शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
2
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
3
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
4
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
5
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
6
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
7
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
8
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
9
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
10
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
11
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
12
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
13
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
14
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
15
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
16
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
17
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
18
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
19
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
20
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

जीवच का संपवला रे भावा?

By किरण अग्रवाल | Updated: November 21, 2021 11:10 IST

Farmer Suicede : निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे.

-  किरण अग्रवाल

संकट अगर समस्यांनी नाउमेद व्हायला होते हे खरे, पण म्हणून त्यापुढे गुडघे टेकायचे नसतात. उलट संकटावर मात करीत यशाचे तोरण बांधून दाखवायचे असते. त्यातच असतो खरा पुरुषार्थ, मात्र प्रत्येकालाच हे जमते असेही नाही. परिस्थितीशरणता म्हणा किंवा हतबलता; त्यातून आशेचा पुसटसा प्रकाश दिसत नाही व भविष्याची वाट अंधारलेली दिसू लागते आणि मग अशा स्थितीत खचलेले मन या सर्व जंजाळातून बाहेर पडायच्या विचाराप्रत येऊन ठेपते. घात होतो तो याच टप्प्यावर. प्रवीणचेही दुर्दैवाने तेच झाले म्हणायचे.

 

मूर्तिजापूर तालुक्यातील साखरी गावच्या प्रवीण पोळकट या तिशीतल्या तरुणाने गळफास घेऊन आयुष्य संपविले. आत्महत्येपूर्वी प्रवीणने केलेली एक व्हिडीओ क्लिप समाज माध्यमांत प्रसारित झाली असून, त्यात त्याने आपली जी वेदना व्यक्त केली आहे ती संवेदनशील मनाची हळहळ घडवून आणणारीच आहे. कॅन्सरग्रस्त पित्याच्या नावावर असलेल्या तीन एकर शेतीला गहाण ठेवून जे ट्रॅक्टर प्रवीणने घेतले होते ते कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित कर्जदार कंपनीने ओढून नेले, त्यामुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे प्रवीणने म्हटले आहे. वारंवार होणारी निसर्गाची अवकृपा व वाढत्या नापिकीसारख्या कारणांनी अल्पभूधारक शेतकरी कसा त्रासला आहे व पराकोटीचा खचत चालला आहे, तेच या दुर्दैवी घटनेतून लक्षात यावे.

 

खरेतर गेल्या सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने अवघे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रत्येकालाच काही ना काही प्रमाणात कोरोनाचा फटका बसून गेला आहे. या दुःखातून व धक्क्यातून काहीसे सावरत नाही तोच यंदाही अतिवृष्टीने बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आणून ठेवले. पूर पाण्याने नदीकाठच्या जमिनी खरडून गेल्या, पिके वाहून गेली. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी शासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहेच, पण ते कितपत पुरे पडणार? बळीराजाप्रमाणेच नोकरी गमावलेल्यांच्या आपल्या व्यथा आहेत. लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बुडालेले तांडेच्या तांडे अनवाणी पायाने गावाकडे निघालेले आपण बघितले आहेत. अनेकांचा व्यापार बंद झाला, बुडाला. थोडक्यात, अपवाद वगळता सर्वच घटकांना फटका बसला; पण तो सोसून सारे उभे होत आहे.

 

महत्त्वाचे म्हणजे, कोरोनानंतरच्या नवीन चलनवलनाचा, जीवनशैलीचा आता आरंभ झाला आहे. संकटातून बाहेर पडून व जगण्याची एक नवी उमेद घेऊन सारे काही सुरळीत होऊ पाहत आहे. अशात कोरोना व त्यातून कोसळलेले दुःख दूर सारून उभे होत असताना पुन्हा परिस्थितीवश आत्महत्या घडून येणार असेल, तर धास्तावलेल्या समाजमनाला उभारी मिळवून द्यावयास समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपण कमी पडलो की काय; असा प्रश्न उपस्थित व्हावा. कोरोनापूर्वी अशाच परिस्थितीने जेरीस आणलेल्या विदर्भ व वऱ्हाडातील शेतकऱ्यांच्या लागोपाठच्या आत्महत्यांनी अवघे राज्य हादरले व कळवळलेही होते. आता कोरोनानंतर पुन्हा कर्जबाजारीपणा, नापिकी व नाउमेदीचे चक्र समोर येणार असेल आणि त्याकडे यंत्रणांकडून असंवेदनशीलपणे बघितले जात असेल तर ते गंभीर ठरावे. प्रवीणच्या आत्महत्येने याकडेच सर्वांचे लक्ष वेधले आहे म्हणायचे.

 

अर्थात, अडचणी कितीही असल्या आणि निराशा दाटून असली तरी प्रवीण तू असे टोकाचे पाऊल उचलायला नको होते रे. कर्ज देणाऱ्या संस्थेने ट्रॅक्टर ओढून नेले म्हणून काय झाले, ते सोडवून ट्रॅक्टरच काय; विमान खरेदी करण्याची जिद्द घेऊन या संकटाच्या छाताडावर उभे राहता आले असते. जितेपणी पित्याच्या वाट्याला मरण वाढून स्वतःला संपवणे चुकीचेच होते प्रवीण. अरे, कुटुंबाचा विचार केला असता व जवळच्या मित्रांशी बोलून मन मोकळे केले असते तर मार्ग निघाला असता. आपल्या अकोल्याचेच कवी किशोर बळी यांच्या एका कवितेत म्हटले आहे,

''तुझं जीणं भारी खडतर, हे सगळं सगळं खरं

पण तुझ्या या प्रश्नावर, आत्महत्या नसे उत्तर!!

घाबरण्याने तुझ्या अशा गड्या, पर्वत झाली राई

हे जीवन एक लढाई, कधी हिंमत हारायची नाही !!''

मग तू का हिम्मत हारलास रे गड्या? जराशा लढाईस सोडून तू आपला जीवच का संपवला रे भावा?

टॅग्स :Farmerशेतकरीfarmer suicideशेतकरी आत्महत्या