शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांना द्या जिद्दीचे पंख

By admin | Updated: November 1, 2014 18:48 IST

लोकशाही व्यवस्थेत जात, पंथ असा भेद नकोच. सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. कोणाच्याही मार्गात कागदपत्रे, दाखले असे अडथळे यायला नकोत. असे झाले, तरच स्वप्नांना जिद्दीचे पंख मिळून वंचित समाजघटकांमधील बुद्धिमत्ता पुढे येईल.

- मुरलीधर दिवेकर 

 
आपल्या देशात लोकशाही प्रस्थापित झाली आहे. घटनेनुसार कोणत्याही नागरिकाला मतदान करण्याचा आणि निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. अनेक धर्मांचे लोक येथे गुण्यागोविंदाने राहतात. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्‍चन अशा अनेक धर्मीयांचा हा देश आहे. येथे विचारांची रेलचेल होत असते. आपल्या देशात धर्मपंडित, विद्वान, शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, कायदेपंडित तसेच अनुभवी राजकारणी मंडळी तसेच निवडून आलेले आमदार, खासदार, राष्ट्रपती उपराष्ट्रपती, जनरल गव्हर्नर, राज्यपाल, संरक्षणमंत्री,   देशाचा कारभार सुव्यवस्थित चालविण्यासाठी काम करतात. त्यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण व विचार करण्याची प्रगल्भता आहे. विचार मांडण्याची कला आहे. प्रत्येकाला ही कला अवगत असतेच असे नाही. काही वक्ते, साहित्यिक, कवी होतात; तर काही साहित्यातून आपल्या धारदार लेखणीतून प्रबोधनाचे कार्य उत्तमरीत्या करू शकतात. म्हणून तर आज दिल्लीच्या राजगादीवर एक सामान्यांतील सामान्य व्यक्ती- ‘चहाचा धंदा करणारा’ असामान्य माणूस देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. 
ही केवढी मोठी गौरवाची बाब आहे. आजपर्यंत जे घडले नाही, ते मोदी यांनी करून दाखवले आहे. सत्ता बदलून दाखवली आहे. विरोधकाला विरोध करण्यास जागा ठेवली नाही. कायद्याच्या चौकटीचा विचार करता, विरोधकाला थोडाही वाव दिला नाही. एकहाती सत्ता खेचून आणली.
मात्र, लोकशाहीत विरोधकसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. देशाचा व राज्याचा कारभार चालविण्यासाठी विरोधकाचे ऐकून द्यावे लागते. तरच, लोकशाही टिकून राहते; अन्यथा भांडवलदार व मालक यांच्या हाती लोकशाही गेल्याचे चित्र दिसू लागते. लोकशाहीत कामाला व काम करून द्यायला महत्त्व असते. प्रत्येक क्षेत्रात सामंजस्य असावे लागते. कामाचे भान ठेवावे लागते. तरच देशाचा विकास होऊ शकतो. असे वातावरण देशात निर्माण झाले, तर नवी क्रांती घडू शकते. भारतात मोठय़ा प्रमाणात इंग्रजांनी विषमतेचे बीज पेरून ठेवले आहे. त्याची मुळे खोलवर गेलेली आहेत.  वर्णभेद व जातिभेदामुळे समाजाचा घटक असलेला एक मोठा समाज पुढे जाऊ शकला नाही. त्यांच्यातील कौशल्य, हुशारी यांना वाव मिळाला नाही. अनेक वर्षे त्यांना शिक्षणाशिवाय काढावी लागली. त्यामागे विविध सामाजिक कारणे आहेत. समाजाची मानसिकताच या कारणांमुळे कुंठित झाली होती. त्यामुळे प्रगती होण्यापासून हा वर्ग वंचित राहिला. 
संधी मिळाली तर त्यांच्यातूनही नेतृत्व उभे राहू शकते. मात्र, त्यांच्या संधी मिळण्यावर अडथळे येता कामा नयेत. वास्तविकता अशी आहे, की सरकारी योजना असतात, सवलती असतात; मात्र त्याचे नियम असे काही असतात, की त्यांचा लाभच संबंधितांना मिळू नये. केवळ जातीमुळे किंवा आर्थिक स्थितीमुळे आता कोणी विकासापासून वंचित राहू नये, याची काळजी नव्या सरकारने घ्यायला हवी.
जिद्द असेल तर आपल्या देशात कोणालाही कोणत्याही क्षेत्रातील वरिष्ठ पद आपल्या गुणवत्तेवर मिळविता येते. याचे उदाहरण आता स्वत: पंतप्रधान मोदीच आहेत. म्हणूनच त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना उत्पन्नाचा दाखला द्यावा लागतो. वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा दीड लाख रुपये असेल त्यांना सवलत लागू होते. इतरांनी शिक्षण घ्यायचे कसे? रोजगार मिळवायचा कसा? तेव्हा शिक्षणाच्या बाबतीत सरकारने सकारात्मक पाऊल उचलावे. सर्वांना शिक्षणाचा हक्क मिळावा, तरच देशाचा विकास होऊ शकतो. 
चहाचा धंदाच करणारा काय, तर पानाची गादी चालविणारा उद्याचा पंतप्रधान होऊ शकतो. ही टीका नसून वास्तव रूप आहे. त्यासाठी समता यावी लागते.  नफ्याचा वाटा सर्वांना समान मिळाला पाहिजे. शेती  सामुदायिक केली पाहिजे. कृती, कार्यतप्तरता, वेग, संवेदनशीलता व विश्‍वास या माध्यमांतून देशसेवेचे व्रत स्वीकारतो तोच खरा सेवक होय. बोलाचा भात अन् बोलाचीच कढी होता कामा नये. कोणतीही गोष्ट मनापासून केली पाहिजे, तरच काम यशस्वीपणे होते. देशसेवेचा खरा आनंद मिळतो. इतरांनाही तो घेता येतो. 
(लेखक सामाजिक कार्यकर्ते आहेत.)