शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

चिंताजनक! विदर्भातील सहा जिल्ह्यांत ११ महिन्यांत ११०० शेतकऱ्यांची आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 16:44 IST

पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे.

ची स्थिती : दर आठ तासांत एक शेतकरी कवटाळतो मृत्यूला -  गजानन मोहोडअमरावती - दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, यामुळे वाढलेले सावकारांचे कर्ज, मुला-मुलींचे शिक्षण, लग्न आदींमुळे शेतकऱ्यांंच्या संघर्षावर नैराश्य मात करीत आहे. जगावं कसं, या विवंचनेमुळे पश्चिम विदर्भासह वर्धा अशा सहा जिल्ह्यांत दर आठ तासांत एक शेतकरी मृत्यूला कवटाळत आहे. यंदाच्या ११ महिन्यांत १०५७ शेतकऱ्यांनी मृत्यूचा फास आवळला. सन २००१ पासून १५ डिसेंबरपर्यंत १६ हजार ९१८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव आहे.आर्थिक संकटातून शेतकरी बाहेर यावा, यासाठी यापूर्वीच्या शासनाने दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. मात्र, अटी, शर्तीच्या गुंताळ्यात बहुतांश शेतकरी वंचित राहिले. या कर्जमाफीनंतरही विदर्भातील सहा जिल्ह्यांत साडेतीन हजार शेतकºयांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. यंदा जानेवारी महिन्यात ८५, फेब्रुवारी ७८, मार्च ९२, एप्रिल ७८, मे ९८, जून ९५, जुलै १०५, आॅगस्ट ११४, सप्टेंबर १०६ आॅक्टोबर ८६, नोव्हेंबर ९५ व १५ डिसेंबरच्यापर्यंत ३५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहे.१९ वर्षांत १६,९१८ शेतकरी आत्महत्या सन २००१ पासून या सहा जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती विभागासह नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत १६ हजार ९१८ आत्महत्या झालेल्या आहेत. यामध्ये जाचक निकषामुळे फक्त सात हजार ६६७ प्रकरणे शासन मदतीसाठी पात्र ठरली आहेत. आठ हजार ९५० प्रकरणे अपात्र, तर २९६ प्रकरणे अद्यापही चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आतापर्यंत सात हजार ६३२ प्रकरणांत शेतकऱ्यांच्या वारसांना मदत देण्यात आलेली आहे.सन २००५ पासून शासन मदतीत वाढ नाहीकर्जबाजारी, कर्ज वसुलीचा तगादा व सातबाराधारक शेतकरी असल्यास सन २००५ च्या शासनादेशानुसार ३० हजार रुपये रोख व ७० हजारांची मुदती ठेव तीदेखील तहसीलदार व संबंधित मृताचा वारस यांचे संयुक्त नावे, असे मदतीचे स्वरुप आहे. यामध्ये १४ वर्षांत बदल झालेला नाही. विशेष म्हणजे ज्या कर्जासाठी शेतकऱ्याने आत्महत्या केली ते कर्ज त्यांच्या सातबारावर कायम राहते व निरंतर वाढत राहते. त्यामुळे मृत शेतकऱ्यांचा वारस बँकेचा थकबाकीदार असल्याने त्याला कर्ज मिळत नाही व अन्य लाभांपासून तो वंचित राहत असल्याचे वास्तव आहे.

आत्महत्यांचा आलेख वाढताचसन २००१ मध्ये ५२ शेतकरी आत्महत्या होत्या. सन २००२ मध्ये १०४, सन २००३ मध्ये १४८, सन २००४ मध्ये ४४८, सन २००५ मध्ये ४४५, सन २००६ मध्ये १४४९, सन २००७ मध्ये १२४७, सन २००८ मध्ये ११४८, सन २००९ मध्ये १००५, सन २०१० मध्ये ११७७, सन २०११ मध्ये ९९९, सन २०१२ मध्ये ९५१, सन २०१३ मध्ये ८०५, सन २०१४ मध्ये ९६४, सन २०१५ मध्ये १३४८, सन २०१६ मध्ये १२३५, सन २०१७ मध्ये ११७६ व सन २०१८ मध्ये ११६० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

राज्यात सर्वाधिक आत्महत्या यवतमाळातयवतमाळ जिल्ह्यात मागील दोन वर्षांनंतर कमी झालेल्या शेतकरी आत्महत्या  यंदा वाढल्या आहेत. किंबहुना यंदा राज्यात सर्वाधिक २६० शेतकरी आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात झाल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यात यंदा शेतकरी आत्महत्येत वाढ झाली. बुलडाणा जिल्ह्यात ११ महिन्यांत २५८, अमरावती  २५७, अकोला ११५, वाशीम ९१ व वर्धा जिल्ह्यात ७५ शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा व सलग नापिकीमुळे मृत्यूला कवटाळले आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याVidarbhaविदर्भMaharashtraमहाराष्ट्र