शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

रंगमंचावरची राणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 06:05 IST

आशालता वाबगावकरांनी मराठी रंगमंचावर  पाच दशकं अक्षरश: ‘राणी’च्या थाटात ‘राज्य’ केलं. त्यांचा अभिनय, त्यांचं गाणं आणि त्यांचा प्रसन्न चेहरा कायम रसिकांच्या स्मरणात राहील.

ठळक मुद्देप्रसन्न चेहरा, सतत हसतमुख, काळेभोर टप्पोरे डोळे मोठ्ठाले करत, कुणाच्या तरी कलावंताच्या भानगडीचं गुपित सांगायला कायम उत्सुक. गुपिताचा गाभा सांगून झाल्यावर खळाळून हसणं. आशालता वाबगावकर यांना मी साधारण 22-24 वर्षे असंच अनुभवलंय.

- सुधीर गाडगीळप्रवासात, माहीमच्या घरात, रंगमंचावरच्या विंगेत, हाँगकाँगच्या विमानतळावर, कोल्हापूरच्या रस्त्यावर, कतार किंवा दुबईच्या स्टेजवर, अशा कुठं कुठं ‘आशाताई’ मला गेली कित्येक वर्षे भेटलेल्या आहेत. प्रसन्न चेहरा, सतत हसतमुख, काळेभोर टप्पोरे डोळे मोठ्ठाले करत, कुणाच्या तरी कलावंताच्या भानगडीचं गुपित सांगायला कायम उत्सुक. गुपिताचा गाभा सांगून झाल्यावर खळाळून हसणं. आशालता वाबगावकर यांना मी साधारण 22-24 वर्षे असंच अनुभवलंय.

