शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नांदेडमध्ये धोक्याच्या काठावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 09:05 IST

आपल्या नद्या, आपले पाणी : नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे नदीपात्राच्या रचनेत बदल होणे, नदीतील गाळाचे प्रमाण वाढणे, पाण्याची झिरप जास्त होऊन नदीतील पाणी कमी होणे, तसेच नदीतील मासे, झिंगे आणि इतर जलीय जिवांचे अधिवास धोक्यात येणे हे दुष्परिणाम संभवतात.

- प्रा. विजय दिवाण 

नाशिकपासून उगम पावणारी गोदावरीनदी अहमदनगर, औरंगाबाद, परभणी या जिल्ह्यांतून वाहत नांदेड जिल्ह्यात प्रवेश करते. तिथे खुद्द नांदेड शहराच्या मध्यातून वाहत जाऊन ही नदी पुढे तेलंगणा राज्यात प्रवेश करते. नांदेड शहरातील सुमारे चार किलोमीटर लांबीच्या गोदावरीपात्राच्या किनाऱ्यावर ब्रह्मपुरी, इदगाहघाट, नवाघाट, रामघाट, उर्वशीघाट, शनिघाट, गोवर्धनघाट असे पायऱ्या बांधलेले अनेक घाट आहेत. त्यातील बहुतेक घाटांवर स्मशाने आणि दशक्रिया विधी करण्याच्या जागा निर्माण केलेल्या आहेत. शहरात निधन पावणाऱ्या व्यक्तींच्या मृतदेहांचे दहन गोदाकाठच्या या स्मशान घाटावरच केले जाते. 

दररोज एखाद-दुसरे शव तिथे जळत असताना दिसते. दहनानंतर उरणाऱ्या अस्थी आणि पोते भरून निघणारी राख गोळा करून त्यांचे विसर्जन नदीच्या पाण्यात तिथेच केले जाते. जिथे दहन करतात त्याच घाटांवर नंतरच्या दशक्रियाही केल्या जातात. नांदेड शहरातून वाहणाऱ्या या गोदावरीच्या दोन्ही काठांवर दाट लोकवस्ती आहे. अनेक ठिकाणी नदीच्या कमाल पूर पातळी रेषेच्या आतच दाटीवाटीने घरे बांधलेली आहेत. काही ठिकाणी नदीकाठी काँग्रेस गवत, वेडी बाभळ आणि इतर काटेरी झुडपांचे रान माजलेले आहे. सकाळच्या वेळी आजूबाजूच्या वस्त्यांतील अनेक जण त्या रानात प्रातर्विधीला बसलेले दिसतात. शिवाय नदीकाठी असणाऱ्या स्मशानघाटांच्या जवळ जी मंदिरे उभारलेली आहेत त्यातून निघणाऱ्या निर्माल्याचे ढीगही काठांवर साचलेले असतात. त्यामुळे नदीकाठांवरून चालत जाणाऱ्यांना तिथे प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागतो. 

नदीच्या दुसऱ्या काठालगत शीख पंथियांचे तीन गुरुद्वारे आहेत. त्याच्या समोरच्या नदीकाठच्या भागात सिमेंटच्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. तसेच भाविकांना जाणे-येणे सुलभ व्हावे म्हणून नदीकाठी सिमेंटचा एक रस्ताही बांधला आहे. आजूबाजूच्या वस्त्यांमधून राहणारे अनेक लोक आपापल्या घरातला कचरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून नदीकाठी येतात आणि तो कचरा नदीत फेकून देतात. नांदेड शहराच्या हद्दीत गोदावरीवर तीन-चार मोठे पूल आहेत.  अनेक लोक त्या पुलांवरूनही नदीत कचरा फेकत असताना दिसतात.

या गोदावरी नदीचे पाणी आपण रोज पीत असतो. त्या पाण्यात घाण टाकता कामा नये हा विचारही त्यांच्या मनाला शिवत नसावा. शिवाय सकाळच्या वेळी अनेक माणसे लोक बाबूंच्या आणि फोम-गाद्यांचे तराफे घेऊन नदीवर येतात आणि नदीत बुड्या मारून टोपल्या-टोपल्यांनी वाळू काढून तराफ्यावर तिचे ढीग लावतात. नंतर ते तराफे किनाऱ्यावर नेऊन वाळू ट्रक्समध्ये भरून नेली जाते. फार अतिरिक्त प्रमाणात वाळू उपसा झाल्यामुळे पात्राच्या रचनेत बदल होणे, गाळाचे प्रमाण वाढणे, पाण्याची झिरप जास्त होऊन नदीतील पाणी कमी होणे, तसेच नदीतील मासे, झिंगे आणि इतर जलीय जिवांचे अधिवास धोक्यात येणे हे दुष्परिणाम संभवतात. नांदेडमध्ये गोदावरी या धोक्याचा सामना करीत आहे.

( vijdiw@gmail.com )  

टॅग्स :godavariगोदावरीriverनदीWaterपाणी