शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

नागपूर शहरात १०८७ वीज खांब धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 8:43 PM

शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.

ठळक मुद्देअपघाताचा धोका : महावितरण-मनपा अधिकाऱ्यांची टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात रस्त्यावर असलेले तब्बल १०८७ विजेचे खांब धोकादायक आहेत. हे खांब हटविण्यासाठी शहरातील वीज ग्राहकांनी २०११ ते २०१४ दरम्यान प्रत्येक युनिट मागे ९ पैसे दिलेले आहेत. परंतु आर्थिक परिस्थिती खालावल्याने मनपाला खांब हटविण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकले नाही. दुसरीकडे वीज वितरण कंपनी महावितरणने आपले हात झटकले आहे. परिणामी शहरातील वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे.२००१-०२ मध्ये शहरात आयआरडीपीअंतर्गत रस्त्यांचे रुंदीकरण करण्यात आले. यादरम्यान अनेक वीज खांब रस्त्यांच्या मध्ये आले. मध्ये मनपा व महावितरणने संयुक्तपणे खांब हटविण्यासाठी सर्वे केला. २०११ मध्ये ९१.५ कोटीचे इस्टीमेट तयार झाले. मनपा व महावितरण दोघेही अर्धा अर्धा खर्च उचलणार होते. महावितरणने विद्युत नियामक आयोगाच्या माध्यमतून आपला हिस्सा देण्यासाठी तीन वर्षापर्यंत वीज बिलाच्या माध्यमतून वसुली केली. दुसरीकडे मनपाने केवळ २०.५ कोटी रुपये खर्च केले. ४१ कोटीचे काम होताच खांब हटविण्याचे काम बंद करण्यात आले. ५० कोटीचे काम प्रशासनिक कामात अडकले. आता मनपा असा दावा करीत आहे की, त्यांना सरकारकडून अनुदान मिळाले आहे आणि महावितरणला इस्टीमेट तयार करण्यास सांगण्यात आले आहे.महावितरणनेही सांगितले आहे की, इस्टीमेट तयार केले जात आहे. दुसरीकडे रस्त्यांच्या मध्ये आलेल्या वीज खांबांची यादी वीज वितरण फ्रेंचायसी एसएनडीएलने महावितरणला सोपविली असून, ते हटविण्यासाठी मदत मागितली आहे. मनपा व महावितरणच्या एकूणच कामाची गती पाहता खांब हटविण्याचे काम तातडीने होणार नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरण