शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

स्ट्रगल ? - तो आहेच !

By admin | Updated: July 22, 2016 17:55 IST

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक.

 अदिती भालेराव

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. त्यांच्या मुलीने- अदितीनेही रिंगण तोडलं आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात ‘सोलेल्’ ही स्वत:ची नाममुद्रा रोवण्यासाठी ती व्हाया लंडन पुण्यात परतली आहे. भालेराव म्हणतात, आम्हीही हिंमत केलीच, पण या मुलांचा काळ त्यांना थेट उड्याच मारू देतो!बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याच्याकडे असंं काय होतं जे आज तुझ्याकडे नाही? तुला त्याची रुखरुख वाटते का?- ‘काही नाही’ असं खरं तर काही नाही. सगळंच आहे माझ्याकडे. बाबाच्या पिढीसाठी साधी माहिती मिळवणं हेच एक मोठं काम होतं. कुठल्याही कामाची, विषयाची, आपल्याला उपयोगी पडू शकतील अशा माणसांची माहिती मिळवणं हे त्यांच्यासाठी अतीव कटकटीचं, अडथळ्यांचं होतं. त्यासाठी त्यांच्या नशिबी फार झगडा आला. त्या पिढीने हे अपरिहार्य कष्ट घेऊन सगळं स्वत: शोधलं, पण म्हणून त्यांचे पाय भक्कम रुजत गेले असं वाटतं मला. माझ्यासाठी फार सोप्या आहेत गोष्टी आणि खूप जास्तही! खूप माहिती, असंख्य पर्याय आणि निवडीचं स्वातंत्र्य यामुळे निवड आणि निर्णय या दोन गोष्टी मात्र आमच्यासाठी सोप्या नाहीत. बाबाच्या पिढीकडे जो संयम होता तो आमच्याकडे जरा कमी आहे असं मला वाटतं! शिवाय आम्ही सहज-सोप्या उपलब्धतेला इतके सोकावलो आहोत, की वरवरच्या माहितीने, तात्पुरत्या ज्ञानाने काम भागवण्याचे शॉर्टकट आम्हाला माहिती असतात. जमतातही; पण त्यामुळे माझी पिढी काहीशी उथळ ठरते आहे की काय, अशी भीती मला कधीकधी वाटते.बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याने बिझनेससाठी केलेला स्ट्रगल आणि तुझा स्ट्रगल यात काय फरक आहे? परिस्थिती बदलल्याने तुला बाबापेक्षा अ‍ॅडव्हाण्टेज मिळाला असं वाटतं का?- माझ्या बाबाच्या पिढीचा स्ट्रगल हा ‘सर्व्हायवल’चा अर्थात जगण्याचाच होता. मला ‘जगण्याचे’ प्रश्न नाहीत, कारण कनिष्ठ मध्यमवर्गातून वर सरकलेल्या माझ्या आईवडिलांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. माझा झगडा ‘टिकून राहण्या’चा असणार आहे. त्यामुळे माझी सुरुवात स्थैर्यातून, सुस्थितीतून होत असली, तरी पुढची वाट चालणं माझ्यासाठी सोपं नसणार, हे मला कळतं.आज मला प्रचंड अ‍ॅडव्हाण्टेज आहे. घरच्यांचा पाठिंबा, आर्थिक पाठबळही आहे. मी व्यवसायाला सुरुवात करताना आर्थिक पाठबळाची चैन मला मिळाली. बाबा झगडत वर आला. शिवाय त्याच्या पिढीच्या अनुभवाची शिदोरीही आयतीच माझ्या वाट्याला आली. हे सगळे अ‍ॅडव्हाण्टेज अमूल्यच आहेत.फक्त एवढंच की, त्याने माझे प्रश्न सोपे होत नाहीत. कारण नव्या काळाने नव्या अ‍ॅडव्हाण्टेज बरोबर नवे प्रश्नही माझ्यासमोर ठेवले आहेत. माझ्यासमोर प्रचंड वेगाने गरगरणारी स्पर्धा आहे. त्या वेगाचा हात धरून भोवऱ्यात उतरण्याचा अनुभव माझ्या बाबाने दिलेल्या शिदोरीत नाही.. कारण, तो माझा मलाच घ्यावा लागणार आहे. आज भारतापेक्षा जगाच्या अन्य कुठल्या भागात असणं तुला जास्त आवडलं असतं? हो तर का? नाही तर का नाही?- नाही!! मी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतीय आहे. भारतापलीकडे कुठं जाऊन तिथे कायमचं राहणं हे आजतरी मला माझ्यासाठी महत्त्वाचं वाटत नाही.मी लंडनमध्ये शिकायला गेले. तिथे राहण्याचा अनुभव मिळवला. (बाबाच्या कृपेने) मी इतरही जगात खूप फिरले. त्या प्रवासामुळेच असेल कदाचित, पण मला भारतातच राहायला आवडेल हे माझं मलाच कळलं.फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:चा ‘सोलेल्’ हा नवा ब्रॅण्ड निर्माण करण्याची सुरुवात मी पुण्यातूनच केली आहे. इथंच काम करणं, व्यवसाय करणं, वाढवणं हे सारंच मला करायचं होतं. बदलत्या आर्थिक पर्यावरणात भारतात व्यावसायिक संधी आहेत हे खरंच. पण माझा भारतातच राहण्याचा निर्णय असा पूर्ण ‘व्यावसायिक’ नाही. तो भावनेचाही आहे. भारतात राहणं, इथली जीवनशैली, इथलं माझं जगणं हे सारंच मला हवं आहे. मी व्यवसाय देशात करीन, देशाबाहेरही जाऊन करीन, पण राहीन इथेच!इथेच माझी मुळं आहेत, असं मला नक्की वाटतं.