शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

पोरगी पुढंच जायाचं म्हणती

By admin | Updated: July 22, 2016 17:25 IST

कष्टात गेलं, आणखी कसं जाणार? लहानपणापासून आम्ही संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असायचो. शेळ्या, बकऱ्या, गुरे वळण्यात लहानपण गेलं.

ढवळू ठमकेतुमचं आयुष्य कसं गेलं?- कष्टात गेलं, आणखी कसं जाणार? लहानपणापासून आम्ही संपूर्ण कुटुंब मोलमजुरी करण्यासाठी दिवसभर बाहेर असायचो. शेळ्या, बकऱ्या, गुरे वळण्यात लहानपण गेलं. कधी गाडीवर कामाला जायचो, कधी बिगारी कामाला, तर कधी एखाद्या ट्रॅक्टरवर. मिळेल ते काम करून रोजची भाकरी कमवायची एवढंच आयुष्य. पैशाची चणचण तर रोजचीच. आजही तेच आहे. बदल एवढाच, की पोरं बदलली माझी. आता त्यांच्याकडे नजर लावून असतो. तुम्ही कधी तुमच्या गावाबाहेर पडलात का? मोठं शहर, आपला देश.. यातलं काय माहीत होतं तुम्हाला?- कसं असणार? आणि कशाला? गरजच नव्हती. आणि ऐपत तरी कुठं होती? गणेशगाव आणि नाईकवाडी ही दोन गावं.. बास! त्यातही मी राह्यलो मळ्यात. आमच्या गावातही जायचो नाही फार. वेळच मिळायचा नाही आणि गावात जाऊन करायचं काय? काही खरेदी करायचं तर जवळ पैसे हवेत ना?अंजनाने पळायच्या शर्यतीत भाग घेतल्यावर पहिल्यांदा मी लातूर शहर पाहिलं. अंजना तेव्हा आठवीत होती. लेकीच्या स्पर्धेच्या निमित्ताने आयुष्यात पहिल्यांदा घराबाहेर, गावापासून दूर, हॉस्टेलच्या खोलीत मी तीन दिवस राहिलो. तिथे जेवलो ते मी जेवलेलं पहिलं बाहेरचं जेवण! मग धुळ्याला गेलो अंजनाबरोबर. माझ्या लेकीचीही माझ्यासारखीच गत होती. ही शहरं कशी असतात, इथे गेल्यावर काय करायचं, कसं वागायचं काही माहीत नव्हतं. पोरगी पळली, मेडल जिंकली, की ते घेऊन घरी यायचं. बाकी कुठलं मी शहर बघायला? ‘भारत माझा देश आहे’ हे शाळेत शिकलो, ते अंधुक आठवतं.. पण देश म्हणजे काय असतो, ते मला माहिती नाही. भारत म्हणजे काय असं विचाराल, तर मी गप्प बसून राहीन. माहितीच नाही ना! गणेशगाव हाच माझा भारत. मुलीच्या यशानंतर काही ठिकाणी गेलो, लोकांनी कौतुक केलं, आर्थिक मदत केली. त्यातून थोडं थोडं समजलं, तेवढंच!आपली पोरगी हुशार आहे, हे तुम्हाला कधी कळलं?- मी कविता राऊतबद्दल ऐकलं होतं. पुढे अंजनाचे शिक्षक म्हणाले, की ही पण पळेल, तेव्हा हरखूनच गेलो, की आपली पण पोरगी करील कायतरी. मग शाळेत तिचा सराव सुरू झाला. शाळा सुटल्यानंतर मी तिला बांधांच्या सीमा सांगून पळायला लावायचो. त्यात वेळ कसा कमी होईल ते बघायचो. ती स्पर्धांसाठी प्रवास करायला लागली, तेव्हा गाडीभाड्याचे पैसे नव्हते. मग उधारी करायचो. पैसे देईल त्याच्या घरी मजुरी करून, त्याचे काम करून पैसे फेडायचो.अंजनाच्या आयुष्यात तुमच्या तरुणपणापेक्षा काय चांगलं/वेगळं आहे? - फार नाही फरक. तिच्या नशिबी पण कष्ट फार. माझ्यासारखेच! मी कष्टात संपलो. भूक कशी भागवायची यासाठी कष्ट. तिचे कष्ट वेगळे आहेत, वेगळ्या कारणासाठी आहेत, एवढंच! अंजना खेळते. बाहेर कुठेकुठे जाते. त्यामुळे बाहेरच्या जगाशी आत्ता कुठे गाठ पडली आहे. मला यातलं काही कळत नाही. पण ती वेगळं काहीतरी करील, तिने करावं असं फार वाटतं. माझं आयुष्य नको तिच्या वाट्याला यायला. तुम्हाला अंजनाबद्दल कधी काळजी वाटते का? कशाची?- माझी मुलगी शिक्षणासाठी गणेशगाव सोडून नाईकवाडीला गेली तेव्हापासूनच मला, तिच्या आईला, माझ्या आईवडिलांना सगळ्यांनाच तिची काळजी वाटते. कारण आम्ही बाहेरचं जगच पाहिलेलं नाही. कसं वागायचं, काय करायचं हे कधी कुणी सांगितलं नाही. पण पोरगी पुढेच जायचं म्हणते. तिला मेडल मिळालं पायजे, मोठ्ठं मेडल. पण हे सगळं नीट होईल ना, तिला कुणी त्रास दिला तर याची काळजी वाटते. मी कधी कुणाला सांगत नाही, पण मला कसली काळजी वाटते, हेही मला सांगता येत नाही. मग मी देवावर विश्वास टाकतो. तो पाहील.शब्दांकन : भाग्यश्री मुळे