शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील मोठ्या कर्जदारांकडे २७ हजार कोटी थकीत !

By admin | Updated: July 20, 2014 01:21 IST

संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी,

नागपूर : संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव बी. एन. जगदीश शर्मा यांनी लोकमतशी बोलताना केली. बँकिंग विकासासाठी सरकारने गावागावांमध्ये शाखा सुरू कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.५० कोटीं लोकांचे बँकेत खाते नाहीशर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै १९६९ रोजी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. गेल्या ४५ वर्षांची तुलना केल्यास १९६९ मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या ८२६८ शाखा होत्या. २०१४ मध्ये ८५ हजार शाखा आहेत. ठेवी ८० लाख कोटी तर कर्जे ६२ लाख कोटींवर गेली आहे. सध्या बँकांचे ६० कोटी ग्राहक आहेत तर ५० कोटी लोकांचे बँकेत खाते नाही. ठेवींमध्ये ७५ टक्के रक्कम मध्यमवर्गीयांची आहे. त्यांची रक्कम बुडवायला निघालेल्या उद्योजकांची संपत्ती ताब्यात घेऊन त्यांना अटक करणे हाच एकमेव मार्ग आहे. पण त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची सरकारकडे इच्छाशक्ती नाही. महत्त्वपूर्ण पावले अजूनही उचललेली नाहीत. सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला परवानगी देत आहेत. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये लूट सुरू आहे. सामान्यांचा पैसा मोठे उद्योजक घशात टाकत असून सरकार देशातील बँकिंग क्षेत्रच उद्ध्वस्त करायला निघाल्याची टीका शर्मा यांनी केली. आणखी कर्ज वसुली लवाद हवेशर्मा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आणखी सहा कर्ज वसुली लवाद सुरू करण्याची घोषणा केली. एवढे पुरेसे नसून आणखी लवाद सुरू करण्याची गरज आहे. थकीत कर्जदारांची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. बँकांना ही कर्जे वसूल करणे शक्य नाही. न्यायालयात ८ लाख ४० हजार ६९१ प्रकरणे तर कर्ज वसुली लवादाकडे १३,४०८ प्रकरणे प्रलंबित आहेत. असोसिएशनने २०१३ मध्ये ५० मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रकाशित केली होती. त्यांच्याकडे जवळपास ४० हजार कोटींची थकीत कर्जे होती. मे २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत ४०० मोठ्या थकबाकीदारांकडे ७० हजार कोटींचे कर्ज थकीत होते.(प्रतिनिधी)नोंद नसलेली कर्जे ५ लाख कोटींच्या घरातएकूण थकबाकीदारांपैकी महाराष्ट्रात १०७६ कर्जदारांनी २६,९२० कोटींचे कर्ज चुकते केलेले नाही. अर्थात देशातील थकीत खातेदारांपैकी एकूण २५ टक्के खातेदार महाराष्ट्रात असून एकूण कर्जापैकी ३० ते ३३ टक्के रक्कम त्यांनी बुडविली आहे. अशांविरोधात बँकांनी दावे दाखल केले आहे. जाणीवपूर्वक कर्ज थकविणाऱ्या खातेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने बँकांसमोर संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार शहरातील शाखांमध्ये सर्वाधिक थकीत कर्जे आहेत. देशातील कर्जदारांची तर कागदोपत्री नोंद आहे. पण नोंद नसलेल्यांकडे ५ लाख कोटींच्या घरात कर्जे असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, २ लाख कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत.