शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

जागतिक ओझोन संवर्धन दिन विशेष : ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यांपर्यंतचे छिद्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 12:09 IST

सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे..

ठळक मुद्देओझोन छिद्राचा मानवी जीवनावर परिणाम प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर

पुणे: रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधनांचा व धुर ओकणाºया वाहनांचा वाढता वापर व सातत्याने होत असलेली वृक्षतोड यामुळे तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे क्लोरो फ्लोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन वातावरणात पसरत आहे. परिणामी आशिया खंडावर ओझोनच्या थरावर ८ ते १० टक्क्यापर्यंतचे छिद्र तयार झाले आहे. त्यातून सूर्याची अतिनील किरणे भूपृष्टावर येत असून त्याचा मानवी जीवनसह वन्यजीव, वनस्पती व जलचरांवर वितरित परिणाम झाला आहे, असे भूशास्त्राच्या अभ्यासकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जगभरात १६ सप्टेबर हा दिवस जागतिक ओझोन संवर्धन दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक पातळीवर वाढलेल्या प्रदूषणामुळे वातावरण, हवामान, पर्यावरण आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत. या प्रदूषणामुळे वातावरणातील ओझोनचा थर विरळ होऊन सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे एकट्या भारतानेच नाही तर जगातील सर्व देशांनी ओझोन संवर्धनाबाबत गांभीर्याने पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. या निमित्ताने ‘लोकमत’ने भूशास्त्राच्या अभ्यासकांशी संवाद साधला.अवकाशात तपांबराच्या वर २० ते ३० किमी मध्ये ओझोनचा थर असून सूर्याची अतिनील किरणे या थरामुळे थेट पृथ्वीवर येत नाहीत. परंतु, तापमानात वाढ होऊन वातावरणातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी होत चालले आहे. आशिया खंडातील ओझोन थर दिवसेंदिवस विरळ होत चालेला आहे. रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर, सौंदर्य प्रसाधने आदींमुळे क्लोरो फोरो कार्बन आणि ब्रोमो फ्लोरो कार्बन उत्सर्जित होतो. त्यामुळे ओझोनला छिद्र पडते. ही प्रक्रिया होण्यासाठी सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो. मात्र, वाढत्या वाहतुकीमुळे आणि शीत प्रक्रियेसाठी वापरल्या जाणा-या वाढत्या उपकरणांमुळे ही प्रक्रिया जलद गतीने होत आहे.भूशास्त्राचे अभ्यासक डॉ.श्रीकांत कार्लेकर म्हणाले,आशिया खंडामध्ये ओझोनच्या छिद्राचे प्रमाण ८ ते १० टक्के असून उत्तर धृवाच्या दिशेने गेल्यावर हे प्रमाण ३० टक्के तर अंटरटिकाकडे हे प्रमाण ६० टक्के आहे. वाढत्या एअर कंडिशनर,रेफ्रिजरेटर आणि धूर ओकणाºया वाहनांच्या वापरामुळे ओझोनच्या थराला धोका पोहचत आहे. काही देशांनी खबरदारीचा उपाय म्हणून शीत प्रक्रिया उपकरणांचा वापर कमी केला आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्याचे काम हाती घेतले आहे. वाढत्या तापमानामुळे बर्फ वितळून समुद्राच्या पातळीत वाढ होत आहे. तसेच त्त्वचेचे कॅन्सर आणि श्वसनाचे विकार होत आहेत. 

टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरणHealthआरोग्य