शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

जागतिक ओझोन संवर्धन दिन विशेष : ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यांपर्यंतचे छिद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:09 IST

सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे..

ठळक मुद्देओझोन छिद्राचा मानवी जीवनावर परिणाम प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर

पुणे: रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधनांचा व धुर ओकणाºया वाहनांचा वाढता वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन वातावरणात पसरत आहे. परिणामी आशिया खंडावर ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यापर्यंतचे छिद्र तयार झाले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे, असे भूशास्त्राच्या अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जगभरात १६ सप्टेबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे एकट्या भारतानेच नाही तर जगातील सर्व देशांनी ओझोन संवर्धनाबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने ‘लोकमत’ने भूशास्त्राच्या अभ्यासकांशी संवाद साधला.अवकाशात तपांबराच्या वर २० ते ३० किमी मध्ये ओझोनचा थर असून सूर्याची अतिनील किरणे या थरामुळे थेट पृथ्वीवर येत नाहीत. परंतु, तापमानात वाढ होऊन वातावरणातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. आशिया खंडातील ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत चालेला आहे. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधने आदींमुळे क्लोरो फोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन उत्सर्जित होतो. त्यामुळे ओझोनला छिद्र पडते. ही प्रक्रिया होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे आणि शीत प्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या वाढत्या उपकरणांमुळे ही प्रक्रिया जलद गतीने होत आहे.भूशास्त्राचे अभ्यासक डॉ.श्रीकांत कार्लेकर म्हणाले,आशिया खंडामध्ये ओझोनच्या छिद्राचे प्रमाण ८ ते १० टक्के असून उत्तर धृवाच्या दिशेने गेल्यावर हे प्रमाण ३० टक्के तर अंटरटिकाकडे हे प्रमाण ६० टक्के आहे. वाढत्या एअर कंडिशनर,रेफ्रिजरेटर आणि धूर ओकणाºया वाहनांच्या वापरामुळे ओझोनच्या थराला धोका पोहचत आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून शीत प्रक्रिया उपकरणांचा वापर कमी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच त्त्वचेचे कॅन्सर आणि श्वसनाचे विकार होत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणHealthआरोग्य