शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

स्ट्रगल ? - तो आहेच !

By admin | Updated: July 22, 2016 17:55 IST

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक.

 अदिती भालेराव

१९९१ पूर्वीच्या भारतात मराठी मध्यमवर्गीयतेच्या चाकोऱ्या तोडून, नोकरीचं रिंगण नाकारून स्वत:चा व्यवसाय उभा करण्यासाठी झगडलेले विवेक भालेराव हे पुण्यातल्या ‘लोगोमन एनर्जी सिस्टीम्स’चे संस्थापक संचालक. त्यांच्या मुलीने- अदितीनेही रिंगण तोडलं आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात ‘सोलेल्’ ही स्वत:ची नाममुद्रा रोवण्यासाठी ती व्हाया लंडन पुण्यात परतली आहे. भालेराव म्हणतात, आम्हीही हिंमत केलीच, पण या मुलांचा काळ त्यांना थेट उड्याच मारू देतो!बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याच्याकडे असंं काय होतं जे आज तुझ्याकडे नाही? तुला त्याची रुखरुख वाटते का?- ‘काही नाही’ असं खरं तर काही नाही. सगळंच आहे माझ्याकडे. बाबाच्या पिढीसाठी साधी माहिती मिळवणं हेच एक मोठं काम होतं. कुठल्याही कामाची, विषयाची, आपल्याला उपयोगी पडू शकतील अशा माणसांची माहिती मिळवणं हे त्यांच्यासाठी अतीव कटकटीचं, अडथळ्यांचं होतं. त्यासाठी त्यांच्या नशिबी फार झगडा आला. त्या पिढीने हे अपरिहार्य कष्ट घेऊन सगळं स्वत: शोधलं, पण म्हणून त्यांचे पाय भक्कम रुजत गेले असं वाटतं मला. माझ्यासाठी फार सोप्या आहेत गोष्टी आणि खूप जास्तही! खूप माहिती, असंख्य पर्याय आणि निवडीचं स्वातंत्र्य यामुळे निवड आणि निर्णय या दोन गोष्टी मात्र आमच्यासाठी सोप्या नाहीत. बाबाच्या पिढीकडे जो संयम होता तो आमच्याकडे जरा कमी आहे असं मला वाटतं! शिवाय आम्ही सहज-सोप्या उपलब्धतेला इतके सोकावलो आहोत, की वरवरच्या माहितीने, तात्पुरत्या ज्ञानाने काम भागवण्याचे शॉर्टकट आम्हाला माहिती असतात. जमतातही; पण त्यामुळे माझी पिढी काहीशी उथळ ठरते आहे की काय, अशी भीती मला कधीकधी वाटते.बाबाची पिढी पंचविशीत असताना त्याने बिझनेससाठी केलेला स्ट्रगल आणि तुझा स्ट्रगल यात काय फरक आहे? परिस्थिती बदलल्याने तुला बाबापेक्षा अ‍ॅडव्हाण्टेज मिळाला असं वाटतं का?- माझ्या बाबाच्या पिढीचा स्ट्रगल हा ‘सर्व्हायवल’चा अर्थात जगण्याचाच होता. मला ‘जगण्याचे’ प्रश्न नाहीत, कारण कनिष्ठ मध्यमवर्गातून वर सरकलेल्या माझ्या आईवडिलांनी ते प्रश्न सोडवलेले आहेत. माझा झगडा ‘टिकून राहण्या’चा असणार आहे. त्यामुळे माझी सुरुवात स्थैर्यातून, सुस्थितीतून होत असली, तरी पुढची वाट चालणं माझ्यासाठी सोपं नसणार, हे मला कळतं.आज मला प्रचंड अ‍ॅडव्हाण्टेज आहे. घरच्यांचा पाठिंबा, आर्थिक पाठबळही आहे. मी व्यवसायाला सुरुवात करताना आर्थिक पाठबळाची चैन मला मिळाली. बाबा झगडत वर आला. शिवाय त्याच्या पिढीच्या अनुभवाची शिदोरीही आयतीच माझ्या वाट्याला आली. हे सगळे अ‍ॅडव्हाण्टेज अमूल्यच आहेत.फक्त एवढंच की, त्याने माझे प्रश्न सोपे होत नाहीत. कारण नव्या काळाने नव्या अ‍ॅडव्हाण्टेज बरोबर नवे प्रश्नही माझ्यासमोर ठेवले आहेत. माझ्यासमोर प्रचंड वेगाने गरगरणारी स्पर्धा आहे. त्या वेगाचा हात धरून भोवऱ्यात उतरण्याचा अनुभव माझ्या बाबाने दिलेल्या शिदोरीत नाही.. कारण, तो माझा मलाच घ्यावा लागणार आहे. आज भारतापेक्षा जगाच्या अन्य कुठल्या भागात असणं तुला जास्त आवडलं असतं? हो तर का? नाही तर का नाही?- नाही!! मी खऱ्या अर्थानं पूर्ण भारतीय आहे. भारतापलीकडे कुठं जाऊन तिथे कायमचं राहणं हे आजतरी मला माझ्यासाठी महत्त्वाचं वाटत नाही.मी लंडनमध्ये शिकायला गेले. तिथे राहण्याचा अनुभव मिळवला. (बाबाच्या कृपेने) मी इतरही जगात खूप फिरले. त्या प्रवासामुळेच असेल कदाचित, पण मला भारतातच राहायला आवडेल हे माझं मलाच कळलं.फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात स्वत:चा ‘सोलेल्’ हा नवा ब्रॅण्ड निर्माण करण्याची सुरुवात मी पुण्यातूनच केली आहे. इथंच काम करणं, व्यवसाय करणं, वाढवणं हे सारंच मला करायचं होतं. बदलत्या आर्थिक पर्यावरणात भारतात व्यावसायिक संधी आहेत हे खरंच. पण माझा भारतातच राहण्याचा निर्णय असा पूर्ण ‘व्यावसायिक’ नाही. तो भावनेचाही आहे. भारतात राहणं, इथली जीवनशैली, इथलं माझं जगणं हे सारंच मला हवं आहे. मी व्यवसाय देशात करीन, देशाबाहेरही जाऊन करीन, पण राहीन इथेच!इथेच माझी मुळं आहेत, असं मला नक्की वाटतं.