शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
IND W vs ENG W : इंग्लंडच्या मैदानात टीम इंडियानं रचला इतिहास; इथं पहिल्यांदाच जिंकली T20I मालिका
3
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
4
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
5
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
6
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
7
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
8
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
9
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
10
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
12
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
13
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
14
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
15
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
16
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
17
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
18
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
19
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
20
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?

राज्यातील मोठ्या कर्जदारांकडे २७ हजार कोटी थकीत !

By admin | Updated: July 20, 2014 01:21 IST

संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी,

नागपूर : संपूर्ण देशात सरकारी, खासगी आणि वित्तीय संस्थांचे ४०८५ मोठ्या कर्जदार उद्योजकांकडे ७०,३६७ कोटींचे कर्ज थकीत आहे. थकीत कर्जदारांवर फौजदारी कारवाई करून तात्काळ अटक करावी, अशी मागणी ईस्टर्न महाराष्ट्र बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे महासचिव बी. एन. जगदीश शर्मा यांनी लोकमतशी बोलताना केली. बँकिंग विकासासाठी सरकारने गावागावांमध्ये शाखा सुरू कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.५० कोटीं लोकांचे बँकेत खाते नाहीशर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै १९६९ रोजी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. गेल्या ४५ वर्षांची तुलना केल्यास १९६९ मध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या ८२६८ शाखा होत्या. २०१४ मध्ये ८५ हजार शाखा आहेत. ठेवी ८० लाख कोटी तर कर्जे ६२ लाख कोटींवर गेली आहे. सध्या बँकांचे ६० कोटी ग्राहक आहेत तर ५० कोटी लोकांचे बँकेत खाते नाही. ठेवींमध्ये ७५ टक्के रक्कम मध्यमवर्गीयांची आहे. त्यांची रक्कम बुडवायला निघालेल्या उद्योजकांची संपत्ती ताब्यात घेऊन त्यांना अटक करणे हाच एकमेव मार्ग आहे. पण त्यांच्याकडून रक्कम वसूल करण्याची सरकारकडे इच्छाशक्ती नाही. महत्त्वपूर्ण पावले अजूनही उचललेली नाहीत. सरकार कॉर्पोरेट क्षेत्राला परवानगी देत आहेत. बँकिंग इंडस्ट्रीमध्ये लूट सुरू आहे. सामान्यांचा पैसा मोठे उद्योजक घशात टाकत असून सरकार देशातील बँकिंग क्षेत्रच उद्ध्वस्त करायला निघाल्याची टीका शर्मा यांनी केली. आणखी कर्ज वसुली लवाद हवेशर्मा यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आणखी सहा कर्ज वसुली लवाद सुरू करण्याची घोषणा केली. एवढे पुरेसे नसून आणखी लवाद सुरू करण्याची गरज आहे. थकीत कर्जदारांची हजारो प्रकरणे प्रलंबित आहेत. बँकांना ही कर्जे वसूल करणे शक्य नाही. न्यायालयात ८ लाख ४० हजार ६९१ प्रकरणे तर कर्ज वसुली लवादाकडे १३,४०८ प्रकरणे प्रलंबित आहेत. असोसिएशनने २०१३ मध्ये ५० मोठ्या थकबाकीदारांची यादी प्रकाशित केली होती. त्यांच्याकडे जवळपास ४० हजार कोटींची थकीत कर्जे होती. मे २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या यादीत ४०० मोठ्या थकबाकीदारांकडे ७० हजार कोटींचे कर्ज थकीत होते.(प्रतिनिधी)नोंद नसलेली कर्जे ५ लाख कोटींच्या घरातएकूण थकबाकीदारांपैकी महाराष्ट्रात १०७६ कर्जदारांनी २६,९२० कोटींचे कर्ज चुकते केलेले नाही. अर्थात देशातील थकीत खातेदारांपैकी एकूण २५ टक्के खातेदार महाराष्ट्रात असून एकूण कर्जापैकी ३० ते ३३ टक्के रक्कम त्यांनी बुडविली आहे. अशांविरोधात बँकांनी दावे दाखल केले आहे. जाणीवपूर्वक कर्ज थकविणाऱ्या खातेदारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने बँकांसमोर संकट उभे राहिले आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या चार शहरातील शाखांमध्ये सर्वाधिक थकीत कर्जे आहेत. देशातील कर्जदारांची तर कागदोपत्री नोंद आहे. पण नोंद नसलेल्यांकडे ५ लाख कोटींच्या घरात कर्जे असल्याची माहिती आहे. रिझर्व्ह बँकेनुसार, २ लाख कोटी रुपयांची कर्जे थकीत आहेत.