शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
5
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
6
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
7
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
8
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
9
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
10
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
11
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
12
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
13
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
14
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
15
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
16
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
17
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
18
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

जीवच का संपवला रे भावा?

By किरण अग्रवाल | Updated: November 21, 2021 11:10 IST

Farmer Suicede : निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे.

-  किरण अग्रवाल

संकट अगर समस्यांनी नाउमेद व्हायला होते हे खरे, पण म्हणून त्यापुढे गुडघे टेकायचे नसतात. उलट संकटावर मात करीत यशाचे तोरण बांधून दाखवायचे असते. त्यातच असतो खरा पुरुषार्थ, मात्र प्रत्येकालाच हे जमते असेही नाही. परिस्थितीशरणता म्हणा किंवा हतबलता; त्यातून आशेचा पुसटसा प्रकाश दिसत नाही व भविष्याची वाट अंधारलेली दिसू लागते आणि मग अशा स्थितीत खचलेले मन या सर्व जंजाळातून बाहेर पडायच्या विचाराप्रत येऊन ठेपते. घात होतो तो याच टप्प्यावर. प्रवीणचेही दुर्दैवाने तेच झाले म्हणायचे.

 

मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी गावच्या प्रवीण पोळकट या तिशीतल्या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपविले. आत्महत्येपूर्वी प्रवीणने केलेली एक व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांत प्रसारित झाली असून, त्यात त्याने आपली जी वेदना व्यक्त केली आहे ती संवेदनशील मनाची हळहळ घडवून आणणारीच आहे. कॅन्सरग्रस्त पित्याच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीला गहाण ठेवून जे ट्रॅक्टर प्रवीणने घेतले होते ते कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित कर्जदार कंपनीने ओढून नेले, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रवीणने म्हटले आहे. वारंवार होणारी निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे, तेच या दुर्दैवी घटनेतून लक्षात यावे.

 

खरेतर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात कोरोनाचा फटका बसून गेला आहे. या दुःखातून व धक्क्यातून काहीसे सावरत नाही तोच यंदाही अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणून ठेवले. पूर पाण्याने नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच, पण ते कितपत पुरे पडणार? बळीराजाप्रमाणेच नोकरी गमावलेल्यांच्या आपल्या व्यथा आहेत. लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बुडालेले तांडेच्या तांडे अनवाणी पायाने गावाकडे निघालेले आपण बघितले आहेत. अनेकांचा व्यापार बंद झाला, बुडाला. थोडक्यात, अपवाद वगळता सर्वच घटकांना फटका बसला; पण तो सोसून सारे उभे होत आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनानंतरच्या नवीन चलनवलनाचा, जीवनशैलीचा आता आरंभ झाला आहे. संकटातून बाहेर पडून व जगण्याची एक नवी उमेद घेऊन सारे काही सुरळीत होऊ पाहत आहे. अशात कोरोना व त्यातून कोसळलेले दुःख दूर सारून उभे होत असताना पुन्हा परिस्थितीवश आत्महत्या घडून येणार असेल, तर धास्तावलेल्या समाजमनाला उभारी मिळवून द्यावयास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कमी पडलो की काय; असा प्रश्न उपस्थित व्हावा. कोरोनापूर्वी अशाच परिस्थितीने जेरीस आणलेल्या विदर्भ व वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या लागोपाठच्या आत्महत्यांनी अवघे राज्य हादरले व कळवळलेही होते. आता कोरोनानंतर पुन्हा कर्जबाजारीपणा, नापिकी व नाउमेदीचे चक्र समोर येणार असेल आणि त्याकडे यंत्रणांकडून असंवेदनशीलपणे बघितले जात असेल तर ते गंभीर ठरावे. प्रवीणच्या आत्महत्येने याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे म्हणायचे.

 

अर्थात, अडचणी कितीही असल्या आणि निराशा दाटून असली तरी प्रवीण तू असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते रे. कर्ज देणाऱ्या संस्थेने ट्रॅक्टर ओढून नेले म्हणून काय झाले, ते सोडवून ट्रॅक्टरच काय; विमान खरेदी करण्याची जिद्द घेऊन या संकटाच्या छाताडावर उभे राहता आले असते. जितेपणी पित्याच्या वाट्याला मरण वाढून स्वतःला संपवणे चुकीचेच होते प्रवीण. अरे, कुटुंबाचा विचार केला असता व जवळच्या मित्रांशी बोलून मन मोकळे केले असते तर मार्ग निघाला असता. आपल्या अकोल्याचेच कवी किशोर बळी यांच्या एका कवितेत म्हटले आहे,

''तुझं जीणं भारी खडतर, हे सगळं सगळं खरं

पण तुझ्या या प्रश्नावर, आत्महत्या नसे उत्तर!!

घाबरण्याने तुझ्या अशा गड्या, पर्वत झाली राई

हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही !!''

मग तू का हिम्मत हारलास रे गड्या? जराशा लढाईस सोडून तू आपला जीवच का संपवला रे भावा?

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या