शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

झिडकारलेल्या आयुष्याला मायेची ‘सावली’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:42 IST

बेवारसपणाचा शिक्का घेऊन जगणाऱ्यांच्या विश्वात कुणी डोकावायला तयार होत नाही. अशाच स्थितीत सांगलीच्या ‘इन्साफ फाऊंडेशन’ व महापालिकेतील माणुसकी जपलेल्या अधिकाऱ्यांनी झिडकारलेल्या लोकांच्या आयुष्याला मायेची ‘सावली’ देण्याचे काम सुरू केले. मनोरुग्णांच्या अंध:कारातून प्रकाशाच्या दिशेने पडणाºया पावलांचा थक्क करणारा प्रवासही या सावलीत अनुभवास येत आहे.

-अविनाश कोळी -मळलेले, काळवंडलेले, फाटलेले कपडे... जटांचा डोईवरचा वाढत जाणारा भार...जनावरांप्रमाणे उकीरड्यावर होणारा उदरनिर्वाह...अडगळ, फुटपाथ किंवा गलिच्छ भागातील आसरा अशा गोष्टींमुळे समाजातील प्रतिष्ठित लोक बेवारस लोकांना, मनोरुग्णांना किळसवाणे ठरवितात. एकीकडे हा दृश्य गलिच्छपणा आणि दुसरीकडे विचारांनी, अन्यायकारक कृत्यांनी जपलेला पांढरपेशा समाजातील गलिच्छपणा दिसून येतो. समाजासाठी यातील कोणता गलिच्छपणा घातक असतो, हे सांगायची कोणाला गरज नाही. तरीही दृश्य स्वरूपात गलिच्छ वाटणाºया अशा बेवारस लोकांना मरणाच्या दाढेत ढकलून आपला समाज आपल्याच विश्वात रमत असतो; पण समाजातील काही घटक आजही अशा बेवारस मनोरुग्णांच्या पदरी आलेले झिडकारलेपण पाहून अस्वस्थ होतात.सांगलीच्या इन्साफ फाऊंडेशनचे मुस्तफा मुजावर व त्यांच्या पथकाने सांगलीतील अशा लोकांना इन्साफ देण्याचा लढा उभारला. केवळ प्रसिद्धीसाठी चमकोगिरी करणाऱ्यांच्या गर्दीत त्यांची कृतिशील पावले अधिक प्रभावी ठरली.मागील अनेक वर्षांपासून रस्त्यावरून फिरणाºया मनोरुग्णांना त्यांचे घर मिळवून देण्यापासून त्यांची सुश्रूषा करणे, त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी या संघटनेने केल्या. प्रसंगी कुटुंबातील व्यक्तींचे दागिने गहाण ठेवून त्यांनी या बेवारस लोकांना जपण्याचे काम केले. पदरमोड करीत कर्जाच्या खाईत लोटल्यानंतरही त्यांच्या विचारांची बैठक कधी डळमळीत झाली नाही. बेघरांसाठी एक जागा, एखादी इमारत मिळावी म्हणून कित्येक वर्षे धडपडणाºया या फाऊंडेशनला अखेर विद्यमान महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर, उपायुक्त स्मृती पाटील यांनी साथ दिली. आपटा पोलीस चौकीजवळील बंद पडलेल्या महापालिकेच्या शाळेत ‘सावली’ हे केंद्र सुरू केले. बघता-बघता फाऊंडेशनने शहरांमध्ये फिरून २७ लोकांना याठिकाणी आसरा दिला. यातील सातजणांना त्यांचे घरही शोधून दिले.शाळेतील खोल्यांमध्ये स्वच्छता करून प्रत्येकासाठी कॉट, गादी, बसण्यासाठी खुर्च्या, स्वयंपाकघर, स्वच्छतागृह, स्नानगृह अशा बºयाच सुविधा येथे उपलब्ध केल्या आहेत. जटा काढून, दाढी करून, अंघोळ घालून स्वच्छ कपड्यानिशी त्यांना नव्या विश्वात आणण्याचे काम फाऊंडेशनचे कार्यकर्ते करीत असतात. माया गडदे, रफिक मुजावर, अभिजित साळुंखे, राहुल चौगुले, बसवराज होसमणी, वंदना काळे, आदी कार्यकर्ते दिवस-रात्र राबत आहेत. लहान मुलांप्रमाणे अनेकांची सेवा करावी लागते. केवळ दररोज सायंकाळी हे मनोरुग्ण याठिकाणी पासिंग बॉल, क्रिकेट असे खेळही खेळत असतात. दररोज चहा, नाष्टा, जेवण यांसह रुग्णवाहिका, वैद्यकीय सेवाही पुरविल्या जातात. नग्न मनोरुग्णांना आता स्वत: कपडे घालण्याचा आनंद वाटतो. इतका बदल या केंद्राने त्यांच्या जीवनात घडविला. सध्या महापालिका येथील सर्व खर्च करीत असली तरी, समाजातील माणुसकी जपणाºया लोकांच्या मदतीचे हातही या केंद्राला हवे आहेत. बेवारस म्हणून फिरणाºयांना एक मोठे कुटुंब यातून गवसले. अनिश्चिततेच्या दरीत कोसळणाºया या माणसांना सच्चा माणसांचे हात लाभले आणि ‘सावली’च्या माध्यमातून पोळलेल्या या जिवांना शीतल सावली गवसली.(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)