शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

Maharashtra Politics: “तीन काय तीस पक्ष एकत्र झाले तरी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार”

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 15:55 IST

उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा दावा करत वरुण सरदेसाई यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ४० आमदार आणि १२ खासदारांसह केलेल्या बंडखोरीनंतर शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. शिंदे गटाला राज्यभरातून वाढत असलेला पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरताना पाहायला मिळत आहे. पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) प्रचंड सक्रीय झाले असून, बैठका, सभा, दौरे यावर मोठ्या प्रमाणात भर दिला जात आहे. यातच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसाठी गड वाचवण्याचे मोठे आव्हान असणार आहे. यातच तीन काय तीस पक्ष एकत्र आले, तरीही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर शिवसेनेचाच भगवा कायम राहणार असल्याचा विश्वास युवासेनेचे सचिव आणि आदित्य ठाकरेंचे विश्वासूंपैकी एक असलेल्या वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी व्यक्त केला आहे. 

राज्यात जे काही घडत आहे ते गंभीर आहे ते समजून घेण्याची गरज आहे. भाजप, गद्दारांचा गट आणि मनसे हे तीन पक्ष एकत्र येणार आणि शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकटे पाडण्याचा प्रयत्न करणार मी खात्रीपूर्वक सांगतो. तीन काय तीस पक्ष एकत्र आले तरी मुंबई महापालिकेवरचा शिवसेनेचा भगवा उतरू शकणार नाहीत, असा मोठा दावा वरुण सरदेसाई यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे वरुण सरदेसाईही राज्यातील विविध भागात दौरे करत युवासेना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते

सध्या जे काही घडत आहे ते खूप गंभीर आहे. सगळ्यात अगोदर शिवसेनेसोबतची युती तोडली तिथपर्यंत ठीक होते. तो त्यांच्या पक्षाचा विषय होता. नंतर शिवसेना पक्ष फोडला. ज्या लोकांच्या मदतीने फोडला त्यांच्याकडून शिवसेना मूळ पक्षावर दावा करण्यात आला. आम्ही शिवसैनिक म्हणायचे आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी करायची.मागील तीन दिवसात भाजप, गद्दारचा गट आणि माणसे एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एकट पडण्याचे प्रयत्न आहे. हे काय करू इच्छितात काय करू पाहतात हे समजून घ्या. उद्या यांचा महापौर झाला तर केवळ शिवसेना नाही तर मराठी माणूस संकटात येईल, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला. 

दरम्यान, यांना ५० खोके मिळाले आणि कार्यकर्त्यांना फक्त तीन लाख आणि पैसे देऊनही मुख्यमंत्र्यांचे सभेला गर्दी जमत नसेल तर काय उपयोग, असा खोचक टोला वरुण सरदेसाई यांनी लगावला.  जे बोलतोय ते अतिशय जबाबदारीने बोलत आहे. या नवीन सरकारमध्ये मुंबईचे किती मंत्री आहेत. एक आहे तो सुद्दा अमराठी आहे. मुंबईतील ३६ आमदारांमधून त्यांना एकही आमदार मराठी सापडला नाही. भाजपचे मुंबईमध्ये तीन खासदार आहेत, त्यापैकी दोन अमराठी आहेत. भाजपचे १३ आमदार आहेत. त्यापैकी ८ अमराठी आहेत. भाजपचे मुंबईमध्ये ८२ नगरसेवक आहेत.त्यापैकी ५० ते ५५ नागरसेवक अमराठी आहेत, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

टॅग्स :Varun Sardesaiवरुण सरदेसाईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे