शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

अमरावती विभागातील प्रकल्पात २७ टक्केच जलसाठा

By admin | Updated: July 20, 2014 01:11 IST

पावसाच्या महत्त्वाच्या १०० दिवसांपैकी अर्धाअधिक कालावधी संपला आहे. अमरावती विभागाची जून व जुलै महिन्याची पावसाची सरासरी २६७.८ मि. मी. एवढे अपेक्षित असताना केवळ ८१.६ मि.मी. पाऊस पडला.

खंडित पावसाचा परिणाम : गतवर्षीच्या तुलनेत २९ टक्क्यांनी कमीअमरावती : पावसाच्या महत्त्वाच्या १०० दिवसांपैकी अर्धाअधिक कालावधी संपला आहे. अमरावती विभागाची जून व जुलै महिन्याची पावसाची सरासरी २६७.८ मि. मी. एवढे अपेक्षित असताना केवळ ८१.६ मि.मी. पाऊस पडला. त्यामुळे ९ मोठे, २३ मध्यम व ४१७ लघु प्रकल्पातील जलस्तर कमी झाला आहे. सद्यस्थितीत सर्व जलाशयात केवळ ८६२ दशलक्ष घनमीटर एवढा पाण्याचा साठा आहे. प्रकल्पांच्या संचय पातळीच्या केवळ २८ टक्के हा जलसाठा आहे. पावसाळ्यात जून व जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस पडतो. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा पूर्ण संचय पातळीपेक्षा अधिक असतो. मागील वर्षी १८ जुलैमध्ये या प्रकल्पांत १६७७ दलघमी जलसाठा होता. पूर्ण संचय पातळीच्या तो ५७ टक्के होता. यंदा मात्र केवळ ८१५ दशलक्ष घनमीटर एवढाच साठा आहे. हे प्रमाण २८ टक्के आहे. खंडित पावसामुळे २३ मध्यम व ४१७ मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील जलस्तर कमी झालेला आहे. मात्र पावसाळ्याचे अजून दोन महिने शिल्लक असल्याने ही तूट भरून येण्याची आशा आहे. पण सरासरीपेक्षा कमी पावसाची अशीच परिस्थिती राहिल्यास अकोला, वाशीम व बुलडाणा जिल्ह्यात पाण्यासाठी हाहाकार माजण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)