शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित पक्षी यंदा येतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 06:05 IST

ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.

ठळक मुद्देवणवे आणि हवामान बदलाचा काय परिणाम होईल?

लोकमत न्यूज नेटवर्क

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अँमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग आणि हवामान बदल. या सगळ्यांचा खूप मोठा फटका बसला तो वन्यप्राणी, कीटक आणि नैसर्गिक जैवसंपदेला.पक्ष्यांना; त्यातही स्थलांतरित पक्ष्यांनाही त्याची खूप मोठी झळ सोसावी लागली. अमेरिका आणि इतर काही देशांत तर अनेक पक्षी रस्त्यातच मरून पडल्याचं दिसून आलं.पण सगळ्याच स्थलांतरित पक्ष्यांना याचा फटका बसला किंवा बसेल का? भारतात काय परिस्थिती असेल?याचसंदर्भात बीएनएसचे संचालक संजय करकरे यांचं म्हणणं महत्त्वाचं आहे.ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.पण प्रत्येक स्थलांतरित पक्ष्याचा मार्ग ठरलेला असतो. भारतात असे नऊ मार्ग आहेत. त्याच मार्गाने हे पक्षी येतात आणि जातातही. त्यात काहीच बदल होत नाही. एखादेवेळी एखादा पक्षी भरकटला, किंवा वार्‍याच्या वेगाने भरकटत गेला, तरच त्याचा मार्ग बदलतो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी लागलेल्या आगींमुळे भारतात येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांना काही धोका नाही. मंगोलिया, रशिया, युरेशिया, सैबेरिया, अफगाणिस्तान इत्यादी ठिकाणाहून पक्षी आपल्याकडे येतात. साधारण सप्टेंबरच्या सुरुवातीला हे पक्षी भारतातल्या विविध भागात यायला सुरुवात होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बरेचसे पक्षी आलेले असतात. आताही पक्षी आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मात्र त्यांच्या रिटर्न मायग्रेशनला सुरुवात होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लोकं घराबाहेर पडत नव्हते, लॉकडाऊन होतं, त्यामुळे प्राणी, पक्ष्यांचा मुक्त संचार बर्‍यापैकी वाढला होता, कारण त्यांच्यासाठी माणूस हा नंबर एकचा ‘शत्रू’. माणसांचं वास्तव्य जिथे वाढेल, तिथून बरेसचसे वन्यप्राणी, पक्षी कमी व्हायला लागतात. जगा आणि जगू द्या, हे माणसाला जेव्हा कळेल, तो सर्वांसाठीच सुदिन !.