शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:55 IST

उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा दावा करत वरुण सरदेसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी गड वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यातच तीन काय तीस पक्ष एकत्र आले, तरीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे विश्वासूंपैकी एक असलेल्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात जे काही घडत आहे ते गंभीर आहे ते समजून घेण्याची गरज आहे. भाजप, गद्दारांचा गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करणार मी खात्रीपूर्वक सांगतो. तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत, असा मोठा दावा वरुण सरदेसाई यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे वरुण सरदेसाईही राज्यातील विविध भागात दौरे करत युवासेना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते

सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला. आम्ही शिवसैनिक म्हणायचे आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करायची.मागील तीन दिवसात भाजप, गद्दारचा गट आणि माणसे एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकट पडण्याचे प्रयत्न आहे. हे काय करू इच्छितात काय करू पाहतात हे समजून घ्या. उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. 

दरम्यान, यांना ५० खोके मिळाले आणि कार्यकर्त्यांना फक्त तीन लाख आणि पैसे देऊनही मुख्यमंत्र्यांचे सभेला गर्दी जमत नसेल तर काय उपयोग, असा खोचक टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला.  जे बोलतोय ते अतिशय जबाबदारीने बोलत आहे. या नवीन सरकारमध्ये मुंबईचे किती मंत्री आहेत. एक आहे तो सुद्दा अमराठी आहे. मुंबईतील ३६ आमदारांमधून त्यांना एकही आमदार मराठी सापडला नाही. भाजपचे मुंबईमध्ये तीन खासदार आहेत, त्यापैकी दोन अमराठी आहेत. भाजपचे १३ आमदार आहेत. त्यापैकी ८ अमराठी आहेत. भाजपचे मुंबईमध्ये ८२ नगरसेवक आहेत.त्यापैकी ५० ते ५५ नागरसेवक अमराठी आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे