शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

अंधकारमय आयुष्याला संगीतमय दिव्यदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:16 IST

-अविनाश कोळी सहानुभूतीच्या वर्षावापेक्षा कलेला मिळणारी दाद, संगीतातून हृदयांना घातली जाणारी साद त्यांना अधिक आनंददायी वाटते. नेत्रपटलापेक्षा मनपटलावर उमटणाऱ्या ...

ठळक मुद्देअंधकारमय, काटेरी आयुष्याला जिद्द, आत्मविश्वासाने फुलविताना मनातील बहराने हजारो लोकांच्या हृदयाला साद घालत जिल्ह्यातील काही अंध मुलांनी समाजाला जगण्याचा आदर्श मूलमंत्र देण्याचे काम सुरू केले आहे. अनेक वाद्ये जशी एकमेकांमध्ये गुंफत सुंदर मैफल सजवित असतात, त

-अविनाश कोळीसहानुभूतीच्या वर्षावापेक्षा कलेला मिळणारी दाद, संगीतातून हृदयांना घातली जाणारी साद त्यांना अधिक आनंददायी वाटते. नेत्रपटलापेक्षा मनपटलावर उमटणाऱ्या आनंदलहरींचा अनुभव त्यांच्या जीवनात रोमांचकारी ठरत असतो. एक-दोन नव्हे, तर अनेक अंध व्यक्तींनी एकत्र येत जगण्याचा आपला मार्ग निश्चित केला. कलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मिरज आणि जिल्ह्यातील डझनभर अंध तरुणांनी एकत्रित येऊन उभारलेला आॅर्केस्ट्रा डोळस घटकांनाही थक्क करणारा आहे. नेत्रांव्यतिरिक्त वाद्यांना साथ देणाºया शरीराच्या अवयवांना जणू डोळे फुटले असावेत असा भास, लिलया वाजणाºया वाद्यांकडे पाहून होत असतो. अंध लोकांचा आर्केस्ट्रा म्हणून कुणी झालेल्या चुका पोटात घ्याव्यात अशी अपेक्षा न ठेवता, अगदी व्यावसायिक कलाकारांच्या तोडीस तोड कला सादर करून लोकांच्या हृदयात वास करण्याचे ध्येय ठेवून हे तरुण पुढे जात आहेत.

सर्वधर्मसमभाव अंध, अपंग सेवाभावी संस्थेमार्फत हा आॅर्केस्ट्रा उभारला आहे. विशेष म्हणजे ही संस्थासुद्धा अंध मुलांमार्फतच चालविली जाते. दावल शेख हे या संस्थेचे अध्यक्षसुद्धा अंधच आहेत. २0१३-१४ मध्ये त्यांनी आॅर्केस्ट्रा उभारून कार्यक्रमांना सुरुवातही केली. हार्मोनिअम, तबला, ड्रम, गिटार, सिंथेसायझर, बासरी, सतार अशा अनेक वाद्यांमधून स्वराविष्कार करणारे हे लोक अंध आहेत, या गोष्टीवर अनेकांचा विश्वासच बसत नाही. तालबद्ध गायकीही यातील काही कलाकारांनी आत्मसात केली आहे. म्हणूनच त्यांची ही कला पाहिली की, संगीतमय दिव्यदृष्टी त्यांना प्राप्त झाल्याची जाणीव प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही. मुला-मुलींचे हे पथक गेल्या पाच वर्षांत नावारूपास आले. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरही त्यांच्या संगीत पथकास बोलावणे येते. कार्यक्रमात कलाकारांना उत्स्फूर्त दाद देणारे अनेक रसिक कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांचे भरभरून कौतुक करीत असतात.

‘अपना जमाना आप बनाते हैं अहल-ए-दिल, हम वो नहीं की जिनको जमाना बना गया,’ असा संदेश देत हे पथक रसिकांच्या मनात घर करीत, संकटाने खचलेल्या मनांनाही प्रेरणा देत आहे. सुमारे १८ ते २0 वयोगटातील हे सर्व तरुण असून, त्यांनी या संगीत पथकातून संस्थेलाही हातभार लावण्याचे काम केले आहे. प्रत्येक कार्यक्रमामागे मिळणाºया २५ हजार रुपयांमधून वाहतूक व अन्य खर्च वगळता राहणारे पैसे संस्थेत जमा केले जातात. सुरुवातीला तोटा स्वीकारून दोन हजार रुपयांमध्येही कला सादर करणाºया या पथकाला आता अनेकजण पसंती देत आहेत. अनेक प्रकारचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी भटकणाºया अंध तरुणांचे दु:ख त्यांनीही भोगले आहे. पूर्णत: अंध लोकांना कुठेही नोकरी दिली जात नाही. याच निराशेतून खचलेले अनेक लोक कुटुंबावर अवलंबून राहू लागतात.

अवलंबित्वातून कौटुंबिक समस्या, समस्येतून पुन्हा नैराश्य... असे दुष्टचक्र त्यांच्याबाबत सुरू होते. अंधत्व असले तरी स्वत:च्या पायावर आपल्याला उभे राहता येते, हा आत्मविश्वास या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाला. त्यापूर्वी ‘नॅब’नेही याच आत्मविश्वासाचे बीजारोपण त्यांच्यात केले होते. म्हणूनच आत्मविश्वासाचा पाया असलेल्या या पथकाला आता यश मिळत आहे. मिरजेतील काही मोजक्याच, पण चांगल्या लोकांनी संस्थेला मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजवर सर्व साहित्य मांडण्यापासून अनेक गोष्टी हे कलाकारच करीत असतात. कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप त्यांचे सादरीकरण असते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमापूर्वी त्यांना कसून सराव करावा लागतो. जुनेद बेलिफ नावाचा एक अंध नसलेला तरुणही त्यांच्याबरोबर असतो. मदतीचे असे काही हात असले तरीही, उणिवांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा आहे. ही वाटचाल काटेरी असलीतरी, आत्मविश्वासाच्या बळावर कलेलासुंदर बहर आला आहे. समाजातीललाखो मनांना सुगंधित करीत ते पुढे जात आहेत.(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत)