शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

एक निर्वासित वर्ष

By admin | Updated: December 26, 2015 18:00 IST

जगाच्या आजवरच्या इतिहासात माणसे घर सोडून, देश सोडून बाहेर पडतच होती. पोटासाठी, अधिक चांगल्या जगण्यासाठी स्वेच्छेने स्थलांतर होत आले.. सक्तीनेही झाले! पण सरत्या वर्षाने माणसांना देशाबाहेर काढले, वणवणत ठेवले, भुकेने छळले आणि समुद्रात बुडवून मारलेही!

- ओंकार करंबेळकर
 
वर्ष संपायला अवघे तीन दिवस उरलेले असताना आता सरत्या वर्षाचा लेखाजोखा मांडला जाईल. त्यातले एक छायाचित्र तुम्ही पुन्हापुन्हा पाहाल आणि दरवेळी तुमच्या काळजात नव्याने कळ उठेल.
- ते छायाचित्र आहे आयलान कुर्दी या तुर्कस्थानातल्या चिमुकल्याचे. आईबाप आणि मोठय़ा भावासह देश सोडून जीव वाचवायला म्हणून महासागरात लोटलेल्या एका होडक्यात बसलेला आयलान ग्रीसकडे निघाला होता. त्या जीवघेण्या प्रवासात होडके उलटून महासागरात बुडाला आणि त्या निर्दय सागराने त्याचे शव हलकेच उचलून किना:यावर आणून पोचवले.
समुद्रकिना:यावर ओल्या वाळूत उपडा झोपलेला लाल टीशर्टमधला आयलान. कुणीतरी बिछान्यातून उचलून त्याला नुक्ते आणले असावे असा!
निलूफर देमीर नावाच्या तुर्की पत्रकाराने टिपलेले हे करुण छायाचित्र हा 2015 चा भीषण चेहरा आहे.
जीव वाचवायला म्हणून सारे सोडून, देशच सोडून वणवणत बाहेर पडलेल्या, रानोमाळ भटकत, महासागर पार करत शेजारी देशांची दारे ठोठावणा:या माणसांच्या विकल आक्रोशाचा कोलाहल माथी घेऊनच 2015 हे वर्ष इतिहासाच्या पानांमध्ये शिरेल.
प्राचीन काळापासून आजर्पयत अगणित वेळा स्थलांतर किंवा सक्तीने दुस:या प्रांतामध्ये जाण्याची वेळ जगभरातील अनेक देशांच्या नागरिकांवर आलेली आहे. दुस:या महायुद्धाच्या वेळेस लोकांना आपले प्रांत सोडून जावे लागले. युरोपात राहणा:या लाखो लोकांनी इतर युरोपीय देश, अमेरिका असे स्थलांतर केले. इस्नयलच्या भावी स्थापनेसाठी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच ज्यूंनी तिकडे जाण्यास सुरुवात केली. रशिया, युरोप, जर्मनी, पोलंड, आफ्रिका, भारत आणि इतर देशांतून ज्यू इस्नयलच्या वाटेने निघून गेले. त्यानंतर युरोप आणि अमेरिकेने केलेल्या भरभराटीच्या आकर्षणाने आणि पोटापाण्यासाठी अविकसित व विकसनशील देशांतील लोकांनी आपापली घरे सोडली. दुस:या महायुद्धानंतर व्हिएतनाम युद्धाचीही नोंद स्थलांतराबाबतीत आवजरून केली पाहिजे, कारण या युद्धामुळे वीस लाखांहून अधिक लोकांना परागंदा व्हावे लागले. 1978 पासून पुढे एक दशकभर व्हिएतनामी लोक भविष्याच्या शोधासाठी लाकडी बोटी किंवा जहाजे खचाखच भरून समुद्रमार्गे निघत होते. त्यांच्या या मोठय़ा संख्येने बाहेर पडण्यामुळे ‘बोट पीपल’ अशी संज्ञाच त्यांना मिळाली होती. 
गेली काही वर्षे अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आपल्याला हक्काची जमीन मिळेल अशा आशेने प्रत्येक देशाचे दार ठोठावत रोहिंग्यांच्या बोटी फिरत आहेत. अत्यंत साध्या बोटीवरून जीव धोक्यात घालून थायलंड, मलेशिया, इंडोनेशियार्पयत त्यांची सागरी वणवण सुरू आहे. म्यानमार आणि बांगलादेशाने हात झटकल्याने रोहिंग्यांवर ही वेळ ओढवली.
2क्15 हे सरते वर्ष मात्र त्याहून गंभीर अशा स्थलांतर समस्येने गाजले आहे ते म्हणजे सीरियन आणि आफ्रिकन नागरिकांच्या युरोपच्या दिशेने झालेल्या प्रवासामुळे. बशर अल असादच्या दमनशाहीला आणि सीरियातील यादवीला कंटाळून लक्षावधी लोकांनी घरदार सोडून शेजारील देश आणि युरोपचा रस्ता धरला. लेबनॉन, जॉर्डन आणि तुर्कस्थानची क्षमता संपल्यानंतर सीरियन निर्वासितांनी सुकाणू युरोपच्या दिशेने वळविला. 
या वर्षभरामध्ये जवळजवळ दहा लाख लोकांनी युरोपच्या दिशेने स्थलांतर केल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. आजवरच्या इतिहासामध्ये यावर्षाचे हे रेकॉर्डच असावे. युनायटेड नेशन्स हाय कमिशन ऑफ रिफ्युजीच्या (यूएनएचसीआर) नोंदींनुसार इतर देशांत आश्रय मागणा:यांची (असायलम सीकर्स) संख्या या वर्षात नऊ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतकी होती, जी मागील वर्षापेक्षा 78 टक्क्यांहून अधिक आहे. या निर्वासितांमध्ये सीरिया, अफगाणिस्तान, इरिटेरिया, सोमालिया आणि इराक येथील लोकांचा 84 टक्के इतका मोठा वाटा आहे. 
2क्15 हे वर्ष स्थलांतराचे वर्ष म्हणून नक्कीच ओळखले जाईल आणि दहशतवादाविरोधात लढताना निष्पाप लोकांसाठी सामंजस्याची भूमिका घेण्यात प्रगत राष्ट्रे कमी पडलीे हे सत्यही त्यापाठोपाठ येईल.