शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

जीवच का संपवला रे भावा?

By किरण अग्रवाल | Updated: November 21, 2021 11:10 IST

Farmer Suicede : निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे.

-  किरण अग्रवाल

संकट अगर समस्यांनी नाउमेद व्हायला होते हे खरे, पण म्हणून त्यापुढे गुडघे टेकायचे नसतात. उलट संकटावर मात करीत यशाचे तोरण बांधून दाखवायचे असते. त्यातच असतो खरा पुरुषार्थ, मात्र प्रत्येकालाच हे जमते असेही नाही. परिस्थितीशरणता म्हणा किंवा हतबलता; त्यातून आशेचा पुसटसा प्रकाश दिसत नाही व भविष्याची वाट अंधारलेली दिसू लागते आणि मग अशा स्थितीत खचलेले मन या सर्व जंजाळातून बाहेर पडायच्या विचाराप्रत येऊन ठेपते. घात होतो तो याच टप्प्यावर. प्रवीणचेही दुर्दैवाने तेच झाले म्हणायचे.

 

मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी गावच्या प्रवीण पोळकट या तिशीतल्या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपविले. आत्महत्येपूर्वी प्रवीणने केलेली एक व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांत प्रसारित झाली असून, त्यात त्याने आपली जी वेदना व्यक्त केली आहे ती संवेदनशील मनाची हळहळ घडवून आणणारीच आहे. कॅन्सरग्रस्त पित्याच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीला गहाण ठेवून जे ट्रॅक्टर प्रवीणने घेतले होते ते कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित कर्जदार कंपनीने ओढून नेले, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रवीणने म्हटले आहे. वारंवार होणारी निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे, तेच या दुर्दैवी घटनेतून लक्षात यावे.

 

खरेतर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात कोरोनाचा फटका बसून गेला आहे. या दुःखातून व धक्क्यातून काहीसे सावरत नाही तोच यंदाही अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणून ठेवले. पूर पाण्याने नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच, पण ते कितपत पुरे पडणार? बळीराजाप्रमाणेच नोकरी गमावलेल्यांच्या आपल्या व्यथा आहेत. लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बुडालेले तांडेच्या तांडे अनवाणी पायाने गावाकडे निघालेले आपण बघितले आहेत. अनेकांचा व्यापार बंद झाला, बुडाला. थोडक्यात, अपवाद वगळता सर्वच घटकांना फटका बसला; पण तो सोसून सारे उभे होत आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनानंतरच्या नवीन चलनवलनाचा, जीवनशैलीचा आता आरंभ झाला आहे. संकटातून बाहेर पडून व जगण्याची एक नवी उमेद घेऊन सारे काही सुरळीत होऊ पाहत आहे. अशात कोरोना व त्यातून कोसळलेले दुःख दूर सारून उभे होत असताना पुन्हा परिस्थितीवश आत्महत्या घडून येणार असेल, तर धास्तावलेल्या समाजमनाला उभारी मिळवून द्यावयास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कमी पडलो की काय; असा प्रश्न उपस्थित व्हावा. कोरोनापूर्वी अशाच परिस्थितीने जेरीस आणलेल्या विदर्भ व वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या लागोपाठच्या आत्महत्यांनी अवघे राज्य हादरले व कळवळलेही होते. आता कोरोनानंतर पुन्हा कर्जबाजारीपणा, नापिकी व नाउमेदीचे चक्र समोर येणार असेल आणि त्याकडे यंत्रणांकडून असंवेदनशीलपणे बघितले जात असेल तर ते गंभीर ठरावे. प्रवीणच्या आत्महत्येने याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे म्हणायचे.

 

अर्थात, अडचणी कितीही असल्या आणि निराशा दाटून असली तरी प्रवीण तू असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते रे. कर्ज देणाऱ्या संस्थेने ट्रॅक्टर ओढून नेले म्हणून काय झाले, ते सोडवून ट्रॅक्टरच काय; विमान खरेदी करण्याची जिद्द घेऊन या संकटाच्या छाताडावर उभे राहता आले असते. जितेपणी पित्याच्या वाट्याला मरण वाढून स्वतःला संपवणे चुकीचेच होते प्रवीण. अरे, कुटुंबाचा विचार केला असता व जवळच्या मित्रांशी बोलून मन मोकळे केले असते तर मार्ग निघाला असता. आपल्या अकोल्याचेच कवी किशोर बळी यांच्या एका कवितेत म्हटले आहे,

''तुझं जीणं भारी खडतर, हे सगळं सगळं खरं

पण तुझ्या या प्रश्नावर, आत्महत्या नसे उत्तर!!

घाबरण्याने तुझ्या अशा गड्या, पर्वत झाली राई

हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही !!''

मग तू का हिम्मत हारलास रे गड्या? जराशा लढाईस सोडून तू आपला जीवच का संपवला रे भावा?

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या