शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

"जनतेच्या अस्मितेशी खेळू नका; नाही तर थेट राजकारणात या, आडून-आडून खेळण्यात मजा नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 17:27 IST

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

ठळक मुद्देहे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही.काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेशी खेळू नका. राजकारण राजकारण्यांना करू द्या, नाही तर थेट राजकारणात या, आडून आडून खेळण्यात मजा नाही, असे आव्हान राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सिनेकलाकार आणि वृत्तवाहिन्यांच्या न्यूज अँकर्सना दिले आहे. 

यशोमती ठाकूर यांनी एक ट्विट करत हे आव्हान दिले आहे. ट्विटमध्ये ठाकूर म्हणाल्या, "काही सिनेकलाकार - न्यूज अँकर्स सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत असतात. काही राजकीय अजेंडा असेल तर तो राबवा,पण म्हणून इथल्या जनतेच्या अस्मितांशी खेळू नका. जाता जाता - राजकारण हे राजकारण्यांना करू द्या, नाही तर तुम्ही थेट राजकीय प्रवाहात या. असं आडून आडून खेळण्यात काही मजा नाही!"

हे ट्विट करताना यशोमती ठाकूर यांनी कुणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र त्यांच्या या ट्विटचा रोख अभिनेत्री कंगना राणौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडेच असल्याचे बोलले जात आहे.

कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव -कंगनाने मुंबई ही पीओकेसारखी वाटते, मुंबई कोणाच्या बापाची नाही, मुंबई पोलिसांपेक्षा माफिया बरे अशी वक्तव्ये केली होती. यावरून महाराष्ट्रासह अभिनेते, नेत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली होती. कंगनाच्या विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आघाडी उघडली होती. यावरून वेगवेगळे राजकीय रंग देण्याचे सुरु असताना आता काँग्रेसने कंगनाविरोधात हक्कभंग सादर केला आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगनाविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला आहे. 

अर्णब गोस्वामींविरोधात हक्कभंग प्रस्ताव -रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात आज विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर गोस्वामींनी राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंत यांच्यावर त्यांनी सातत्यानं टीका केली असून त्यांचा उल्लेख अनेकदा एकेरी भाषेत केला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी गोस्वामींविरोधात हक्कभंग ठराव आणला आहे. हा प्रस्ताव पारित झाल्यास अर्णब यांच्यावर सभागृहाकडून कारवाई होऊ शकते.  

महत्त्वाच्या बातम्या -

महाराष्ट्र सरकार करणार कंगनाच्या ड्रग्स कनेक्शकनची चौकशी, अध्ययन सुमनची मुलाखत बनली आधार

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

खूशखबर! : याच महिन्यात भारतात येतेय रशियन कोरोना लस, क्लिनिकल ट्रायलला होणार सुरुवात

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

आता संजय राऊत कंगनाला म्हणाले 'नॉटी' गर्ल, त्यांच्या भाषेत सांगितला 'हरामखोर'चा अर्थ

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरKangana Ranautकंगना राणौतarnab goswamiअर्णब गोस्वामीcongressकाँग्रेस