शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रगल ? - तो आहेच !

By admin | Updated: July 22, 2016 17:55 IST

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक.

 अदिती भालेराव

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. त्यांच्या मुलीने- अदितीनेही रिंगण तोडलं आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात ‘सोलेल्’ ही स्वत:ची नाममुद्रा रोवण्यासाठी ती व्हाया लंडन पुण्यात परतली आहे. भालेराव म्हणतात, आम्हीही हिंमत केलीच, पण या मुलांचा काळ त्यांना थेट उड्याच मारू देतो!बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याच्याकडे असंं काय होतं जे आज तुझ्याकडे नाही? तुला त्याची रुखरुख वाटते का?- ‘काही नाही’ असं खरं तर काही नाही. सगळंच आहे माझ्याकडे. बाबाच्या पिढीसाठी साधी माहिती मिळवणं हेच एक मोठं काम होतं. कुठल्याही कामाची, विषयाची, आपल्याला उपयोगी पडू शकतील अशा माणसांची माहिती मिळवणं हे त्यांच्यासाठी अतीव कटकटीचं, अडथळ्यांचं होतं. त्यासाठी त्यांच्या नशिबी फार झगडा आला. त्या पिढीने हे अपरिहार्य कष्ट घेऊन सगळं स्वत: शोधलं, पण म्हणून त्यांचे पाय भक्कम रुजत गेले असं वाटतं मला. माझ्यासाठी फार सोप्या आहेत गोष्टी आणि खूप जास्तही! खूप माहिती, असंख्य पर्याय आणि निवडीचं स्वातंत्र्य यामुळे निवड आणि निर्णय या दोन गोष्टी मात्र आमच्यासाठी सोप्या नाहीत. बाबाच्या पिढीकडे जो संयम होता तो आमच्याकडे जरा कमी आहे असं मला वाटतं! शिवाय आम्ही सहज-सोप्या उपलब्धतेला इतके सोकावलो आहोत, की वरवरच्या माहितीने, तात्पुरत्या ज्ञानाने काम भागवण्याचे शॉर्टकट आम्हाला माहिती असतात. जमतातही; पण त्यामुळे माझी पिढी काहीशी उथळ ठरते आहे की काय, अशी भीती मला कधीकधी वाटते.बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याने बिझनेससाठी केलेला स्ट्रगल आणि तुझा स्ट्रगल यात काय फरक आहे? परिस्थिती बदलल्याने तुला बाबापेक्षा अ‍ॅडव्हाण्टेज मिळाला असं वाटतं का?- माझ्या बाबाच्या पिढीचा स्ट्रगल हा ‘सर्व्हायवल’चा अर्थात जगण्याचाच होता. मला ‘जगण्याचे’ प्रश्न नाहीत, कारण कनिष्ठ मध्यमवर्गातून वर सरकलेल्या माझ्या आईवडिलांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. माझा झगडा ‘टिकून राहण्या’चा असणार आहे. त्यामुळे माझी सुरुवात स्थैर्यातून, सुस्थितीतून होत असली, तरी पुढची वाट चालणं माझ्यासाठी सोपं नसणार, हे मला कळतं.आज मला प्रचंड अ‍ॅडव्हाण्टेज आहे. घरच्यांचा पाठिंबा, आर्थिक पाठबळही आहे. मी व्यवसायाला सुरुवात करताना आर्थिक पाठबळाची चैन मला मिळाली. बाबा झगडत वर आला. शिवाय त्याच्या पिढीच्या अनुभवाची शिदोरीही आयतीच माझ्या वाट्याला आली. हे सगळे अ‍ॅडव्हाण्टेज अमूल्यच आहेत.फक्त एवढंच की, त्याने माझे प्रश्न सोपे होत नाहीत. कारण नव्या काळाने नव्या अ‍ॅडव्हाण्टेज बरोबर नवे प्रश्नही माझ्यासमोर ठेवले आहेत. माझ्यासमोर प्रचंड वेगाने गरगरणारी स्पर्धा आहे. त्या वेगाचा हात धरून भोवऱ्यात उतरण्याचा अनुभव माझ्या बाबाने दिलेल्या शिदोरीत नाही.. कारण, तो माझा मलाच घ्यावा लागणार आहे. आज भारतापेक्षा जगाच्या अन्य कुठल्या भागात असणं तुला जास्त आवडलं असतं? हो तर का? नाही तर का नाही?- नाही!! मी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतीय आहे. भारतापलीकडे कुठं जाऊन तिथे कायमचं राहणं हे आजतरी मला माझ्यासाठी महत्त्वाचं वाटत नाही.मी लंडनमध्ये शिकायला गेले. तिथे राहण्याचा अनुभव मिळवला. (बाबाच्या कृपेने) मी इतरही जगात खूप फिरले. त्या प्रवासामुळेच असेल कदाचित, पण मला भारतातच राहायला आवडेल हे माझं मलाच कळलं.फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:चा ‘सोलेल्’ हा नवा ब्रॅण्ड निर्माण करण्याची सुरुवात मी पुण्यातूनच केली आहे. इथंच काम करणं, व्यवसाय करणं, वाढवणं हे सारंच मला करायचं होतं. बदलत्या आर्थिक पर्यावरणात भारतात व्यावसायिक संधी आहेत हे खरंच. पण माझा भारतातच राहण्याचा निर्णय असा पूर्ण ‘व्यावसायिक’ नाही. तो भावनेचाही आहे. भारतात राहणं, इथली जीवनशैली, इथलं माझं जगणं हे सारंच मला हवं आहे. मी व्यवसाय देशात करीन, देशाबाहेरही जाऊन करीन, पण राहीन इथेच!इथेच माझी मुळं आहेत, असं मला नक्की वाटतं.