मी काही त्यांच्या कुठल्या नाटकात किंवा नाट्यसंस्थेत नव्हतो. पण त्यांच्या नाट्य-चित्र क्षेत्रातील अनुभवांचं कथन त्यांच्याकडून ऐकण्यासाठी त्यांना बोलकं करत, एखादं नाट्यगीत त्यांना म्हणायला लावत, साथीला त्यागराज खाडीलकरला गायला लावत, आम्ही देश-परदेशात ‘टॉक शो’ करत भटकायचो. त्या निमित्तानं आशाताईंशी मनमुराद गप्पा झाल्या. प्रवासात, अजून किती राह्यलं हो अंतर, ही प्रश्नाची भुणभुण वैताग येण्याइतपत पुन:पुन्हा चालत असे. पण एकदा का त्या स्टेजवर रसिकांसमोर आल्या, की मग मात्र रंगमंचावरची राणी होत. ‘त्ये जोशीणबाई.. घरात चोरून अंडी घालतं..’, असं वार्‍यावरच्या वरातीतलं कडवेकर मामींच्या तोंडचं वाक्य ठसकेबाजपणे, खास कर्नाटकी ढंगात त्यांनी सादर केलं की, नाशिक असो, सोलापूर असो, वा दुबई, देश-परदेशात हंशा फुटून, टाळ्यांचा कडकडाट होत असे. ‘पंचप्राणांपेक्षाही ज्याचं मोल सत्यवतीनं अधिक मानलं, ते तर आपण चुरगाळून टाकलंत, अवघ्या अवघ्या जगण्याचंच निर्माल्य झालं,’ अशा वाक्यानंतर रसिकांच्या डोळ्यात पाणी येत असे. ‘गर्द सभोती राज साजणी’ हे गाणं तडफेनं म्हणत, अवघ्या र्शोतृवृंदाला ‘शो’च्या पहिल्या तासभरातच खूश करून टाकण्याची किमया महाराष्ट्राच्या या ‘मत्स्यगंधे’नं साधलेली होती.कालच्या त्यांच्या अवचित जाण्यानं, त्यांचे विविध शोमधले किस्से कथन करतानाचे, गाणं गातानाचे सारे सारे भाव डोळ्यासमोर आले. ‘गंपू दादा’नं (म्हणजे अभिषेकी) माझ्यातल्या गाणार्‍या गळ्याची जाणीव करून देऊन मला मार्गदर्शन केले, तर गोपीनाथ सावकार आणि मा. दत्तारामांनी माझ्यातले अभिनय गुण ओळखले, असं ज्येष्ठांबद्दलचं ऋण त्या वेळोवेळी व्यक्त करत. ‘गंधर्वांच्या नाटकांना घरातल्यांबरोबर जायची; पण खायची आणि झोपायची. नाटक असं पूर्ण मी प्रथम ‘संशय कल्लोळ पाह्यलं’. राम मराठे आणि गणपतराव बोडस यांचं काम बघून, हा प्रकार आपल्याला जमणारच नाही, असं त्यावेळी वाटलं. पण कशीबशी मारून मुटकून ‘रेवती’ केली. पुढे ‘शारदा’, ‘मृच्छकटिक’ केलं. ते पाहून महादेवशास्री जोशी म्हणाले की, ‘अरे ही तर देवलांची मानसकन्या’. वसंतराव कानेटकरांनी ‘मृच्छकटिक’ पाहूनच माझ्यासाठी ‘मत्स्यगंधा’ची व्यक्तिरेखा लिहिली आणि मधुकर तोरडमलांनी गुडबाय डॉक्टरमधील कॅरेक्टर लिहिली.’लेखकांना स्फूर्तिदायी ठरणार्‍या आशालता वाबगावकरांनी मराठी रंगमंचावर चक्क 52 ते 54 वर्षं अक्षरश: ‘राणी’च्या थाटात ‘राज्य’ केलं. नाटकांचा बहर चालू असतानाच त्यांना अचानक पॅरालिसीसचा अटॅक आला. त्यावेळी त्या सहा महिने हॉस्पिटलमध्येच पडून होत्या. टीव्हीवर ‘जन्मठेप’ नावाचं कोकणी नाटक त्यांनी केलं. ते पाहून बासूदांनी त्यांना शरदबाबूंची ‘निष्कृती’ वाचायला दिली आणि त्यातूनच ‘अपने पराये’ या हिंदी सिनेमात पहिलं काम त्यांना मिळालं. नवा दरबार सुरू झाला. आजारपणाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेलं हे हिंदी सिनेमांचं नवं विश्व अनुभवताना त्या सतत त्या वरच्या जगन्नियंत्याच्या कृपेचं स्मरण करतात. याच टप्प्यावर आम्ही सुरेश खरेंचं ‘मिश्किली’ करून प्रथम अमेरिकेचा दौरा केला. चार महिन्यांच्या त्या परदेश दौर्‍यानं त्यांच्याशी खरा स्नेह जुळला.