शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

यंदा सीबीएसई दहावी निकालाचा टक्का वाढला : पुणे विभागाचा निकाल ९९ टक्के 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 12:03 IST

देशभरातून १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

ठळक मुद्दे९० पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय : विद्यार्थ्यांना आनंदाचा धक्काअनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे सरासरी निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्णदेशातील १३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण घेऊन संयुक्तरित्या प्रथम क्रमांक

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी दुपारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यंदा सीबीएसईचा निकाल ९१.१ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत निकालामध्ये ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. पुण्याचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाने ९९ टक्के अशा विक्रमी निकालाची नोंद केली आहे. ९० पेक्षा जास्त टक्के मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचीही संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना आनंदाचा धक्का बसला आहे.सीबीएसई दहावीची परीक्षा १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल दरम्यान पार पडली होती. देशभरातून १७ लाख ६१ हजार ७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी १६ लाख ४ हजार ४२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. देशातील १३ विद्यार्थ्यांनी परीक्षेत ५०० पैकी ४९९ गुण घेऊन संयुक्तरित्या प्रथम क्रमांक पटकावला आहे.ज्ञान प्रबोधिनी प्रशालेचा निकाल १०० टक्के लागला आहे. स्पृहा सरनाईक ही विद्यार्थ्यांनी ९८.२  टक्के मिळवून शाळेत पहिली आली. विद्यार्थ्यांच्या निकालाची सरासरी ९२.०५ आहे. एकूण ८० मुले परीक्षेला बसली होती. लोकसेवा ई-स्कूलचा निकाल १०० टक्के लागला असून १८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत.विखे-पाटील मेमोरियल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. आयुषी बर्वे ही विद्यार्थीनी ९८.२ टक्के मिळवून पहिली आली आहे. १४६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सिटी इंटरनॅशनल स्कूल वानवडी शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. जान्हवी ऋषीकेश हिने ९७.४ टक्के  गुण मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. परीक्षेस बसलेल्या एकूण ८४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.दिल्ली पब्लिक स्कूलच्या २२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, शाळेचा निकाल १०० टक्के लागला आहे. रिषभ गोयल हा विद्यार्थी ९८.३ टक्के गुण मिळवून शाळेत पहिला आला. जी जी इंटरनॅशनल स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. आदित्य खानोलकर हा विद्यार्थी ९६.६ टक्के मिळवून पहिला आला.विद्याशिल्प पब्लिक स्कूलचा निकाल १०० टक्के लागला. या शाळेचा सिध्दांत भट हा विद्यार्थी ९५.८ टक्के मिळवून पहिला आला. ब्लॉसम पब्लिक स्कूलची पायल हेलांबे ९८ टक्के मिळवून पहिली आली. आॅरबिस स्कूलची कवना अंकलेकर ९६.६ टक्के मिळवून पहिली आली............महापालिकेच्या राजीव गांधी ई-लर्निंगची बाजीराजीव गांधी ई - लर्निंग स्कुलने सलग पाच वर्षे दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लावत, परंपरा कायम राखली आहे. एकूण ५५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सृष्टी चिंतल हिला ८७ टक्के, आदर्श दोंतुल ८२. ८ टक्के , प्रियंका मिसाळ ८२ .६ टक्के गुण मिळवले.टक्क्यांचा पाऊससीबीएसई दहावीच्या परीक्षेत देशभरातून एकूण २ लाख २५ हजार १४३ विद्यार्थ्यांनी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांचे सरासरी निकाल ८० टक्क्यांपेक्षा अधिक आहेत.निकाल लवकर लावण्यातही पहिला नंबरसीबीएसई बोर्डाने एसएससी, आयसीएसई आदी बोर्डांच्या तुलनेत अवघ्या महिनाभरात दहावी व बारावीचा निकाल लावून पहिला नंबर पटकाविला आहे. यामुळे सातत्याने निकालाकडे वाट लावून बसलेल्या विद्यार्थी, पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :PuneपुणेCBSE Examसीबीएसई परीक्षाSchoolशाळाStudentविद्यार्थी