शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

नागपूर जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना : थकीत बिलापोटी पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 11:56 PM

जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दुरावस्थेवरून स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच आगपाखड झाली. जि.प. सदस्य मनोज तितरमारे यांनी जिल्ह्यात किती शाळांमध्ये वीज नाही, असा सवाल सभागृहात केला असता, शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना असल्याचा खुलासा केला. प्रत्येक शाळा डिजिटल करण्यात येत आहे, शाळेत वीजपुरवठाच नसेल तर शाळा डिजिटल कशा होणार, असा संताप व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी चांगलीच आगपाखड केली.

ठळक मुद्देविरोधकांच्या सवालांनी सभापती संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेच्या शिक्षणाच्या दुरावस्थेवरून स्थायी समितीच्या बैठकीत चांगलीच आगपाखड झाली. जि.प. सदस्य मनोज तितरमारे यांनी जिल्ह्यात किती शाळांमध्ये वीज नाही, असा सवाल सभागृहात केला असता, शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात ३२२ शाळा विजेविना असल्याचा खुलासा केला. प्रत्येक शाळा डिजिटल करण्यात येत आहे, शाळेत वीजपुरवठाच नसेल तर शाळा डिजिटल कशा होणार, असा संताप व्यक्त करीत विरोधी सदस्यांनी चांगलीच आगपाखड केली.जि.प.च्या अखत्यारित येणाऱ्या १५३९ प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. १६ उच्च माध्यमिकच्या शाळा आहेत. यापैकी ८७८ शाळांचे डिजिटलायझेशन झाले आहे. या शाळांमध्ये डिजिटल क्लास रूम सुरू करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. एकिकडे शाळांचे डिजिटलायझेशन करुन विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढविण्याच्या प्रयत्न करण्यात येत आहे तर दुसरीकडे जिल्ह्यातील तब्बल ३२२ शाळांमधील वीज पुरवठा हा वीज बिलाचा भरणा केल्या नसल्याने मागील अनेक वर्षांपासून वीज जोडणीच कापण्यात आली आहे. यामुळे या शाळांचा कारभार अंधारात सुरू आहे. ही उर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातील शाळांची परिस्थिती आहे. यंदाच्या जि.प.च्या अर्थसंकल्पात अशाप्रकारे वीज जोडणी कापण्यात आलेल्या शाळांच्ये थकीत वीज देयक भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची तरतूद का केली नाही. या शाळांना अंधारातच ठेवणार का, असा सवाल सदस्यांनी केला. शाळेकडून वीज बिलासंदर्भात कुठलीही मागणी नाहीअनेक वर्षांपासून या शाळांची वीज कापण्यात आली आहे. गेल्यावर्षी २ लाखाचा निधी वीज बिलासाठी शाळांना वाटण्यात आला होता. यंदा वीज देयक भरण्यासंदर्भात कुठल्याच शाळेकडून प्रस्ताव आला नाही.उकेश चव्हाण, शिक्षण सभापती, जि.प.

टॅग्स :SchoolशाळाPower Shutdownभारनियमन