शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 08:02 IST

महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे. 

पुणे  : मराठी माणूस कंजूष आहे असं काहीवर्षांपूर्वी म्हटलं जायचं. आता मात्र हा विचार मागे पडत असून मराठी माणसे जगभर भ्रमंती करताना दिसून येतात. स्वतःसाठी कमवायचे आणि स्वतःसाठी खर्च करायचा अशी वृत्ती सध्या वाढत असल्याने अनेक जण पर्यटनाला प्राधान्य देतात. पण उपलब्ध वेळेनुसार परदेशात जाणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे. 

 

 

महाबळेश्वर : महाबळेश्वर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाचे ठाव घेणारे पहिले ठिकाण आहे. मुंबई, पुणे असो किंवा अगदी औरंगाबाद,नगर प्रत्येकाला महाबळेश्वर खुणावत असते. नवविवाहित जोडप्यांपासून ते अगदी कौटुंबिक पर्यटनासाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. स्ट्रॉबेरी हे इथले फळही प्रसिद्ध आहे. 

 

वेरूळ-अजिंठा लेणी : औरंगाबादजवळ वसलेली ही लेणी बघण्यासाठी संपूर्ण जगभरातून लोक येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने ही लेणी एकदा तरी बघायलाच हवा. 

 

ताडोबा अभयारण्य : १९५५ साली तयार करण्यात आलेले हे महाराष्ट्रातले सर्वात जुने अभयारण्य आहे. मगर, सुसर, रानगवा यांच्यासोबत इथे वाघही मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यातील या अभयारण्यातील जीपवरील सफारी एकदा तरी अनुभवायलाच हवी. 

 

कोकण : कोकण प्रत्येक ऋतूत वेगवेगळे असते असे म्हटले जाते. माडांची झाडे, समुद्र, भरभरून देणारा निसर्ग, काजू, आंब्यांची लयलूट असा प्रत्येक ऋतूत कोकणात पर्यटन करण्याचा अनुभव भिन्न आहे. 

 

तारकर्ली बीच :फार  प्रवास करण्याची इच्छा नसेल तर तारकर्ली बीचला पर्याय नाही. शांतता, समुद्र आणि साहसी खेळ त्यामुळे तरुणाईच्या हृदयात तारकर्लीचे स्थान वरती आहे. 

 

मुंबई :मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी एकदा तरी प्रत्येकाला मुंबई बघण्याची इच्छा असतेच. विशेषतः मरिन ड्राइव्ह, वांद्रे- वरळी सी लिंक, हाजी-अली दर्गा, शिवाजीपार्क मैदान, फिल्मसिटी बघण्यासाठी मोठी गर्दी होत असते. 

 

पाचगणी : निसर्गाच्या वरदानाने भरून पावलेले ठिकाण अर्थात पाचगणी. महाबळेश्वरपासून अगदी जवळ असणाऱ्या पाचगणीचे नाव पाच डोंगरांच्या मधोमध वसल्याने पडले आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड अशी पाचगणीची  वैशिष्ट्ये आहेत. 

 

माथेरान : हे ठिकाण मुंबईपासून जवळ आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ८०० मीटर उंचीवर वसलेल्या या ठिकाणाची  निर्मिती इंग्रजांनी केली आहे. शांत वातावरण, हवेतील थंडावा अनुभवायचा असेल तर माथेरानचा अनुभव घ्यायला हरकत नाही. 

 

कास पठार :सातारा शहरापासून पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील तलावातून सातारा शहराला पाणीपुरवठा होतो.  पावसाळा सुरू झाल्यावर या पठारावर असंख्य प्रकारची  अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला  आहे.

 

चिखलदरा : विदर्भातले महाबळेश्वर म्हणून चिखलदरा ओळखले जाते.त्यामुळे  थंड हवेचे ठिकाण म्हणून हा पर्याय उत्तम आहे. 

टॅग्स :PuneपुणेWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प