शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

निवडणूक लांबल्याचा लाभ कुणाला?

By किरण अग्रवाल | Updated: March 13, 2022 11:50 IST

Who benefits from the protracted election : अकोल्यात काय होणार, हे या गावातील लोकांनाच ठरवायचे आहे. गतकाळात अकोल्याचा कोणता विकास झाला, तो कोणी केला, कसा केला हे सारे लोकांसमोर आहे.

ठळक मुद्देअकोला महापालिकेसाठी भाजप तयारीतअन्य पक्षीय चाचपणीतच!

-   किरण अग्रवाल

अकोला महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काहीशा लांबणीवर पडणे हे तयारी नसलेल्या पक्षांच्या पथ्यावर पडले आहे खरे, पण आपसातील धुसफूस थांबवून ते या वाढीव वेळेचा लाभ उचलतील का हा प्रश्नच आहे. अन्य राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालांचा अकोल्यात काय परिणाम होणार, या चर्चेतच वेळ दवडला जाणार असेल तर संबंधितांना ‘अच्छे दिन’ची अपेक्षा करता येऊ नये.

 

अकोला महापालिकेतील नगरसेवकांचा कालावधी संपुष्टात आला असून, प्रशासकीय कारकीर्द सुरू झाली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली न निघाल्यामुळे नागरी स्वायत्त संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्याने इच्छुकांना तयारीला अधिक वेळ मिळाला आहे. अर्थात सत्ताधारी भाजपने त्यांची तयारी यापूर्वीच सुरू केली असून, इतर पक्षांना या लांबलेल्या निवडणुकीतून जो आणखी वेळ मिळून गेला आहे, तो सत्कारणी लावता येतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे. विशेषतः पाच राज्यांच्या अलीकडेच ज्या निवडणुका झाल्या, त्या निकालाचा परिणाम येथे होणे गृहीत धरले जात असल्याने भाजपेतरांनी कंबर कसणे अपेक्षित आहे.

 

खरे तर राज्यांच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळी गणिते असतात, त्याचेच प्रत्यंतर पाचही राज्यांच्या निकालामध्ये दिसून येत आहे. यातील लगतच्या गोव्यामध्ये भाजपला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व लाभले व इतरही तीन ठिकाणचे निकाल पाहता महाराष्ट्रातील भाजपचा उत्साह दुणावून जाणे स्वाभाविक आहे. अकोल्यातही फटाके फोडले गेले व पेढे वाटले गेले, हा आनंद स्वाभाविक आहे; पण याचा अर्थ अकोला महापालिकाही पुन्हा आपल्यालाच राखता येईल असा समज भाजपला करून घेता येऊ नये. राज्याच्या निवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात मोठा फरक असतो. पंजाबमध्ये ‘आप’ने स्तिमित करणारे यश मिळवले. तेथील यशाबद्दल अकोल्यातील आपच्या कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. या पक्षाची वाटचाल यशोदायी झाली आहे, ती पक्ष कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारीही आहे; पण त्याला संघटनात्मक कार्याची, जनमानसावरील प्रभावाचीही जोड लाभणे गरजेचे असते. राज्याच्या निवडणुकीत प्रचारासाठी केजरीवाल लाभले, महापालिकेसाठी कोण लाभणार? कुणाचा चेहरा पुढे करून लढणार, असे अनेक प्रश्न आहेत.

 

थोडक्यात, नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आता अकोल्याचे काय, असा प्रश्न तितकासा संयुक्तिक ठरू नये. अकोल्यात काय होणार, हे या गावातील लोकांनाच ठरवायचे आहे. गतकाळात अकोल्याचा कोणता विकास झाला, तो कोणी केला, कसा केला हे सारे लोकांसमोर आहे. पक्ष कोणताही असो, सत्ताधारी असोत की विरोधक; नगरसेवकांनी नेमकी कोणती सेवा बजावली याचा विचार केला जाणे अपेक्षित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करताना पक्षाच्या पाठबळासोबतच उमेदवाराची क्षमता अधिक महत्त्वाची ठरते, त्या निकषावरही मतदार विचार करीत असतो. पारंपरिक नेतृत्वाचे लोढणे आता फार काळ वागवण्याची मतदारांची मानसिकता दिसत नाही. लोकांना तत्काळ प्रतिसाद देणारे प्रतिनिधी हवे असतात. तात्कालिक प्रलोभनांना भुलणारा वर्गही आता कमी होत चालला आहे, त्यामुळे कोणताही पक्ष असो की नेता, मतदारांना गृहीत धरून चालता येत नाही. आगामी निवडणुकीची तयारी करताना या सर्व बाबी डोळ्यासमोर ठेवाव्या लागतील.

 

भाजप यासंदर्भातील तयारीत आघाडीवर दिसत आहे, पण इतर पक्षांचे काय? प्रमुख विरोधक शिवसेनेत आपसातच धूमश्चक्री सुरू आहे. नेतेच एकमेकांच्या मागे लागल्याने कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. पक्षाचा अजेंडा राबविण्याऐवजी नेत्यांची पालखी वाहण्यातच अनेकजण धन्यता मानताना दिसत आहेत. काँग्रेसची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. महापालिकेतील गटनेत्याचा जो प्रकार अलीकडेच घडून आला त्याने अगोदरच संघटनात्मकदृष्ट्या विकलांग असलेल्या पक्षाला अजूनच अडचणीत आणून ठेवले आहे. जिल्हाध्यक्ष विरुद्ध नाराजीचे धुमारे फुटत आहेत. पक्षांतर्गत निवडणुकीतून तरुण फळी जी पुढे आली आहे तीच आशादायी आहे, पण तिला ज्येष्ठ मंडळी संधी देणार का हा प्रश्न आहे.

 

राष्ट्रवादीकडेही प्रभावशाली नेतृत्व नाही. स्वतःची स्पेस वाढवायची तर शिवसेनेसोबत जाण्याखेरीज त्यांच्याकडे चांगला पर्याय नाही, पण तसे होईलच याची शाश्वती नाही. वंचित आघाडी आरक्षित जागांव्यतिरिक्त लक्ष देताना दिसत नाही. पालकमंत्रिपदाचा आधार लाभल्याने प्रहार काही तरी अस्तित्व निर्माण करण्याच्या प्रयत्नात दिसते, पण जनाधार मिळवणे हे मेळावे घेण्याइतके सोपे नाही. एमआयएम सक्रिय झाली आहे, परंतु ती काँग्रेसलाच अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. मनसे व आप या दोन्ही पक्षांची संघटनात्मक स्थितीही नाजूकच आहे. त्यामुळे अकोल्यात काय? हे आजच सांगता येऊ नये.

 

सारांशात, लांबलेल्या निवडणुकीचा लाभ सत्ताधाऱ्यांबरोबरच अन्य पक्षीयांनाही उचलता येणारा आहे, पण चाचपणीतच अडकलेल्यांकडून त्यादृष्टीने तयारी अगर नियोजन होताना दिसत नाही. तेव्हा ही वेळही निघून गेल्यावर जागे होण्याला अर्थ उरू नये.

टॅग्स :PoliticsराजकारणElectionनिवडणूक