शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता व पाणी कराचे ३४९ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:11 IST

नागपूर : थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर जमा व्हावा या उद्देशाने मनपा प्रशासनाने अभय योजना दोन महिने कालावधीसाठी ...

नागपूर : थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर जमा व्हावा या उद्देशाने मनपा प्रशासनाने अभय योजना दोन महिने कालावधीसाठी राबविली. या अभय योजनेतील कालावधीसह संपूर्ण आर्थिक वर्षात १५ फेब्रुवारीपर्यंत २१४.५४ कोटींचा मालमत्ता कर आणि १३५.१५ कोटींचा पाणी कर वसूल झाला आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी दिली.

विशेष म्हणजे, मागीलवर्षी अर्थात १५ फेब्रुवारी २०२० या तारखेपर्यंत १९७.५१ कोटी मालमत्ता कर वसूल झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १५ फेब्रुवारी रोजी १७ कोटींनी अधिक वसुली झाली आहे. पाणी कर मागील वर्षी अर्थात १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत १२१.१७ कोटी वसूल झाला होता. यावर्षी ही वसुली १३५.१५ कोटी इतकी आहे. जी मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी अधिक आहे.

थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी मनपा प्रशासनाने १५ डिसेंबरपासून अभय योजना जाहीर केली होती. यात १५ डिसेंबर २०२० ते २० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत मालमत्ता कर एकमुस्त भरल्यास शास्तीत ८० टक्के, तर २१ जानेवारी २०२१ ते १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास शास्तीत ५० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती, तर पाणी कर सवलतीसाठी २२ डिसेंबर २०२० रोजी अभय योजना जाहीर करण्यात आली होती. याअंतर्गत २२ डिसेंबर २०२० ते ३० जानेवारी २०२१ पर्यंत थकीत पाणी कर एकमुस्त भरल्यास शास्तीत १०० टक्के, तर ३१ जानेवारी ते २२ फेब्रुवारीपर्यंत एकमुस्त भरल्यास शास्तीत ७० टक्के सवलत जाहीर करण्यात आली होती.

पाणी करासाठी अखेरचे सहा दिवस

- मालमत्ता कर अभय योजनेची मुदत संपली असून पाणी कर अभय योजना संपण्यास अद्याप सहा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या योजनेचा लाभ घेण्याचे आणि थकीत मालमत्ता कर तातडीने भरण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.