शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

बोगस बियाण्यांचे दृष्टचक्र कधी थांबणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 8:28 PM

कष्टाचे थोडीतरी जाणीव ठेवून कंपन्यांनी शेतकºयांची पिळवणूक थांबवली पाहिजे.

पावसाळा सुरू झाला अन् बळीराजाच्या चेहऱ्यावर हास्य फुललं... पण अल्पावधीतच हे हास्य बोगस बियाण्यांच्या कंपन्यांनी हिरावून घेतलं.यंदा चांगला पाऊस असल्याच्या हवामान अंदाजानं शेतकºयाचं मन हरकून गेलं होतं. झालंही तसंच पावसाने चांगली सुरुवात केली मात्र पावसानं हुलकावनी दिल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. दुसरे संकट ओढवले ते बोगस बी बियाण्यांचे. आधीच आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकºयाला अनेक कंपन्यांनी बोगस बियाणे बाजारात आणले. कृषी केद्रांनीही त्याची विक्री केली. बोगस बियाण्यांच्या दृष्टचक्रातून शेतकरी बांधवांची सुटका कधी होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.पावसाळा सुरू झाला की आपल्या संपूर्ण भारतामध्ये नव्या दमाने नव्या उत्साहाने पेरणी सुरुवात करणारे शेतकरी आनंदाने पेरणी करतात; पण यावर्षी मात्र संपूर्ण जगालाच कोरोना नावाच्या संकटाने घेरलेलं आहे. अशातच बोगस बियाण्याने शेतकºयांवर मोठे संकट ओढवले. बळीराजाची फसवणूक होत असताना कंपन्या प्रकरणातून पळवाटा काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा कंपन्यांना कायद्याने वेठीस धरले पाहिजे आणि आपली नुकसानभरपाई वसूल केली पाहिजे .शेतकºयांनी शेतामध्ये बियाणी पेरून त्यानंतर काही दिवसांनंतर ते बियाणे उगवलेच नाही. यामुळे बºयाच ठिकाणी शेतकरी वर्ग घाबरून गेला आहे. तेव्हा शेतकºयांनी न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा. शेतकºयांनी न्याय मिळत नसेल तर त्यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार करावी.बोगस बियाण्यांमुळे झालेले नुकसान आणि दुबार पेरणीचे संकट शेतकºयांवर आलेलं आहे. दुबार पेरणीसाठी त्यांनी पैसा कुठून आणावा.? हा सवाल या संपूर्ण हलाखीच्या परिस्थितीमध्ये निर्माण होतो आहे. संबंधित फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले पाहिजे. आर्थिक स्वाथार्पायी शेतकºयांची पिळवणूक करणाºया कंपन्यांचा हा फसवणुकीचा खेळ कुठेतरी थांबवणे खूप आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ही बाब घडत आहे, तेथील शासन, प्रशासकीय, कृषी अधिकारी, सर्वांनी या संपूर्ण प्रकरणावर लक्ष देऊन शेतकºयांना न्याय देण्याचे कार्य करावे. सर्व शेतकºयांनी एकत्र येऊन या बोगस बियाणे प्रकरणावर एकत्रित लढून या कंपन्यांना धडा शिकवणे महत्त्वाचे आहे. छोट्या-छोट्या गोष्टीची काळजी घेत शेतकरी आपली पेरणी करत असतो. पुढे पेरणी करतो. त्याला कधी कधी जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करावे लागते. त्यासाठी रात्र-रात्र जागरण करावे लागते. आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना तो देशातील सेवा सुद्धा करत असतो. म्हणूनच शेतकºयाला जगाचा पोशिंदा म्हटले जाते; पण हा पोशिंदा मात्र सदैव संकटात सापडतो आणि या संकटामध्ये फक्त तोच वादळाला सामना करतो. संपूर्ण जग ^‘वर्क फ्रॉम होम’ करीत असले तरीही आमचे शेतकरी याची इंडस्ट्री मात्र चालूच आहे आणि ही इंडस्ट्रीज बंद पडली तर तुम्हाला आम्हा सर्वांचे खाण्याचे काय हाल होतील, याचा विचार करणे फार महत्त्वाचे. शेतकºयांच्या हक्कासाठी सर्वांनी बोलायला हवं. यांच्यावर वादळ येतो संकटाच वादळ येतो तेव्हा मात्र शेतकरी हतबल होऊन बसतो आणि सगळेजण त्याच्या हालावर फक्त बोलतात करतात मात्र काहीच नाही. शेती ही इंडस्ट्री आहे, ती जर बंद पडली तर......? या प्रश्नाचे उत्तर आपण शोधू शकत नाही, अशी अवस्था होईल. त्यामुळे शेतकºयांच्या चाललेल्या पिळवणुकीला थांबण्यासाठी सर्वांनी आवाज उचलने महत्त्वाचे आहे. शेतकºयांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा आणि जे काही कंपनी बोगस बियाणे करून शेतकºयांची पिळवणूक करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सर्वांनी आवाज उठवला पाहिजे. शासनाने अशा कंपन्यांचे परवाने रद्द केले पाहिजेत. तेव्हा त्यांना कळेल की शेतकºयांच्यासोबत केलेली कृती ही एका देशाविरोधी केलेली कृती आहे. जो शेतकरी आहे, त्याच्या हाडावर शेतीची जबाबदारी आहे, त्याला मात्र या सगळ्या गोष्टी मनाला स्पर्शून जाणाºयो आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी खूप गरीब असतो, तो या सगळ्या गोष्टींसाठी खूप खटपट करतो. तिथे शेतीच्या बियाण्यांसाठी पैसा नसतो. त्याला दुबार पेरणीसाठी परवडणारा पैसा आणवा तरी कोठून? त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा जुलूम कुठेतरी थांबणे महत्त्वाचे आहे. कारण ग्रामीण भागामध्ये प्रामुख्याने शेतीची पिके घेतली जातात. ग्रामीण भागातील शेतकरी खूप हालअपेष्टा सहन करून जीवाचे रान करतो. त्या कष्टाचे थोडीतरी जाणीव ठेवून कंपन्यांनी शेतकºयांची पिळवणूक थांबवली पाहिजे. आणि बोगस बियाणे हा धंदा बंद केला पाहिजे. शासनानेही अशा कंपन्यांवर कडक कारवाई करून त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे म्हणजे पुढे चालून कोणीही आपल्या शेतकरी बांधवांच्या आयुष्याशी खेळण्याचे धाडस करू शकणार नाही.

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती