शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चीनवर  ‘नजर’ आकाशातून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 06:00 IST

चीनशी सातत्याने होणाऱ्या कुरबुरी थांबवण्यासाठी भारताने आता एक कायमस्वरूपी उपाय केला आहे. जिथे भारतीय जवानांची दृष्टी पडू शकणार नाही किंवा जवान पोहोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देयेत्या काही वर्षांत भारत अमेरिकेकडून अशा प्रकारचे ३० ड्रोन विकत घेण्याचा विचार करत आहे.

- - पवन देशपांडे

वर्षभरापासून चीनच्या कुरापतींनी आपण हैराण आहोत. सीमेवर कधी सैन्याची माघार घेतली जाते, तर कधी त्यात भर घातल्याच्याही बातम्या येतात. कधी लडाख सीमेवर कुरबुरी झाल्याचेही ऐकायला मिळते. चीन संपूर्ण सीमेवर कुठे ना कुठे घुसखोरीचा प्रयत्न करतच असल्याचे दिसते. वर्षभरापासून चीन सीमेवरच लक्ष केंद्रित झाले आहे. त्यामुळे चीनशी संबंधही बिघडले आहेत. सातत्याने होणारी ही कुरबुरी थांबवण्यासाठी भारताने आता एक कायमस्वरूपी उपाय केला आहे. जिथे भारतीय जवानांची दृष्टी पडू शकणार नाही किंवा जवान पोहोचू शकणार नाहीत, अशा ठिकाणी आकाशातून नजर ठेवण्यात येणार आहे. ही नजर असणार आहे किरायाची. अमेरिकेकडून घेतलेली. आपल्याला ही नजर स्वतःची हवी असेल तर त्याची किंमत आहे ४६० कोटी रुपये. या नजरेचं नाव आहे एमक्यू-. अमेरिकेतील सर्वांत शक्तिशाली ड्रोन. मानवरहीत विमान. हे विमान चक्क ५० हजार फूट उंचीवर उडतं. साध्या डोळ्यांना ते दिसणं तर शक्य नाहीच शिवाय ते रडारमध्येही येत नाही. त्यामुळे ते आकाशात उडत असेल तर त्याला फार धोका नसतो आणि दुश्मनालाही ते दिसत नाही. असे अनेक ड्रोन अमेरिका गेल्या १३ वर्षांपासून करते आहे आणि याच ड्रोनच्या आधारे अमेरिकेने अनेक दहशतवाद्यांचा खात्माही केला आहे. कारण क्षेपणास्र घेऊन आकाशात स्थिर राहण्याची यात क्षमता आहे. शिवाय हे जमिनीवरून ऑपरेट करता येते. म्हणजे यात व्यवस्था असून, कोणाला जाऊन बसण्याची गरज नाही. असे दोन अत्याधुनिक ड्रोन किरायाने घेण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. येत्या काही वर्षांत भारत अमेरिकेकडून अशा प्रकारचे ३० ड्रोन विकत घेण्याचा विचार करत आहे. असे जर झाले तर चीन, पाकिस्तानवर आकाशातूनच नजर ठेवता येणार आहे.

व्हॅक्सिन टुरिझम !

कोरोना विषाणूने एका फटक्यात संपूर्ण उद्योगविश्वालाच धक्का दिला. लॉकडाऊनमुळे सारेच हैराण झाले. त्यातून टुरिझम क्षेत्रही सुटलेले नाही. विमानसेवा बंद होती. अनेक देशांनी इतर देशांतील लोकांसाठी कवाडे बंद केली होती. काही काळ भारतातून जायला आणि यायलाही परवानगी नव्हती. त्यामुळे पर्यटनाचा संबंधच येत नव्हता. याच कारणामुळे टुरिझम उद्योग पार रसातळाला गेलेला आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर असे दिसते की, दरवर्षी जवळपास एक कोटी परदेशी पर्यटक भारतात येत आणि २.६ कोटी भारतीय पर्यटक विदेशात पर्यटनासाठी जात. यंदा हे सारेच खोळंबले आहे. जगभरातील पर्यटन उद्योगाची एकूण उलाढाल ही तब्बल १७ लाख कोटींपेक्षा अधिक आहे. यातून किमान पाच कोटी लोकांना रोजगार उपलब्ध होतो. हे रोजगारही या कोरोनामुळे धोक्यात आले आहेत. पर्यटन उद्योगाने पुन्हा उभारी घेणे त्यामुळेच गरजेचे आहे. जगभरातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही, आटोक्यात येत नाही तोवर या पर्यटन उद्योगाला पुन्हा झळाळी मिळण्यासाठी खूप धडपड करावी लागणार आहे. पर्यटन व्यवसायाला उभारी देण्यासाठी अनेक योजना तर आणाव्या लागणार आहेतच, शिवाय कंपन्यांनाही पुढे येऊन पर्यटकांसाठी सूट द्यावी लागेल. कोरोना प्रतिबंधक लस येईल आणि सारे जग पुन्हा नव्याने भरारी घेईल, अशीच आस आता साऱ्यांना लागून आहे. या लसीसाठी विविध देशांमध्ये स्पर्धाही सुरू आहे. कोणत्या देशाच्या लसीला प्रथम सर्वांसाठी वापरण्याची परवागी मिळते ते येत्या काळात ठरेलच; पण अमेरिकेत  फायझर कंपनी तयार करत असलेली लस यात सध्या आघाडीवर असल्याचे चित्र आहे. ही लस भारतीयांना मिळेल तेव्हा मिळेल; पण अमेरिकेत ही लस सर्वसामान्यांना टोचण्यासाठी तयार होताच तिथे जाऊन लस टोचून घेण्याची अनोखी योजना एका पर्यटन कंपनीने आणली आहे. याला त्यांनी व्हॅक्सिन टुरिझम असं कोंदण लावलं. खरं तर अमेरिकेने तशी परवानगी दिली तर मुंबईतील या पर्यटन कंपनीला भारतातून काहींना अमेरिकेत घेऊन जाता येईल. लस टोचून परत आणता येईल. पण, अशा योजनांमुळे पर्यटन उद्योगाला भरारीचे व्हॅक्सिनमिळेल का हा प्रश्नच आहे. तूर्तास तरी या उद्योगाला पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी २०२२ उजडेल, असा अंदाज वर्तविला जातोय.

(सहायक संपादकलोकमतमुंबई)