शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

स्थलांतरित पक्षी यंदा येतील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 06:05 IST

ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.

ठळक मुद्देवणवे आणि हवामान बदलाचा काय परिणाम होईल?

लोकमत न्यूज नेटवर्क

अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अँमेझॉनच्या जंगलाला लागलेली आग आणि हवामान बदल. या सगळ्यांचा खूप मोठा फटका बसला तो वन्यप्राणी, कीटक आणि नैसर्गिक जैवसंपदेला.पक्ष्यांना; त्यातही स्थलांतरित पक्ष्यांनाही त्याची खूप मोठी झळ सोसावी लागली. अमेरिका आणि इतर काही देशांत तर अनेक पक्षी रस्त्यातच मरून पडल्याचं दिसून आलं.पण सगळ्याच स्थलांतरित पक्ष्यांना याचा फटका बसला किंवा बसेल का? भारतात काय परिस्थिती असेल?याचसंदर्भात बीएनएसचे संचालक संजय करकरे यांचं म्हणणं महत्त्वाचं आहे.ठिकठिकाणी पेटलेले वणवे आणि हवामान बदलाचा फटका तर सर्वांनाच बसतो, त्यातही त्या क्षेत्रात जे वन्यप्राणी आणि पक्षी राहतात त्यांना तो अधिकच बसतो.पण प्रत्येक स्थलांतरित पक्ष्याचा मार्ग ठरलेला असतो. भारतात असे नऊ मार्ग आहेत. त्याच मार्गाने हे पक्षी येतात आणि जातातही. त्यात काहीच बदल होत नाही. एखादेवेळी एखादा पक्षी भरकटला, किंवा वार्‍याच्या वेगाने भरकटत गेला, तरच त्याचा मार्ग बदलतो. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी ठिकाणी लागलेल्या आगींमुळे भारतात येणार्‍या स्थलांतरित पक्ष्यांना काही धोका नाही. मंगोलिया, रशिया, युरेशिया, सैबेरिया, अफगाणिस्तान इत्यादी ठिकाणाहून पक्षी आपल्याकडे येतात. साधारण सप्टेंबरच्या सुरुवातीला हे पक्षी भारतातल्या विविध भागात यायला सुरुवात होते. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बरेचसे पक्षी आलेले असतात. आताही पक्षी आपल्याकडे यायला सुरुवात झालेली आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये मात्र त्यांच्या रिटर्न मायग्रेशनला सुरुवात होते. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात लोकं घराबाहेर पडत नव्हते, लॉकडाऊन होतं, त्यामुळे प्राणी, पक्ष्यांचा मुक्त संचार बर्‍यापैकी वाढला होता, कारण त्यांच्यासाठी माणूस हा नंबर एकचा ‘शत्रू’. माणसांचं वास्तव्य जिथे वाढेल, तिथून बरेसचसे वन्यप्राणी, पक्षी कमी व्हायला लागतात. जगा आणि जगू द्या, हे माणसाला जेव्हा कळेल, तो सर्वांसाठीच सुदिन !.