शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
6
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
7
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
8
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
9
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
10
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
11
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
12
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
13
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
14
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
15
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
16
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
17
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
18
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
19
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
20
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...

माझ्यासारख्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 7:53 PM

हरवलेली माणसं : मातीशी चाळा करीत एकाकी बसलेला, पांढुरक्या दाढीच्या वाढलेल्या जटांतून उमटून पडणारा मळाचा काळपट डाग त्याच्या चेहऱ्याला अधिकच भेसूर बनवत होता. अंगावर कपड्याचा तुकडाही नसताना त्याला कशाचीही फिकीर नव्हती. 

- दादासाहेब श्रीकिसन थेटे

एक कप चहा, एक विडी ही त्याची गरज आणि त्याच गरजेपोटी भानू एका चहाच्या टपरीवरून, दुसऱ्या टपरीवर दिवसभर येरझाऱ्या मारायचा. दररोज दिसणारे चेहरे त्याला ओळखीचे वाटायचे. या चेहऱ्यांनाही तो चांगलाच माहीत होता. तरीही ओळख दाखवून प्रेमाचे दान देणारे चेहरे मात्र फार क्वचितच असायचे. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण न करणारा सुजाण समाज या मनोरुग्णांना (माणसांना) माणसातून वारंवार बहिष्कृत करतोय हा अनुभव भानूच्या वेळीही मी अनुभवला. त्यांची विवंचना जर शहाण्या समजणाऱ्या समाजाला जाणवत नसेल, तर समाजशील म्हणवणारा माणूस किती अप्पलपोटी आणि आत्मसंतुष्टी झाला याचा प्रत्यय या बेवारस मानवी देहाकडे पाहून अनुभवायला येत होता. या मूळ गरजांपेक्षाही प्रेम आणि आपुलकी हीच त्याच्या जगण्याची गरज होती. हे सहवासातून आणि त्याला केलेल्या मायेच्या एका स्पशार्तून आम्हाला जाणवले होते.

‘भानू’ या हाकेला प्रेमाचा ओलावा देत पुकारले की, त्याची नजरा सैरभर होत होती. आजवर मनोरोगाचा शाप मिळाल्यापासून आपला विटाळ पाळणारा समाज आज आपल्याला मोटार गाडीत शेजारी बसवून कुठेतरी घेऊन जातोय या एका जाणिवेने तो बहुधा मनातून पाणावून गेला असावा. त्याला अंघोळ घालताना त्याच्या किळसवाण्या शरीरावर मायेचा फिरणारा हात त्याच्या जगण्यात अनामिक सुगंध भरत होता. वाढलेली नखे मोठ्या काळजीवाहूपणाने कापणारी समाजभान पोरं त्याला जणू जुन्या आठवाणीतच घेऊन जात होती. सांगितलेल्या सूचनेनुसार त्याने आपल्या हालचाली केल्या. त्याच्या अंगा-अंगातून घाणीचा दुर्गंध साबण, शाम्पूच्या फेसाबरोबर आणि माणुसकीच्या स्पर्शाने नाहीसा झाला होता. अंगावर ढीगभर साचलेला मळ पाण्याबरोबर धुऊन गेला होता. तशी भानूला तरतरी जाणवली होती. त्याचा चेहरा खुलला होता. जी गावातली पोरं आजवर त्याची किळस करीत होती तीच पोरं आता त्याला नवे कपडे आणत होती, तर कुणी टॉवेल, कुणी नेल कटर, तर कुणी चपला आणून देत होती...! गावातल्या प्रत्येक पोरात भानूमुळे माणुसकीचे समाजभान भिनल्यागत प्रत्येक जण भानूसाठी तळमळ करीत होता.

आपला भानू माणसागत दिसू लागला हे पाहून गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ज्या गावातल्या लोकांनी आजवर नाकारले त्याच भानूला पाहायला अख्खा गाव गोळा झाला होता. शोधला तर देवही सापडतो, तसाच आपल्यातलाच हरवलेला एक माणूस त्यादिवशी सापडल्यामुळे गावकरी जल्लोष करीत होते. एखाद्या नवविवाहित मुलीला बिदाई करते वेळेस जसा सारा गाव भावविवश होऊन तिला सासरी पाठवतो, तशीच भानूला बिदाई करायला सगळा गाव जमला होता. भानूच्या बदलत्या रूपड्यासोबत सेल्फी काढणारी गावातली मुले जणू माणसात माणूस शोधण्याची कला या भानूकडे पाहून अनुभवत होती.

यानंतर कोणत्याही समाजभान मोहिमेचा आम्हीही भाग होऊ, असे उत्साहाने बोलणारी तिथली पोरं एका कृतीतून एवढी प्रेरित झालेली पाहून मी मनातून ऊर्जित झालो होतो. हरवलेल्या समाजव्यवस्थेत हे माणुसकीचे समाजभान जागृत होताना पाहून आणि आणखी एक बेघर मानसाच्या डोक्यावर छत उभे करताना जिंदगी वसूल झाल्याचा परमोच्च आनंद, आज मी पुन्हा अनुभवत होतो. आता भानू बरा होऊन त्याच्या घरी परत येतोय. अगदी माणसासारखा होऊन!  आनंद दिल्याने वाढतो. आयुष्य वाटल्याने वाढते. आज जेवढे दिले तेवढेच मला परत मिळत होते. आज परत एक माणूस जन्माला घातल्याचा आनंद होत होता. (लेखक समाजभान टीमचे संस्थापक  आहेत)  

 ( Sweetdada11@gmail.com )

टॅग्स :SocialसामाजिकAurangabadऔरंगाबाद