शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

वरवरचे एकेरी दिसणाऱ्या माणसांच्या आत दडलेली माणसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:25 IST

ललित : आपल्या जीवनप्रवासात असंख्य माणसं भेटतात. काही माणसे रेतीवरील अक्षराप्रमाणे येतात आणि कालांतराने तशीच लाटेबरोबर विसरूनही जातात. काही त्या खडकासारखी वर्षानुवर्षे एखाद्या घटनेची साक्ष देत राहतात. अशा अनेक व्यक्तींच्या सहवासाने आपले आयुष्य घडत राहते. साहजिकच आपण त्यांना ओळखतो असे म्हणतो. थोडक्यात काय तर ती माणसं आपल्याला कळतात. असे आपण धरून चालतो.

- सुषमा सांगळे-वनवे

माणूस कळणे म्हणजे नेमके काय? प्रत्येकाची कल्पना वेगळी असावी. एखाद्याची नोकरी, त्याची मुलेबाळे, त्याची चेहरेपट्टी आणि एकंदर त्याचे समाजातील स्थान कळले की, तो माणूस कळला अशी आपली समजूत होते. हे झाले इतरांच्या बाबतीत पण आपण स्वत:चे स्वत:ला तरी कुठे कळलेलो असतो? आपल्याच स्वभावातील कानेकोपरे, चित्रविचित्रपणा, इंद्रधनुसमान अचानकच उमटणाऱ्या विविध रंगी छटा याची कशाचीच आपल्याला कल्पना नसते. तरीही भासमान क्षितिजासारखे आपण उगीच मी अशी, मी तशी, असे म्हणत असतो.

बऱ्याचवेळा आपण एखादी कृती करून जातो आणि पुन्हा अगदी सहज म्हणतो ही 'माझी अक्कल कुठे मातीत गेली होती देव जाणे', ' मी हा गाढवपणा करून मोठी चूक केली'याचाच अर्थ आपली आपल्याला ही ओळख पटलेली नसते.विशिष्ट वेळी आपण कसे वागू, एखाद्या प्रसंगी आपल्या कोणत्या प्रतिक्रिया येतील याचा कशाचाच आपल्याला अंदाज नसतो. ज्यांना आपण वर्षानुवर्षे पाहतो, त्याच्या स्वभावाची खात्री देतो अशी एखादी व्यक्ती भलतेच कृत्य करते. त्यावेळी आपण सहज म्हणूनही जातो. ‘स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते’  'या गोष्टीवर विश्वासच बसत नाही ना.? याचे कारण म्हणजे ओळखीच्या माणसांना सुद्धा आपण पुरेसे ओळ्खलेलो नसतो.

एक घटना आठवली म्हणून सांगते.माझा एक विद्यार्थी  अगदी शांत, मितभाषी स्वभावाचा आणि तेवढाच हुशार ही. दिसायला अगदी साधारण.मुळातच मितभाषी असल्यामुळे तसा तो कोणाशी जास्त बोलत ही नसायचा.त्याचे आईबाबा ही कायम त्याचे कौतुक करायचे. इतर मुलांसारखा टवाळखोर, उनाडपणा त्याच्याकडे कधीच नव्हता. त्याची स्वप्नेही अगदी मोठा आॅफिसर बनण्याची होती. बऱ्याच वर्षांनी त्याची व माझी अचानक बसस्टँडवर भेट झाली. मी दिसल्याबरोबर तो स्वत:च माझ्याकडे आला. आणि 'कशा आहात?' असे अदबीने विचारलेही. मी बरी आहे. असे म्हणत त्याच्यासोबत असलेल्या गोरीगोमट्या मुलीबाबत 'ही कोण?' म्हणून विचारणा केली 'माझी बायको आहे, गेल्या महिन्यातच आम्ही लव्हमॅरेज केले.' या उत्तराने मी पुरती अवाक झाले. एवढा शांत,आणि मितभाषी मुलाने एवढी गोरीगोमटी सुंदर मुलगी कशी काय पटवली असेल, या विचारात नुसती गोंधळून गेले. मनात विचार आले आपण कल्पना करत होतो त्यापेक्षा हा मुलगा किती वेगळा होता.त्याच्यात एवढे डेअरिंग कुठून आले असेल? माणसाच्या आत पुन्हा वेगळी माणसे दडलेली असतील का?

आणखी एक उदाहरण म्हणजे माझा क्लासमेट ज्याला मी लहानपणापासून पुरती ओळखायचे. दहावीत नापास झाला म्हणून वडिलांनी बाहेर काढलेले ही होते. शाळेची त्याला मुळी आवडच नव्हती स्वभावाने अगदी हट्टी आणि उनाड असणारा. आई वडिलांनी त्याच्या शिक्षणाची आशाच सोडून दिली होती.  नंतर खूप वर्षे आमचा कांही संपर्कच नव्हता.बऱ्याच वर्षांनी त्याची आई मला रस्त्यात दिसली मी खूप मोठ्या आपुलकीने विचारले. ‘आमचा मित्र काय करतो’ तिने अगदी सहज उत्तर दिले 'अमेरिकेत आहे', 'हा काय त्याचा बंगला' अत्याधुनिक पद्धधतीने बांधलेले करोडो रुपयांचे त्याचे घर पाहून क्षणभर मी स्तिमित झाले. मनात विचार आले. या उनाड, बेपर्वा मुलामध्ये कर्तबगार, महत्त्वाकांक्षी, गुणी मुलगा कुठे लपून बसला होता. आणि त्याच्या या गुणांचा मला थांगपत्ताही कसा लागला नाही.आपले सर्वांचे व्यक्तिमत्त्व एकंदर पाहता वरवरचे, दिखाव्याचे तर नसेल कशावरून? अशा वरवरचे एकेरी दिसणाऱ्या माणसांच्या आत आणखी किती माणसे दडलेली असतील कोण जाणे?

टॅग्स :Socialसामाजिकliteratureसाहित्य