शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
3
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
4
"मराठी 'not welcome' म्हणणार्‍यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
5
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
6
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
7
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
8
भन्साळींच्या 'हीरामंडी'त चुकाच चुका! सोनाक्षीच्या हातातील पेपरमध्ये 'कोरोनाच्या बातम्या'
9
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
10
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
11
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
12
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
13
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
14
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
15
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
16
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
17
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
18
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
19
१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!
20
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?

किसान रेल्वेमुळे जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 4:48 PM

गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. यात एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला असून किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले.

ठळक मुद्देपहिली ऑरेंज किसान रेल्वे दिल्लीला रवाना : २०० टन संत्रा पाठविला

नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी किसान रेल्वे सुरू केली आहे. किसान रेल्वेची पहिली फेरी बुधवारी २०० टन संत्रा घेऊन आदर्शनगर दिल्लीला रवाना झाली.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिझनेस डेव्हलपमेंट युनिटच्या अथक परीश्रमाने गोधनी ते आदर्शनगर दिल्लीपर्यंत पहिली किसान रेल्वे पाठविण्यात आली. या किसान रेल्वेचा फायदा काटोल, नरखेड, वरुड आणि मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथील शेतकऱ्यांना झाला. या किसान रेल्वेत एकूण २०० टन संत्रा पाठविण्यात आला. किसान रेल्वेच्या पहिल्याच फेरीतून रेल्वेला १ लाख ९८ हजार ४५२ रुपयांचा महसुल मिळाला. तर शेतकऱ्यांना ९७ हजार २८२ रुपयांचे अनुदान मिळाले. ही किसान रेल्वे प्रत्येक बुधवारी गोधणी ते आदर्शनगर दिल्ली आणि प्रत्येक शनिवारी वरुड ते शालीमार धावणार आहे.

मागील वर्षी रेल्वेला मिळाले २.५ कोटी रुपये

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात २०२० मध्ये किसान रेल्वे चालविण्यास सुरुवात झाली. मागील वर्षीही शेतकऱ्यांनी किसान रेल्वेला भरघोस प्रतिसाद दिला होता. मागील वर्षी २९ किसान रेल्वेच्या माध्यमातून एकुण ७५०० टन संत्र्याची वाहतुक करण्यात आली होती. यातील १८ किसान रेल्वे शालीमारला, तर ११ किसान रेल्वे आदर्शनगर दिल्ली येथे पाठविण्यात आल्या होत्या. यात व्यापारी आणि शेतकऱ्यांना १.५ कोटी रुपयांचे थेट अनुदान मिळाले होते. तर रेल्वेलाही २.१५ कोटी रुपयांचा महसुल किसान रेल्वेच्या माध्यमातून मिळाला होता.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीagricultureशेती