शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

पळस फुलला, माणुसकीही फुलवूया !

By किरण अग्रवाल | Updated: March 20, 2022 12:21 IST

let humanity flourish : मुक्या प्राण्यांसाठी मायेचा गारवा आकारण्यासाठी माणसांनी माणुसकीच्या ओलाव्याने पुढे येण्याची गरज आहे.

ठळक मुद्देउन्हाचा चटका वाढू लागलामुक्या जिवांची काळजी घेण्याची गरज

- किरण अग्रवाल

शहरी कोलाहलात चिऊताईचा चिवचिवाट क्षीण होत चालला आहे. केवळ चिमणीच कशाला, सर्वच पक्ष्यांचा अधिवास धोक्यात आला आहे. ही जैवविविधता जपायची तर माणसातील माणुसकीचा प्रत्यय आणून द्यावा लागेल. सध्याच्या तापू लागलेल्या उन्हात त्यांच्या संवर्धनासाठी पुढे येण्याची गरज आहे.

 

खऱ्या उन्हाळ्याला अजून सामोरे जायचे आहे; पण आतापासूनच चटका जाणवू लागला आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरणही तापणार आहे. या एकूणच चटका देणाऱ्या वातावरणात मुक्या प्राण्यांसाठी मायेचा गारवा आकारण्यासाठी माणसांनी माणुसकीच्या ओलाव्याने पुढे येण्याची गरज आहे.

 

यंदा पाऊस जोराचा झाला तशी थंडीही कडाक्याची पडली आणि आता उन्हाळाही अंग भाजून काढणारा आहे. आताशी कुठे मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आपण आहोत, तरी उन्हाने अंगाची काहिली होते आहे; त्यामुळे एप्रिल व मे कसा जाईल याच्या विचारानेच अंगात ताप येऊ पाहतो. अर्थात अकोलेकरांना उन्हाचा तडाखा नवीन नाही, पडणारे ऊन अंगावर झेलत दिनक्रम सुरू ठेवण्याची त्यांना सवय आहे. समस्या कितीही असो, सहनशील राहण्यासारखेच हे आहे म्हणायचे. त्यामुळे ऊन वाढू लागल्याचे बघून आता घराघरांतील कुलर्सची साफसफाई सुरू झाली आहे. उघड्या गच्चीवर शेडनेट लावले जात आहेत. हे सारे माणूस माणसासाठी, स्वतःसाठी करीत आहे; पण मुक्या जिवांचे काय?

 

महत्त्वाचे म्हणजे, मनुष्य संकटात मार्ग शोधून घेतोच; पण उन्हाच्या चटक्यांनी व्याकूळणाऱ्या व तहानेने तळमळणाऱ्या जिवांची काळजी वाहून भूतदयेचा विचार फारसा केला जाताना दिसत नाही. नाही म्हणायला काही अपवादही असतातच, त्यात गेल्या हंगामात थंडीने कुडकुडणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या अंगावर अनेकांनी संरक्षणात्मक झूल पांघरल्याचे दिसून आले होते, त्याचप्रमाणे सध्याच्या उन्हाळ्यात त्यांच्यासाठी सावलीचा आसरा करून देणे गरजेचे आहे. शेती पिकविण्यासाठी बळिराजाच्या जिवाभावाचा जोडीदार असणाऱ्या बैलाच्या अंगाखांद्यावर केवळ पोळ्याच्या दिवशी झूल पांघरून एक दिवसाचा सण-उत्सव साजरा करण्यापेक्षा या उन्हाळ्यातही त्याच्या जिवाची काळजी घेण्यातच खरी माणुसकी असेल.

 

वसंत ऋतुमुळे अधिकतर झाडांची पानगळ झाली आहे, त्यामुळे पक्ष्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न पुढे येतोच; शिवाय त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही असतो. शेत शिवारात ही समस्या तितकीशी जाणवत नाही; परंतु शहरी सिमेंटच्या जंगलात पक्ष्यांना पाणी मिळणेही अवघडच बनते. तेव्हा घराच्या बाल्कनीत, व्हरांड्यात पक्ष्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करायला हवी. आजच जागतिक चिमणी दिन आहे. शहरी कोलाहलात अलीकडे चिऊताईचा चिवचिवाट कमी होत चालला असल्याचे अकोल्यातील निसर्ग कट्टाने केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहेच. तेव्हा चिऊताईला जगवायचे, तिचे संवर्धन करायचे तर आज तिच्यासह सर्व पक्षांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याचा प्रण करूया. उन्हाच्या झळांपासून ते कसे बचावतील यासाठी काही करूया.

 

वसंताचे आगमन होतानाच गल्लीबोळांत गुलमोहर, तर रानावनात पळस फुलला आहे. या पळसाचे औषधी गुणधर्म असून, उष्णतेपासून वाचविण्याचेही काम या वनस्पतीद्वारे घडून येते. गुलमोहर व पळसाप्रमाणेच या रखरखत्या उन्हात कासावीस होणाऱ्या प्राणी पक्ष्यांसाठी हरेक व्यक्तीच्या मनामनातील माणुसकी फुलण्याची गरज आहे. त्यातून सुहृदयतेचे जो ओलावा पसरवेल तो मुक्या जिवांचे संरक्षण करायला उपयोगी येईल. विशेषतः लहान मुलांवर यासंबंधीची जबाबदारी सोपवायला हवी. त्यातून त्यांच्यावर भूतदयेचे संस्कारही घडून येतील. रणरणत्या उन्हात बाल्कनीतील गार पाणी पिऊन तृप्त होत उडणाऱ्या चिमणीच्या चिवचिवाटाने मनुष्यहृदयी समाधानाच्या ज्या स्वरलहरी अनुभवास येतील त्याची सर अन्य कशात येणारी नसेल.