शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

बुडत्याला काडीचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 16:38 IST

निसर्गाच्या कुशीत : मराठवाड्यातील सध्याच्या भीषण दुष्काळ परिस्थितीमुळे वन्य पशू-पक्षी थेंबभर पाण्यासाठी, चिमूटभर घासाच्या शोधार्थ रानोवनी भटकंती करीत आहेत. 

- सिद्धार्थ सोनवणे 

अन्न-पाण्याच्या शोधात असलेले एक दुर्मिळ जावडी मांजर नुकतेच पाडळी येथील प्रगतिशील शेतकरी काळू सरवदे यांच्या शेतातील पाण्याचा हौदात पडले होते. त्याचे प्राण वाचविण्यात आम्हाला यश आले असले तरी खऱ्या अर्थाने त्याचे प्राण वाचले ते त्या हौदात असलेल्या वाळलेल्या लाकडाच्या ओंडक्यामुळे! ‘बुडत्याला काडीचा आधार’ ही म्हण येथे प्रत्यक्षात प्रत्ययास आली होती.

दुष्काळामुळे जंगलातील नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटल्याने तहानलेल्या वन्य पशू-पक्ष्यांची तृष्णा भागविण्यासाठी पाडळी येथील शेतकरी काळू सरवदे यांनी त्यांच्या शेतातील हौदात पाणी भरून ठेवले. या पाण्यावर परिसरातील वन्यजीव आपली तहान भागवत. काही दिवसांनी जेव्हा सरवदे पुन्हा हौद भरण्यासाठी गेले तेव्हा त्यांना हौदात एक अनोळखी प्राणी पडलेला दिसला. त्यानंतर त्यांनी तात्काळ मला या घटनेची माहिती दिली. मी अवघ्या पाच मिनिटांत तेथे पोहोचलो. पाहतो तर हौदात दुर्मिळ जावडी मांजर पाण्यावर तरंगत असलेल्या वाळलेल्या लाकडी ओंडक्यावर आधार घेऊन बसलेले.

ते बऱ्याच दिवसांपासून हौदात अडकलेले असावे. त्याचे भुकेने पोट पार आत गेलेले. शरीर थरथरत होते. हालचाल मंदावलेली. अशा अवस्थेतही जेव्हा विठ्ठल सरवदे यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी पकडले तेव्हा या जावडी मांजराने त्यांच्या अंगावर गुदद्वाराच्या जवळ असलेल्या ग्रंथीतून घाणेरडा उग्र दुर्गंधीयुक्त पिवळसर स्राव अंगावर सोडला, तसे ते जावडी मांजर माझ्या हवाली केले. मी त्याला पोत्यात घातले आणि हौदातील पाणी शेवटपर्यंत प्राण्यांना पिता यावे, त्यांना हौदातून बाहेर येता यावे यासाठी मोठे लाकूड, मोठा दगड हौदात ठेवण्याचे सांगून त्यांचा निरोप घेतला.

सर्पराज्ञीत आणल्यानंतर मी व सृष्टीने त्याला कपड्याने पुसून पूर्ण कोरडे करून घेतले. तरीही त्याचे शरीर थरथर करीतच होते. तोल जात होता. त्यामुळे त्याला कोवळ्या उन्हात ठेवले. अर्ध्या तासाने ग्लुकोजचे पाणी पाजले. त्यानंतर त्याला पिंजऱ्यात ठेवून खाण्यासाठी केळी टाकली. उदमांजरे मांसाहारी आणि शाकाहारीही असतात. तीन     तासांनंतर त्याच्या शरीराची थरथर थांबली. त्यानंतर त्याने केळी खाली.दुसऱ्या दिवशी ते पिंजऱ्यात फिरू लागले. ते बरे झाले होते; परंतु त्याला थोडी विश्रांती आणि शरीरात थोडी ताकद येण्यासाठी आम्ही त्याला एक आठवडा ठेवून पुन्हा त्याला निसर्गात सोडून दिले.  

(लेखक : सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, ता. शिरूर कासार, जि. बीडचे संचालक आहेत.)

टॅग्स :Natureनिसर्गWaterपाणीBeedबीड