शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:55 IST

उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा दावा करत वरुण सरदेसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी गड वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यातच तीन काय तीस पक्ष एकत्र आले, तरीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे विश्वासूंपैकी एक असलेल्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात जे काही घडत आहे ते गंभीर आहे ते समजून घेण्याची गरज आहे. भाजप, गद्दारांचा गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करणार मी खात्रीपूर्वक सांगतो. तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत, असा मोठा दावा वरुण सरदेसाई यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे वरुण सरदेसाईही राज्यातील विविध भागात दौरे करत युवासेना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते

सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला. आम्ही शिवसैनिक म्हणायचे आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करायची.मागील तीन दिवसात भाजप, गद्दारचा गट आणि माणसे एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकट पडण्याचे प्रयत्न आहे. हे काय करू इच्छितात काय करू पाहतात हे समजून घ्या. उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. 

दरम्यान, यांना ५० खोके मिळाले आणि कार्यकर्त्यांना फक्त तीन लाख आणि पैसे देऊनही मुख्यमंत्र्यांचे सभेला गर्दी जमत नसेल तर काय उपयोग, असा खोचक टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला.  जे बोलतोय ते अतिशय जबाबदारीने बोलत आहे. या नवीन सरकारमध्ये मुंबईचे किती मंत्री आहेत. एक आहे तो सुद्दा अमराठी आहे. मुंबईतील ३६ आमदारांमधून त्यांना एकही आमदार मराठी सापडला नाही. भाजपचे मुंबईमध्ये तीन खासदार आहेत, त्यापैकी दोन अमराठी आहेत. भाजपचे १३ आमदार आहेत. त्यापैकी ८ अमराठी आहेत. भाजपचे मुंबईमध्ये ८२ नगरसेवक आहेत.त्यापैकी ५० ते ५५ नागरसेवक अमराठी आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे