शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: 'किंगमेकर' झाला 'किंग' ! नितीश कुमारांच्या JDU ची जोरदार मुसंडी, भाजपचीही उत्तम साथ
2
Bihar Election Result 2025: शिंदेसेनेच्या नेत्याचा जावई बिहार निवडणुकीत पिछाडीवर; JDU ची आघाडी
3
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
4
'निगेटिव्ह' झाली इलॉन मस्क यांची नेटवर्थ; एका झटक्यात ₹१८,२०,२५,८५,५०,००० चा फटका
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
7
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
8
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
9
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
10
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
11
माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...; अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
12
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
13
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
14
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
15
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
16
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
17
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
18
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
19
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
20
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
Daily Top 2Weekly Top 5

चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:44 IST

पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.

ची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला -  गजानन मोहोडअमरावती - दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांंच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या ११ महिन्यांत १०५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकरी बाहेर यावा, यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंताळ्यात बहुतांश शेतकरी वंचित राहिले. या कर्जमाफीनंतरही विदर्भातील सहा जिल्ह्यांत साडेतीन हजार शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यंदा जानेवारी महिन्यात ८५, फेब्रुवारी ७८, मार्च ९२, एप्रिल ७८, मे ९८, जून ९५, जुलै १०५, आॅगस्ट ११४, सप्टेंबर १०६ आॅक्टोबर ८६, नोव्हेंबर ९५ व १५ डिसेंबरच्यापर्यंत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्या सन २००१ पासून या सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त सात हजार ६६७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ हजार ९५० प्रकरणे अपात्र, तर २९६ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आतापर्यंत सात हजार ६३२ प्रकरणांत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे.सन २००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास सन २००५ च्या शासनादेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरुप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे ज्या कर्जासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकऱ्यांचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

आत्महत्यांचा आलेख वाढताचसन २००१ मध्ये ५२ शेतकरी आत्महत्या होत्या. सन २००२ मध्ये १०४, सन २००३ मध्ये १४८, सन २००४ मध्ये ४४८, सन २००५ मध्ये ४४५, सन २००६ मध्ये १४४९, सन २००७ मध्ये १२४७, सन २००८ मध्ये ११४८, सन २००९ मध्ये १००५, सन २०१० मध्ये ११७७, सन २०११ मध्ये ९९९, सन २०१२ मध्ये ९५१, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१५ मध्ये १३४८, सन २०१६ मध्ये १२३५, सन २०१७ मध्ये ११७६ व सन २०१८ मध्ये ११६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात मागील दोन वर्षांनंतर कमी झालेल्या शेतकरी आत्महत्या  यंदा वाढल्या आहेत. किंबहुना यंदा राज्यात सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यांत २५८, अमरावती  २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्धा जिल्ह्यात ७५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व सलग नापिकीमुळे मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र