शहरं
Join us  
Trending Stories
1
कोसळल्या धारा...! केरळमध्ये मान्सून दाखल झाला; महाराष्ट्रात कधी पोहोचणार...
2
"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर
3
'सन ऑफ सरदार' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५४ व्या वर्षी निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
4
पोर्शे प्रकरणातील डॉ. अजय तावरेचा आणखी एक कारनामा; रुबी हॉलच्या किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी
5
अरे देवा! तरुणाला चष्मा न लावणं पडलं महागात; ५०० रुपयांऐवजी गमावले तब्बल ९० हजार
6
ट्रम्पच्या 'त्या' निर्णयामुळे बेल्जियमच्या भावी राजकुमारीचे शिक्षण धोक्यात; कोण आहे एलिझाबेथ?
7
Hit And Run : विक्रोळीत भरधाव वेगाने येणारा टँकर दुचाकीवर धडकला; बाईकस्वाराचा जागीच मृत्यू, चालक फरार
8
'हयगय केली जाणार नाही', IG जालिंदर सुपेकरांचं नाव चर्चेत, अजित पवारांचा कारवाईचा इशारा
9
कोरोना का वाढतोय? लसीचा प्रभाव संपला की अन्य काही...; २०१९ मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलेला तेव्हा... 
10
Jyoti Malhotra : "ती गुप्तहेर नाही, फक्त एक..."; पाकिस्तानी बहीण हिरा बतूलने घेतली ज्योती मल्होत्राची बाजू
11
१०० ते १५० लोक, ६१ लॅपटॉप, ४१ मोबाईल, पुण्यात बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; सायबर फसवणुकीचे मोठे रॅकेट उघड
12
काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा झोपेतच मृत्यू, कोयाळ गाव हादरलं
13
Operation Sindoor : चार वार अन् शत्रू झाला लाचार! भारताची अशी एअर स्ट्राईक जिने पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं 
14
Corona Virus : चिंताजनक! देशात कोरोनाचा वेग वाढतोय, ९ महिन्यांचं बाळ पॉझिटिव्ह; कोणत्या राज्यात किती रुग्ण?
15
'धुरंधर' सिनेमाचं डोंबिवलीत होतंय शूट, माणकोली पूलावरुन संजय दत्तचा व्हिडिओ व्हायरल
16
Mumbai Mega Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी 'या' २ मार्गांवर मेगाब्लॉक, गाड्यांचं वेळापत्रकही बदलणार
17
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
18
Tarot Card: आगामी काळ प्रगतीचा, आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
20
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!

राज्यातील मोठ्या कर्जदारांकडे २७ हजार कोटी थकीत !

By admin | Updated: July 20, 2014 01:21 IST

संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी,

नागपूर : संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव बी. एन. जगदीश शर्मा यांनी लोकमतशी बोलताना केली. बँकिंग विकासासाठी सरकारने गावागावांमध्ये शाखा सुरू कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.५० कोटीं लोकांचे बँकेत खाते नाहीशर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै १९६९ रोजी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. गेल्या ४५ वर्षांची तुलना केल्यास १९६९ मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या ८२६८ शाखा होत्या. २०१४ मध्ये ८५ हजार शाखा आहेत. ठेवी ८० लाख कोटी तर कर्जे ६२ लाख कोटींवर गेली आहे. सध्या बँकांचे ६० कोटी ग्राहक आहेत तर ५० कोटी लोकांचे बँकेत खाते नाही. ठेवींमध्ये ७५ टक्के रक्कम मध्यमवर्गीयांची आहे. त्यांची रक्कम बुडवायला निघालेल्या उद्योजकांची संपत्ती ताब्यात घेऊन त्यांना अटक करणे हाच एकमेव मार्ग आहे. पण त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची सरकारकडे इच्छाशक्ती नाही. महत्त्वपूर्ण पावले अजूनही उचललेली नाहीत. सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला परवानगी देत आहेत. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये लूट सुरू आहे. सामान्यांचा पैसा मोठे उद्योजक घशात टाकत असून सरकार देशातील बँकिंग क्षेत्रच उद्ध्वस्त करायला निघाल्याची टीका शर्मा यांनी केली. आणखी कर्ज वसुली लवाद हवेशर्मा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आणखी सहा कर्ज वसुली लवाद सुरू करण्याची घोषणा केली. एवढे पुरेसे नसून आणखी लवाद सुरू करण्याची गरज आहे. थकीत कर्जदारांची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. बँकांना ही कर्जे वसूल करणे शक्य नाही. न्यायालयात ८ लाख ४० हजार ६९१ प्रकरणे तर कर्ज वसुली लवादाकडे १३,४०८ प्रकरणे प्रलंबित आहेत. असोसिएशनने २०१३ मध्ये ५० मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रकाशित केली होती. त्यांच्याकडे जवळपास ४० हजार कोटींची थकीत कर्जे होती. मे २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत ४०० मोठ्या थकबाकीदारांकडे ७० हजार कोटींचे कर्ज थकीत होते.(प्रतिनिधी)नोंद नसलेली कर्जे ५ लाख कोटींच्या घरातएकूण थकबाकीदारांपैकी महाराष्ट्रात १०७६ कर्जदारांनी २६,९२० कोटींचे कर्ज चुकते केलेले नाही. अर्थात देशातील थकीत खातेदारांपैकी एकूण २५ टक्के खातेदार महाराष्ट्रात असून एकूण कर्जापैकी ३० ते ३३ टक्के रक्कम त्यांनी बुडविली आहे. अशांविरोधात बँकांनी दावे दाखल केले आहे. जाणीवपूर्वक कर्ज थकविणाऱ्या खातेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने बँकांसमोर संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार शहरातील शाखांमध्ये सर्वाधिक थकीत कर्जे आहेत. देशातील कर्जदारांची तर कागदोपत्री नोंद आहे. पण नोंद नसलेल्यांकडे ५ लाख कोटींच्या घरात कर्जे असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, २ लाख कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत.