शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

जे कळतं, ते वळत का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 6:01 AM

स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना? तसंच आहे मनाचं! उपाय कळून काय उपयोग ?- कृती करावीच लागणार ना?

ठळक मुद्देपाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?

डॉ. राजेंद्र बर्वे

‘मला न सगळं कळतं, सगळं म्हणजे सगळंच अगदी कळतंच! आपल्याला ना दोन मनं असतात. एक कॉन्शस माइंड आणि अनकॉन्शस. मला ना तशीच दोन मनं आहेत.’ माझ्यासमोर बसून बोलणारी महिला सिक्सरवर सिक्सर मारत होती.

‘कळतंय ना तुम्हाला?’

मी मान डोलावली, ‘म्हणजे साधारण कळतंय..!’

‘तर माझं अनकॉन्शस माइंड आहे ना, त्याच्यापर्यंत संदेश पोहोचतच नाही. त्यामुळे अनकॉन्शस माइंडमधून योग्य मेसेज मला म्हणजे कॉन्शस माइंडला मिळतच नाहीत!’

- हे असे दणादण षटकार मारणाऱ्या फलंदाजाचं अवसान बघताबघता गळालं. डोळ्यात अश्रू आले! मी टिश्यू पेपर दिला. काही वेळ तसाच गेला. असं बरेचदा होतं. आपली समस्या नीट कळली आहे असं समजून आपण स्वत:ची समजूत काढतो. वरवर समजूत पटते; पण ‘दिल हैं के मानता नही’ अशी अवस्था होते.

‘मला ना खूप भीती वाटते. मनाला कितीही समजावलं, तरी भीती संपत नाही. भीतीचं रूपांतर काळीज कुरतडणाऱ्या काळजीत होतं. धीर सुटतो. सगळं कळतं, पण वळत नाही! मग वाटतं कळलंच नसतं तर बरं झालं असतं. अज्ञानातच सुख असतं ना!’

शेवटी मी त्यांना शांत करीत म्हणालो, ‘म्हणजे तुमची समस्या तुम्हाला कळली आहे; पण प्रत्यक्षात त्या कळण्यानुसार तुमच्यात काही फरक पडत नाहीय. कळलेलं वळत नाहीय, समजेची उमज होत नाहीये!’

‘होय, अगदी बरोबर!’ त्या म्हणाल्या!

रुग्ण तसे साधे असतात. त्यांच्या सभोवतालचे लोक खरं म्हणजे त्यांची टिंगलटवाळी करीत असतात. त्यांना खूप त्रास होत असतो म्हणून ते.

‘मी मानसशास्त्राचा खूप अभ्यास करते वाटलं की ते वाचून सगळं आपोआप वळू लागेल..!’

‘तसं नसतं हो,’ मी त्यांना म्हणालो, ‘हे सगळे त्रास मानवशरीर धर्माचे असतात. मनुष्य जन्माला धरूनच येतात. अभ्यास करून माहिती आणि कधी ज्ञानही मिळतं; पण त्यामुळे आपल्या वैयक्तिक त्रासाचे, विकाराचे नि यातनेचे प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे एक फायदा होतो. आपण आपलं दु:ख, यातना आणि विकाराचं स्वरूप स्वीकारतो; पण समजा मलेरियाचा ताप आला, तर त्याची सर्व लक्षणं पारखून मलेरिया बरा होईल का? ताप कसला आहे ते कळलं तरी तो आपोआप उतरत नाही ना! तुमचं तसं होतंय. समस्येचं स्वरूप आणि मनाची अशी मांडणी कळली तरी प्रश्न आपोआप विरून जात नाहीत. त्याकरिता वेगळे उपाय करावे लागतात. मनाला चुचकारून, गोडीगुलाबीने पटवून नव्या सवयी लावून घ्याव्या लागतात. अगदी घरगुती उदाहरणावरून ही लक्षात येईल तुमच्या!’

बाई खूप विचारात पडल्या आणि डोळे पुसून म्हणाल्या, ‘आलं लक्षात, अहो स्वयंपाक करण्याआधी योग्य ती सामग्री गोळा केली तरी अन्न शिजवावं लागतंच ना?’

मी म्हणालो, ‘अगदी बरोबर समजलं. मी या प्रक्रियेला माइंड लर्निंग आणि बॉडी लर्निंग म्हणतो. म्हणजे मन शिकून समजून घेता येतं, पण अनुभवानं, प्रयत्नानं शरीराच्या अंगवळणी पडावं लागतं. त्याला काही काळ जावा लागणारच ना! काही भाज्या पटकन शिजतात, तर काहींना बराच वेळ लागतो, त्यासाठी समज आणि चिकाटी हवी. सगळ्या भाज्या आणि पदार्थ एकाच विशिष्ट वेळात शिजलेच पाहिजेत असा हट्ट का?’

- बाई एकदम सावरल्या. म्हणाल्या,

‘माझं काय चुकलं हे लक्षात येतंय आता! मी भीती कशी व का निर्माण होते यावर नेटवर खूप रिसर्च केला. खूप माहिती जमा केली; पण पाच मिनिटांचीही ध्यानधारणा केली नाही. योगासनं शिकले नाही. साधा प्राणायामही केला नाही, तर माझी भीती कशी जाणार?’

मी हसत म्हणालो, ‘कोच खेळाडूला शिकवितो, शिक्षक शिक्षण देतात; पण खेळायचं, शिकायचं, त्यासाठी धडपडून प्रयत्न करायचे हे आपलं काम असतं ना!’

(ख्यातनाम मनोविकारतज्ज्ञ)

drrajendrabarve@gmail.com