शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

... आता इथून पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 06:10 IST

अंतराळ विज्ञानात आणि तंत्रज्ञानात आपण खूप प्रगती केली असं वाटून थांबण्याचे टप्पे कधी येत नाहीत.

ठळक मुद्देआजच्या घडीला अमेरिका आणि चीन यांची अंतराळ विज्ञानातील प्रगती आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे.

- तपन मिश्रा(अहमदाबाद स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर येथे कार्यरत भारताचे रडार मॅन!... इस्रो चेअरमनचे वरिष्ठ सल्लागार)साधं गणित आहे, आपल्याकडे ताकद आहे पण ती ताकद खरंच आहे का, किती आहे हे जगाला कधीतरी दाखवावं लागतं आणि जगानं ते मान्यही करावं लागतं.भारतानं ‘अ‍ॅन्टी-सॅटेलाइट मिसाइल’ म्हणजेच उपग्रहविरोधी क्षेपणास्राची चाचणी यशस्वी करून जगाला हे दाखवून दिलं आहे की, आमच्याकडे हे तंत्रज्ञान आहे. आम्ही ते स्वसंरक्षणासाठी सिद्ध केलेलं आहे. आणि जगासमोर आपलीही क्षमता सिद्ध करणारं हे यश म्हणजे भारतीय शास्रज्ञांनी घेतलेली एक मोठी अभिमानास्पद झेप आहे.एक उदाहरण सांगतो, एक मोठ्ठा हॉल आहे आणि त्या हॉलच्या एका टोकाला एक माणूस उभा आहे, दुसऱ्या टोकाला दुसरा माणूस उभा आहे. आता आपण एका माणसाला सांगतोय की तुझ्या हातात जी टाचणी आहे, ती तू हवेत उडव आणि दुसऱ्याला सांगतो की तू गणित बांधून, वेगाचा अभ्यास करून अत्यंत अचूकतेनं ती टाचणी हवेतच मारायची आहे..विचार करा हे काम सोपं आहे का?अचूकता आणि वेगाचं हे गणित आहे, ज्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास लागतो. तंत्रज्ञानही लागतं. आपल्या शास्रज्ञांनी आपल्या क्षमता आणि तंत्रज्ञानावर शिक्कामोर्तब केलं आहे.या क्षमतांचा वापर राष्ट्र आक्रमक होण्यासाठी करत नसतात. मात्र ज्याला ‘डिटरण्ट’ अर्थात प्रतिबंधात्मक क्षमता म्हणतात त्या आपल्याकडे असणं ही नव्या काळात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.संरक्षण, प्रतिबंधात्मक क्षमता हे तर महत्त्वाचं आहेच मात्र या गोष्टींचा अजून एक महत्त्वाचा फायदा आहे तो म्हणजे आर्थिक सुरक्षितता आणि गुंतवणुकीचा. आर्थिक सत्ता बनायचं असेल तर या काळात तुमच्याकडे तंत्रज्ञानाची ताकद हवी. जगभरातले लोक भारताच्या अंतराळ तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतात कारण आपण त्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यातून आर्थिक गुंतवणुकीलाही चालना मिळते आणि तंत्रज्ञानालाही. त्यामुळेच अशाप्रकारची डिटरण्ट क्षमता आपल्याकडे असणं ही नव्या काळात मोठी कमाई आहे. डीआरडीओनं केलेली ही कामगिरी म्हणून अत्यंत अभिमानास्पद आणि भारताच्या प्रगतीला पोषकपूरक ठरणारी आहे.अंतराळ विज्ञानात आणि तंत्रज्ञानात आपण ‘कमावलं’ किंवा खूप प्रगती केली असं वाटून थांबण्याचे टप्पे कधी येत नाहीत. आता याहून पुढं जायचं आहे हे ध्येय सतत खुणावत असतंच. आजच्या घडीला अमेरिका आणि चीन यांची अंतराळ विज्ञानातील प्रगती आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. आपल्याला त्या दिशेनं जायचं आहे. तंत्रज्ञानदृष्ट्या सक्षम होत अधिक अचूक काम करायचं आहे. अंतराळ विज्ञानातील सत्ता आणि आर्थिक सत्ता यांचा ध्यास असेल तर आपल्याला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे.(मुलाखत आणि शब्दांकन : मेघना ढोके)