शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

जागतिक पर्यटन दिन विशेष : महाराष्ट्राच्या मनाचा ठाव घेणारी ही १० पर्यटनस्थळे नक्की बघा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 08:02 IST

महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे. 

पुणे  : मराठी माणूस कंजूष आहे असं काहीवर्षांपूर्वी म्हटलं जायचं. आता मात्र हा विचार मागे पडत असून मराठी माणसे जगभर भ्रमंती करताना दिसून येतात. स्वतःसाठी कमवायचे आणि स्वतःसाठी खर्च करायचा अशी वृत्ती सध्या वाढत असल्याने अनेक जण पर्यटनाला प्राधान्य देतात. पण उपलब्ध वेळेनुसार परदेशात जाणे शक्य होतेच असे नाही. अशावेळी महाराष्ट्राच्या मनाला तजेला देणारी ठिकाणे आठवतात. अशीच काही प्रत्येक मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेणारी पर्यटनस्थळे. 

 

 

महाबळेश्वर : महाबळेश्वर हे संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाचे ठाव घेणारे पहिले ठिकाण आहे. मुंबई, पुणे असो किंवा अगदी औरंगाबाद,नगर प्रत्येकाला महाबळेश्वर खुणावत असते. नवविवाहित जोडप्यांपासून ते अगदी कौटुंबिक पर्यटनासाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. स्ट्रॉबेरी हे इथले फळही प्रसिद्ध आहे. 

 

वेरूळ-अजिंठा लेणी : औरंगाबादजवळ वसलेली ही लेणी बघण्यासाठी संपूर्ण जगभरातून लोक येत असतात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने ही लेणी एकदा तरी बघायलाच हवा. 

 

ताडोबा अभयारण्य : १९५५ साली तयार करण्यात आलेले हे महाराष्ट्रातले सर्वात जुने अभयारण्य आहे. मगर, सुसर, रानगवा यांच्यासोबत इथे वाघही मोठ्या प्रमाणात आढळतात. चंद्रपूर जिल्ह्यातील या अभयारण्यातील जीपवरील सफारी एकदा तरी अनुभवायलाच हवी. 

 

कोकण : कोकण प्रत्येक ऋतूत वेगवेगळे असते असे म्हटले जाते. माडांची झाडे, समुद्र, भरभरून देणारा निसर्ग, काजू, आंब्यांची लयलूट असा प्रत्येक ऋतूत कोकणात पर्यटन करण्याचा अनुभव भिन्न आहे. 

 

तारकर्ली बीच :फार  प्रवास करण्याची इच्छा नसेल तर तारकर्ली बीचला पर्याय नाही. शांतता, समुद्र आणि साहसी खेळ त्यामुळे तरुणाईच्या हृदयात तारकर्लीचे स्थान वरती आहे. 

 

मुंबई :मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असली तरी एकदा तरी प्रत्येकाला मुंबई बघण्याची इच्छा असतेच. विशेषतः मरिन ड्राइव्ह, वांद्रे- वरळी सी लिंक, हाजी-अली दर्गा, शिवाजीपार्क मैदान, फिल्मसिटी बघण्यासाठी मोठी गर्दी होत असते. 

 

पाचगणी : निसर्गाच्या वरदानाने भरून पावलेले ठिकाण अर्थात पाचगणी. महाबळेश्वरपासून अगदी जवळ असणाऱ्या पाचगणीचे नाव पाच डोंगरांच्या मधोमध वसल्याने पडले आहे. खोल दऱ्या, धबधबे, कमलगड अशी पाचगणीची  वैशिष्ट्ये आहेत. 

 

माथेरान : हे ठिकाण मुंबईपासून जवळ आहे. समुद्रसपाटीपासून जवळपास ८०० मीटर उंचीवर वसलेल्या या ठिकाणाची  निर्मिती इंग्रजांनी केली आहे. शांत वातावरण, हवेतील थंडावा अनुभवायचा असेल तर माथेरानचा अनुभव घ्यायला हरकत नाही. 

 

कास पठार :सातारा शहरापासून पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील तलावातून सातारा शहराला पाणीपुरवठा होतो.  पावसाळा सुरू झाल्यावर या पठारावर असंख्य प्रकारची  अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला  आहे.

 

चिखलदरा : विदर्भातले महाबळेश्वर म्हणून चिखलदरा ओळखले जाते.त्यामुळे  थंड हवेचे ठिकाण म्हणून हा पर्याय उत्तम आहे. 

टॅग्स :PuneपुणेWorld Tourism Dayजागतिक पर्यटन दिनMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानTadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प