शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
2
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
3
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
4
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
5
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
6
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
7
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
8
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
9
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
10
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
11
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
12
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
13
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
14
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
15
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
16
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
17
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
18
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
19
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
20
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात

इतरांचे कीर्तन अन् सत्यपालांचे वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:59 PM

महाराष्ट्र कीर्तनाची परंपरा मानणारा प्रदेश आहे. पण कीर्तनाची परंपरा मानणारा इथला माणूस कीर्तनकारांच्या वर्तनावर मोठे बारकाईने लक्ष ठेवत असतो. भागवत सप्ताहासाठी आले अन् गावातील सून घेऊन गेले... ही वार्ता एका महाराजांबद्दल विदर्भात वादळ उठवून गेली. अमुक अमुक उपाय केला, म्हणजे पोरं होतील म्हणणारे महाराज तर अजूनही वादाच्या वादळात फसलेलेच आहेत.

  • अविनाश साबापुरे

कीर्तनाच्या नावाने समाजाला केवळ शब्दांच्या बुडबुड्यांवर हेलकावत ठेवायचे अन् लाख दोन लाखांची बिदागी मिळवून तथास्तु म्हणायचे. या बोलघेवड्या कीर्तनकारांच्या वावटळीत ‘सत्यपाल’ महाराजांचे वर्तन मात्र सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून गेले.मागच्या आठवड्यातली गोष्ट आहे. वर्धा जिल्ह्यात सत्यपाल महाराजांचे कीर्तन सुरू होते. तेवढ्यात दु:खद निरोप आला. घरी अकोटमध्ये (जि. अकोला) सत्यपाल महाराजांची आई गेली होती. पण समाजप्रबोधनाचे काम करीत असताना ते अर्धवट ठेवून जायचे नाही, हा निर्धार कायम ठेवत सत्यपाल महाराजांनी कीर्तन सुरूच ठेवले. नंतर घरी जाऊन आईचे अंत्यदर्शन घेतले. अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात आईचे देहदान केले. तेरवी, केशदान हे सोपस्कार टाळून गरजू नागरिकांना अन्नदानाचा संकल्प जाहीर केला.दुसऱ्याच दिवशी यवतमाळ जिल्ह्यातल्या जांब गावात कीर्तनाची तारीख ठरलेली होती. गावकऱ्यांना वाटले, महाराजांची आई गेली आहे. एवढ्या दु:खात सत्यपाल महाराज कदाचित जांब गावात पोहोचणार नाहीत. पण आश्चर्य, ठरलेल्या वेळी घड्याळाच्या काट्यावर बरोब्बर महाराज पोहोचले अन् तेवढ्याच तन्मयतेने कीर्तनही केले. गावकºयांनी सुरूवातीला सत्यपाल महाराजांची आई सुशीलाबाई चिंचोळकर यांची प्रतिमा ठेवून श्रद्धांजली अर्पण केली.पण आई होती तेव्हा, आई गेली त्यावेळी आणि आईचे देहदान केल्यावर सत्यपाल महाराजांची सत्यवाणी होती तशीच ताठर, प्रामाणिक राहिली. कीर्तनापेक्षाही काकणभर अधिक प्रामाणिक वर्तन ठेवणारे सत्यपाल महाराज म्हणूनच विदर्भवासीयांच्या गळ्यातले ताईत आहेत. राहणार आहेत.कित्येक लिहित्या पोरांचे पुस्तक स्वखर्चाने छापून देण्याचे साहित्यिकांपेक्षाही थोर कार्य सत्यपाल महाराजांनी केले आहे. तीन वर्षांपूर्वी मुंबईतल्या कार्यक्रमात एका माथेफिरूने त्यांच्यावर चाकूहल्ला केला, तेव्हा रस्त्यावर मोर्चे निघाले नाहीत, की निषेधाचे आंदोलन झाले नाही. कारण खुद्द सत्यपाल महाराजांनीच लगेच जाहीर केले, ‘मरने से क्या डरना?’ सध्या काही महाराजांचे अनुयायी जरा टीका झाली की जसे मोर्चे काढतात, तशी आक्रमक भूमिका ना सत्यपाल महाराज घेतात ना त्यांचे चाहते घेतात. कारण त्यांचा विश्वास आहे, स्वत:च्या वर्तनावर. तोच विश्वास समाज पेरण्याचे सत्कार्य सत्यपाल महाराजांच्या हातून कायम घडत राहो. 

आईची इच्छा होती विमानात बसण्याची...

सत्यपाल महाराजांच्या आई सुशीलाबाई चिंचोळकर. त्यांचा स्वत:चा संकल्प होता देहदानाचा. तो त्यांच्या मुलाने पूर्णही केला. काही महाराजांना राजकारणी मंडळींचा भक्तसमुदाय लाभला की ते ‘व्हीआयपी’ महाराज बनून जातात. सत्यपाल महाराजांना मानणारे राजकीय नेते कमी नाहीत. त्यांनी मनात आणले असते, तर ते लौकिक अर्थाने ‘श्रीमंत’ झाले असते. पण सत्यपाल महाराजांची श्रीमंती पैशाच्या पलीकडची आहे. ती त्यांच्या स्वच्छ स्वभावात अन् विनम्र वर्तनात आहे. एक असाच किस्सा... केंद्रात नागरी उड्डयण मंत्री असलेल्या एका चाहत्याने सत्यपाल महाराजांना एकदा विचारले, महाराज मला तुमच्यासाठी काहीतरी करायचे आहे. काय करू? महाराज म्हणाले, मला बाकी काही नको. माझ्या आईला एकदा विमानात बसायचे आहे. मग महाराजांचे आईवडीलच नव्हे तर अवघे गाव विमानात बसून आले. आईचा आनंद हेच माझे सर्वस्व, मानणाऱ्या सत्यपाल महाराजांनी आईच्या निधनाची वार्ता कळल्यावरही कीर्तन थांबविले नाही. यावरूनच कीर्तन ऐकायला येणारी गोरगरीब जनता हीच सत्यपाल महाराजांसाठी मातृस्थानी आहे, हे दिसते.

टॅग्स :Socialसामाजिक