शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:44 IST

पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.

ची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला -  गजानन मोहोडअमरावती - दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांंच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या ११ महिन्यांत १०५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकरी बाहेर यावा, यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंताळ्यात बहुतांश शेतकरी वंचित राहिले. या कर्जमाफीनंतरही विदर्भातील सहा जिल्ह्यांत साडेतीन हजार शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यंदा जानेवारी महिन्यात ८५, फेब्रुवारी ७८, मार्च ९२, एप्रिल ७८, मे ९८, जून ९५, जुलै १०५, आॅगस्ट ११४, सप्टेंबर १०६ आॅक्टोबर ८६, नोव्हेंबर ९५ व १५ डिसेंबरच्यापर्यंत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्या सन २००१ पासून या सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त सात हजार ६६७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ हजार ९५० प्रकरणे अपात्र, तर २९६ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आतापर्यंत सात हजार ६३२ प्रकरणांत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे.सन २००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास सन २००५ च्या शासनादेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरुप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे ज्या कर्जासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकऱ्यांचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

आत्महत्यांचा आलेख वाढताचसन २००१ मध्ये ५२ शेतकरी आत्महत्या होत्या. सन २००२ मध्ये १०४, सन २००३ मध्ये १४८, सन २००४ मध्ये ४४८, सन २००५ मध्ये ४४५, सन २००६ मध्ये १४४९, सन २००७ मध्ये १२४७, सन २००८ मध्ये ११४८, सन २००९ मध्ये १००५, सन २०१० मध्ये ११७७, सन २०११ मध्ये ९९९, सन २०१२ मध्ये ९५१, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१५ मध्ये १३४८, सन २०१६ मध्ये १२३५, सन २०१७ मध्ये ११७६ व सन २०१८ मध्ये ११६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात मागील दोन वर्षांनंतर कमी झालेल्या शेतकरी आत्महत्या  यंदा वाढल्या आहेत. किंबहुना यंदा राज्यात सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यांत २५८, अमरावती  २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्धा जिल्ह्यात ७५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व सलग नापिकीमुळे मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र