणुकीच्या बदल्यात संपत्तीचा व्यवहार केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी अमर खनवानी याला अटक केली आहे. अन्य आरोपींबाबत पोलिसांची भूमिका शिथिल दिसते आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी