शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘प्लेसमेन्ट’मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 11:41 IST

अभियांत्रिकीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राकडून मागणी वाढत आहे. २०१५-१६ सालाच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेन्टची टक्केवारी वाढली असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देसात वर्षांतील चढता आलेखकोरोनाच्या सावटातदेखील ४३ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या हाती रोजगाराचे पत्र

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २०१० सालानंतर रोजगार मिळत नसल्याच्या कारणांमुळे अभियांत्रिकीच्या प्रवेशांमध्ये घट दिसून येत होती. मात्र मागील सहा वर्षांत स्थिती बरीच बदलताना दिसून येत आहे. अभियांत्रिकीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राकडून मागणी वाढत आहे. २०१५-१६ सालाच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांच्या प्लेसमेन्टची टक्केवारी वाढली असल्याचे चित्र आहे. सात वर्षांत आकडा १३ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. कोरोनाच्या सावटातदेखील २०१९-२० मध्ये समाधानकारक आकडा दिसून आला हे विशेष.

अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतरदेखील विद्यार्थ्यांना रोजगार मिळत नसल्याची ओरड होती. २०१३-१४ साली राज्यभरात केवळ ३२.८२ टक्के विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्लेसमेन्ट झाले होते. त्यामुळे निराशेचेदेखील वातावरण होते. मात्र अभियांत्रिकी महाविद्यालयांनी कात टाकली व विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढावे यावरदेखील भर दिला. शिवाय उद्योगक्षेत्रातूनदेखील मागणी वाढली.

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आकडेवारीनुसार २०१३-१४ साली राज्यातील ३७३ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून ८९ हजार ५३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्यापैकी २९ हजार ३८३ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले होते. त्यानंतर लगेच रोजगार मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा आकडा वाढत राहिला. मात्र टक्केवारी काही वर्षे थोडी घसरली होती. २०१८-१९ साली राज्यातील ३६३ अभियांत्रिकी महाविद्यालयांतून १ लाख १३ हजार ६८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात नियमित तसेच बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांचादेखील समावेश होता. त्यातील ४६ हजार ७२९ विद्यार्थ्यांना प्लेसमेन्ट मिळाले. २०१९-२० मध्ये महाविद्यालयांतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेबाबत अद्यापही चित्र स्पष्ट झालेले नाही.

या विद्यार्थ्यांचे प्रवेश २०१५-१६ साली झाले होते व ती संख्या सुमारे ८८ हजार इतकी होती. कोरोनामुळे या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधारणेला किती वाव असेल हेदेखील गुलदस्त्यात आहे. मात्र तरीदेखील आतापर्यंत राज्यभरातील ३५४ महाविद्यालयांतील ४३ हजार ७२५ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झालेले आहे.

शासकीय महाविद्यालयांतदेखील टक्केवारीत वाढराज्यात २०१३-१४ मध्ये १० शासकीय महाविद्यालये होती. त्यावर्षी तेथील ४२.२९ (१,६७८) टक्के विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले होते. २०१८-१९ मध्ये ही संख्या १५ वर गेली व ४३.२६ टक्के (१,६६९) विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सुरू असताना किंवा संपल्यावर लगेच रोजगार मिळाला. २०१९-२० मध्ये १ हजार ५५९ विद्यार्थ्यांचे प्लेसमेन्ट झाले. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र