शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

अंधकारमय आयुष्याला संगीतमय दिव्यदृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 01:16 IST

-अविनाश कोळी सहानुभूतीच्या वर्षावापेक्षा कलेला मिळणारी दाद, संगीतातून हृदयांना घातली जाणारी साद त्यांना अधिक आनंददायी वाटते. नेत्रपटलापेक्षा मनपटलावर उमटणाऱ्या ...

ठळक मुद्देअंधकारमय, काटेरी आयुष्याला जिद्द, आत्मविश्वासाने फुलविताना मनातील बहराने हजारो लोकांच्या हृदयाला साद घालत जिल्ह्यातील काही अंध मुलांनी समाजाला जगण्याचा आदर्श मूलमंत्र देण्याचे काम सुरू केले आहे. अनेक वाद्ये जशी एकमेकांमध्ये गुंफत सुंदर मैफल सजवित असतात, त

-अविनाश कोळीसहानुभूतीच्या वर्षावापेक्षा कलेला मिळणारी दाद, संगीतातून हृदयांना घातली जाणारी साद त्यांना अधिक आनंददायी वाटते. नेत्रपटलापेक्षा मनपटलावर उमटणाऱ्या आनंदलहरींचा अनुभव त्यांच्या जीवनात रोमांचकारी ठरत असतो. एक-दोन नव्हे, तर अनेक अंध व्यक्तींनी एकत्र येत जगण्याचा आपला मार्ग निश्चित केला. कलेचे शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या मिरज आणि जिल्ह्यातील डझनभर अंध तरुणांनी एकत्रित येऊन उभारलेला आॅर्केस्ट्रा डोळस घटकांनाही थक्क करणारा आहे. नेत्रांव्यतिरिक्त वाद्यांना साथ देणाºया शरीराच्या अवयवांना जणू डोळे फुटले असावेत असा भास, लिलया वाजणाºया वाद्यांकडे पाहून होत असतो. अंध लोकांचा आर्केस्ट्रा म्हणून कुणी झालेल्या चुका पोटात घ्याव्यात अशी अपेक्षा न ठेवता, अगदी व्यावसायिक कलाकारांच्या तोडीस तोड कला सादर करून लोकांच्या हृदयात वास करण्याचे ध्येय ठेवून हे तरुण पुढे जात आहेत.

सर्वधर्मसमभाव अंध, अपंग सेवाभावी संस्थेमार्फत हा आॅर्केस्ट्रा उभारला आहे. विशेष म्हणजे ही संस्थासुद्धा अंध मुलांमार्फतच चालविली जाते. दावल शेख हे या संस्थेचे अध्यक्षसुद्धा अंधच आहेत. २0१३-१४ मध्ये त्यांनी आॅर्केस्ट्रा उभारून कार्यक्रमांना सुरुवातही केली. हार्मोनिअम, तबला, ड्रम, गिटार, सिंथेसायझर, बासरी, सतार अशा अनेक वाद्यांमधून स्वराविष्कार करणारे हे लोक अंध आहेत, या गोष्टीवर अनेकांचा विश्वासच बसत नाही. तालबद्ध गायकीही यातील काही कलाकारांनी आत्मसात केली आहे. म्हणूनच त्यांची ही कला पाहिली की, संगीतमय दिव्यदृष्टी त्यांना प्राप्त झाल्याची जाणीव प्रत्येकाला झाल्याशिवाय राहत नाही. मुला-मुलींचे हे पथक गेल्या पाच वर्षांत नावारूपास आले. जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरही त्यांच्या संगीत पथकास बोलावणे येते. कार्यक्रमात कलाकारांना उत्स्फूर्त दाद देणारे अनेक रसिक कार्यक्रम संपल्यानंतरही त्यांचे भरभरून कौतुक करीत असतात.

‘अपना जमाना आप बनाते हैं अहल-ए-दिल, हम वो नहीं की जिनको जमाना बना गया,’ असा संदेश देत हे पथक रसिकांच्या मनात घर करीत, संकटाने खचलेल्या मनांनाही प्रेरणा देत आहे. सुमारे १८ ते २0 वयोगटातील हे सर्व तरुण असून, त्यांनी या संगीत पथकातून संस्थेलाही हातभार लावण्याचे काम केले आहे. प्रत्येक कार्यक्रमामागे मिळणाºया २५ हजार रुपयांमधून वाहतूक व अन्य खर्च वगळता राहणारे पैसे संस्थेत जमा केले जातात. सुरुवातीला तोटा स्वीकारून दोन हजार रुपयांमध्येही कला सादर करणाºया या पथकाला आता अनेकजण पसंती देत आहेत. अनेक प्रकारचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी भटकणाºया अंध तरुणांचे दु:ख त्यांनीही भोगले आहे. पूर्णत: अंध लोकांना कुठेही नोकरी दिली जात नाही. याच निराशेतून खचलेले अनेक लोक कुटुंबावर अवलंबून राहू लागतात.

अवलंबित्वातून कौटुंबिक समस्या, समस्येतून पुन्हा नैराश्य... असे दुष्टचक्र त्यांच्याबाबत सुरू होते. अंधत्व असले तरी स्वत:च्या पायावर आपल्याला उभे राहता येते, हा आत्मविश्वास या संस्थेच्या माध्यमातून निर्माण झाला. त्यापूर्वी ‘नॅब’नेही याच आत्मविश्वासाचे बीजारोपण त्यांच्यात केले होते. म्हणूनच आत्मविश्वासाचा पाया असलेल्या या पथकाला आता यश मिळत आहे. मिरजेतील काही मोजक्याच, पण चांगल्या लोकांनी संस्थेला मदतीचा हात देण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्टेजवर सर्व साहित्य मांडण्यापासून अनेक गोष्टी हे कलाकारच करीत असतात. कार्यक्रमाच्या प्रसंगानुरूप त्यांचे सादरीकरण असते. त्यामुळे प्रत्येक कार्यक्रमापूर्वी त्यांना कसून सराव करावा लागतो. जुनेद बेलिफ नावाचा एक अंध नसलेला तरुणही त्यांच्याबरोबर असतो. मदतीचे असे काही हात असले तरीही, उणिवांचा डोंगर त्यांच्यासमोर उभा आहे. ही वाटचाल काटेरी असलीतरी, आत्मविश्वासाच्या बळावर कलेलासुंदर बहर आला आहे. समाजातीललाखो मनांना सुगंधित करीत ते पुढे जात आहेत.(लेखक ‘लोकमत’च्या सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत)