शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पोरगी पुढंच जायाचं म्हणती

By admin | Updated: July 22, 2016 17:25 IST

कष्टात गेलं, आणखी कसं जाणार? लहानपणापासून आम्ही संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असायचो. शेळ्या, बकऱ्या, गुरे वळण्यात लहानपण गेलं.

ढवळू ठमकेतुमचं आयुष्य कसं गेलं?- कष्टात गेलं, आणखी कसं जाणार? लहानपणापासून आम्ही संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असायचो. शेळ्या, बकऱ्या, गुरे वळण्यात लहानपण गेलं. कधी गाडीवर कामाला जायचो, कधी बिगारी कामाला, तर कधी एखाद्या ट्रॅक्टरवर. मिळेल ते काम करून रोजची भाकरी कमवायची एवढंच आयुष्य. पैशाची चणचण तर रोजचीच. आजही तेच आहे. बदल एवढाच, की पोरं बदलली माझी. आता त्यांच्याकडे नजर लावून असतो. तुम्ही कधी तुमच्या गावाबाहेर पडलात का? मोठं शहर, आपला देश.. यातलं काय माहीत होतं तुम्हाला?- कसं असणार? आणि कशाला? गरजच नव्हती. आणि ऐपत तरी कुठं होती? गणेशगाव आणि नाईकवाडी ही दोन गावं.. बास! त्यातही मी राह्यलो मळ्यात. आमच्या गावातही जायचो नाही फार. वेळच मिळायचा नाही आणि गावात जाऊन करायचं काय? काही खरेदी करायचं तर जवळ पैसे हवेत ना?अंजनाने पळायच्या शर्यतीत भाग घेतल्यावर पहिल्यांदा मी लातूर शहर पाहिलं. अंजना तेव्हा आठवीत होती. लेकीच्या स्पर्धेच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर, गावापासून दूर, हॉस्टेलच्या खोलीत मी तीन दिवस राहिलो. तिथे जेवलो ते मी जेवलेलं पहिलं बाहेरचं जेवण! मग धुळ्याला गेलो अंजनाबरोबर. माझ्या लेकीचीही माझ्यासारखीच गत होती. ही शहरं कशी असतात, इथे गेल्यावर काय करायचं, कसं वागायचं काही माहीत नव्हतं. पोरगी पळली, मेडल जिंकली, की ते घेऊन घरी यायचं. बाकी कुठलं मी शहर बघायला? ‘भारत माझा देश आहे’ हे शाळेत शिकलो, ते अंधुक आठवतं.. पण देश म्हणजे काय असतो, ते मला माहिती नाही. भारत म्हणजे काय असं विचाराल, तर मी गप्प बसून राहीन. माहितीच नाही ना! गणेशगाव हाच माझा भारत. मुलीच्या यशानंतर काही ठिकाणी गेलो, लोकांनी कौतुक केलं, आर्थिक मदत केली. त्यातून थोडं थोडं समजलं, तेवढंच!आपली पोरगी हुशार आहे, हे तुम्हाला कधी कळलं?- मी कविता राऊतबद्दल ऐकलं होतं. पुढे अंजनाचे शिक्षक म्हणाले, की ही पण पळेल, तेव्हा हरखूनच गेलो, की आपली पण पोरगी करील कायतरी. मग शाळेत तिचा सराव सुरू झाला. शाळा सुटल्यानंतर मी तिला बांधांच्या सीमा सांगून पळायला लावायचो. त्यात वेळ कसा कमी होईल ते बघायचो. ती स्पर्धांसाठी प्रवास करायला लागली, तेव्हा गाडीभाड्याचे पैसे नव्हते. मग उधारी करायचो. पैसे देईल त्याच्या घरी मजुरी करून, त्याचे काम करून पैसे फेडायचो.अंजनाच्या आयुष्यात तुमच्या तरुणपणापेक्षा काय चांगलं/वेगळं आहे? - फार नाही फरक. तिच्या नशिबी पण कष्ट फार. माझ्यासारखेच! मी कष्टात संपलो. भूक कशी भागवायची यासाठी कष्ट. तिचे कष्ट वेगळे आहेत, वेगळ्या कारणासाठी आहेत, एवढंच! अंजना खेळते. बाहेर कुठेकुठे जाते. त्यामुळे बाहेरच्या जगाशी आत्ता कुठे गाठ पडली आहे. मला यातलं काही कळत नाही. पण ती वेगळं काहीतरी करील, तिने करावं असं फार वाटतं. माझं आयुष्य नको तिच्या वाट्याला यायला. तुम्हाला अंजनाबद्दल कधी काळजी वाटते का? कशाची?- माझी मुलगी शिक्षणासाठी गणेशगाव सोडून नाईकवाडीला गेली तेव्हापासूनच मला, तिच्या आईला, माझ्या आईवडिलांना सगळ्यांनाच तिची काळजी वाटते. कारण आम्ही बाहेरचं जगच पाहिलेलं नाही. कसं वागायचं, काय करायचं हे कधी कुणी सांगितलं नाही. पण पोरगी पुढेच जायचं म्हणते. तिला मेडल मिळालं पायजे, मोठ्ठं मेडल. पण हे सगळं नीट होईल ना, तिला कुणी त्रास दिला तर याची काळजी वाटते. मी कधी कुणाला सांगत नाही, पण मला कसली काळजी वाटते, हेही मला सांगता येत नाही. मग मी देवावर विश्वास टाकतो. तो पाहील.शब्दांकन : भाग्यश्री मुळे