शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
2
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
3
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
5
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
6
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
7
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
8
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
9
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
11
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
12
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
13
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
14
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
15
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
16
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
17
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
18
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
19
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
20
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा

जागतिक ओझोन संवर्धन दिन विशेष : ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यांपर्यंतचे छिद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:09 IST

सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे..

ठळक मुद्देओझोन छिद्राचा मानवी जीवनावर परिणाम प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर

पुणे: रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधनांचा व धुर ओकणाºया वाहनांचा वाढता वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन वातावरणात पसरत आहे. परिणामी आशिया खंडावर ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यापर्यंतचे छिद्र तयार झाले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे, असे भूशास्त्राच्या अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जगभरात १६ सप्टेबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे एकट्या भारतानेच नाही तर जगातील सर्व देशांनी ओझोन संवर्धनाबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने ‘लोकमत’ने भूशास्त्राच्या अभ्यासकांशी संवाद साधला.अवकाशात तपांबराच्या वर २० ते ३० किमी मध्ये ओझोनचा थर असून सूर्याची अतिनील किरणे या थरामुळे थेट पृथ्वीवर येत नाहीत. परंतु, तापमानात वाढ होऊन वातावरणातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. आशिया खंडातील ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत चालेला आहे. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधने आदींमुळे क्लोरो फोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन उत्सर्जित होतो. त्यामुळे ओझोनला छिद्र पडते. ही प्रक्रिया होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे आणि शीत प्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या वाढत्या उपकरणांमुळे ही प्रक्रिया जलद गतीने होत आहे.भूशास्त्राचे अभ्यासक डॉ.श्रीकांत कार्लेकर म्हणाले,आशिया खंडामध्ये ओझोनच्या छिद्राचे प्रमाण ८ ते १० टक्के असून उत्तर धृवाच्या दिशेने गेल्यावर हे प्रमाण ३० टक्के तर अंटरटिकाकडे हे प्रमाण ६० टक्के आहे. वाढत्या एअर कंडिशनर,रेफ्रिजरेटर आणि धूर ओकणाºया वाहनांच्या वापरामुळे ओझोनच्या थराला धोका पोहचत आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून शीत प्रक्रिया उपकरणांचा वापर कमी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच त्त्वचेचे कॅन्सर आणि श्वसनाचे विकार होत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणHealthआरोग्य