गोवा हिंदू असोसिएशनच्या नाटकाच्या दौर्‍यात, एसटीनं जाऊन, धर्मशाळेत राहून, दहा रुपये नाइटवर कार केलेल्या, ‘आशालताबाई’ सिनेमाच्या ग्लॅमरमुळे विमानप्रवास करू लागल्या. काही हजार घेऊन ‘पर डे शिफ्ट’चा करार करू लागल्या. जाहिरातीत झळकल्या, गाडी घेतली. पण जुनी माणसं, जुने क्षण त्या कधीच विसरत नव्हत्या. हे त्यांच्याशी दौर्‍यात बोलताना जाणवायचं.त्या सांगत.. ‘गोवा हिंदू मधला पहिला दिवस, आईची साडी नेसले होते. बोंगा झालेला. स्कर्टवरच ब्लाऊज घातलेला, गोवा हिंदूच्या दारातच अडखळून पडले. तो रंगभूमीला माझा पहिला नमस्कार.’वार्‍यावरची वरातचा विषय निघाला, की त्या भरभरून पुलंवर बोलत. त्यावेळच्या तालमीच्या गमती सांगत. पुल स्वत: तालमी घेत. रंगमंचावर उभं कसं राहावं, इथपासून ते ढोलकी वाजवण्यापर्यंत सारं ते क्षणात करून दाखवत. त्या काळात आम्ही ‘पुलं’नी भारावलो होतो.प्रयोगाला रंगमंचावर पाऊल ठेवण्यापूर्वी आशाताईंना दृष्ट लागू नये म्हणून त्यांच्या तळपायाला ‘काजळ तीट’ लावणार्‍या बॅकस्टेज वर्करला त्या कधीच विसरल्या नाहीत. पहिल्याच हिंदी चित्रपटाच्या वेळी फिल्मीस्तानच्या भव्य सेटवर त्यांना सांभाळून घेणार्‍या, के. के. महाजन यांचा गप्पात उल्लेख निघताच त्या प्रणाम करत. उटीतल्या थंडीनं गारठून रडकुंडीला आलेल्या असताना राजेश खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी आशालताबाईंची घेतलेली काळजी त्यांना सतत आठवे. ‘पर डे’चं मानधन घे, असा व्यावहारिक सल्ला जितेंद्र या अभिनेत्यानं आपुलकीनं 1982मध्ये दिल्यानं त्याचा आधार वाटल्याचे त्या सांगत.‘अंकुश’च्या वेळी नाना पाटेकरने गंमतीनं गळा दाबल्यानं घाम फुटल्याची आठवण त्यांना त्याला पाहाताच होत असे. मिथुन चक्रवर्ती, जॉकी र्शॉफ, अनिल कपूर, रती अग्निहोत्री, र्शी देवी, या त्यांच्या पडद्यावरच्या मुलांचं व्रात्यपण आठवून दौर्‍यात त्या नेहमीच त्यांचे किस्से सांगताना हसत.लहानपणी शिरगावात राहत असताना, कल्याणजी भाईंच्या ऑर्केस्ट्रात सलग सहा वर्षे त्या रस्तोरस्ती गायकवृंदात गात. उंचीनं मोठय़ा गायकांबरोबर गाताना स्टुलवर उभं राहून आशाताई गात. ‘मी माझ्या गाण्याची उंची वाढवीन,’ असं त्या पोरसवयात म्हटल्याचं आठवून त्यांना हसू फुटत असे.त्यांनी चक्क सचिवालयात नोकरीही केली होती. तिथंच त्या सौ. वाबगावकर झाल्या. मंत्रालयातल्या जुन्या मैत्रिणींना त्या भेटत. आम्हाला त्यांनी भूमिकातून जिवंत केलेले क्षण जास्त आठवतात. ‘पुढचं पाऊल’मधली ‘खाष्ट सासू’ ‘भाऊबंदकी’तली आनंदीबाई, रेवती अशी अनेक कामं डोळ्यापुढं येतात. सर्वात स्मरणीय म्हणजे अल्लड, सुडानं पेटलेली नि अगतिक, अशा तीन रूपातली मत्स्यगंधा आणि मत्स्यगंधेच्या तोंडचं गाणंही!सायकॉलॉजी आणि फिलॉसॉफी घेऊन एम.ए. झालेल्या आशाताईंना माणसांची सायकॉलॉजी जास्त उत्सुकतेची वाटे. इतरांबरोबरचे चांगले क्षणच त्या आठवत. बॅकस्टेजच्या पंढरीपासून, थकवा जाण्यासाठी नाटकाच्या वेळी मध्यंतरात त्यांना बिस्कीट आणून देणार्‍या रसिकाची त्या सतत आठवण काढत. मला, पत्नी, आई, वडील, सार्‍यांना माझ्या घरी राहून अनुभवलं असल्याने, माझ्याशी बोलताना त्यांच्या तोंडची वाक्यच त्या जास्त सांगत.आता त्या नसल्यानं ‘त्यांचं’ स्मरण करणंच आपल्या हातात.(लेखक आणि निवेदक)