शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

जागतिक इंटरनेट दिन : स्पीडच्या नावाने होतेय फसवणूक,इंटरनेट वापरकर्त्यांपुढे आव्हान  ‘‘बँडव्हिडथचे’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 09:01 IST

सध्या मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होत असून अनेक कंपन्या ’’ फास्ट नेट स्पीड’’ च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करीत आहेत.

पुणे : डिजीटल इंडिया म्हणून गेल्या काही वर्षांपासून बराच बोलबाला झालेल्या देशात इंटरनेटच्या विविध समस्या आहेत. सध्या मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होत असून अनेक कंपन्या ’’ फास्ट नेट स्पीड’’ च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. दुसरीकडे भौगोलिक क्षेत्राची मर्यादा, त्यातील लोकसंख्येची घनता यासगळ्या पुरेशा संख्येने टॉवर नसल्याने ग्राहकांना बँडविडथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉपचे प्रमाण अद्याप आटोक्यात नाही. 

           पाश्चिमात्य देशात 5 आणि 6 जी टप्पा ओलांडला असताना भारतात मात्र अनेक ठिकाणी इंटरनेटच्या बाबत अडथळयांना तोंड द्यावे लागत आहे. विविध सर्व्हिस प्रोव्हायडरकडून टॉवर उभारले न गेल्याने ग्राहकांना इंटरनेटकरिता समस्येला सामोरे जावे लागते. भारतात 50 टक्यांपेक्षा भौगोलिक अधिक भाग असा आहे कि ज्याठिकाणी लोकसंख्या फारच विरळ आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास राजस्थानमधील वाळवंटी भागात कमी संख्येने लोक राहतात. तर शहरी भागातील एक चौ.कि.मी जागेत किमान पन्नास ते साठ हजार लोक राहतात. याचा परिणाम आपल्याला मिळणा-या इंटरनेटच्या सुविधेवर होताना दिसत असल्याचे संगणकतज्ञ डॉ.दिपक शिकारपुर सांगतात. याला तांत्रिक भाषेत  ‘‘टेलि डेन्सिटी’’ असे म्हणतात. परदेशात हेच प्रमाण पाच ते दहा हजारांच्या घरात आहे. आपल्याकडे संगणकाच्या तुलनेत मोबाईलवर सर्वाधिक संख्येने नेट सर्फिंग होते. संख्येच्या गुणोत्तराने मिळणा-या नेट सुविधेकडे पाहिल्यास त्यातील फोलपणा दिसून येतो. आक र्षक जाहिरात करुन ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे, त्यातून ग्राहकांच्या माथी कमी पैशांत जास्त नेट पँकेज देण्याचे आश्वासन देणे यामुळे शेवटी ग्राहकांना त्याचा तोटा सहन करावा लागतो. 

             एकीकडे नेटसाक्षरता, त्याचे प्रमान वाढीस लागले असताना दुस-या बाजुला नेट सर्विसिंगच्या दृष्टीने वेगवेगळ्या पातळ्यांवर बदल होण्याची गरज आहे. सध्या बाजारात वायमँक्स नावाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाय स्पीड बँडविडथ पोहचविली जाते. दरदिवशी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवीन यंत्राची, त्याच्यातील अत्याधुनिकतेची भर पडत असली तरी प्रत्यक्षात ’’ग्राऊंड लेव्हल’’ त्याचा होणा-या वापराविषयी उदासीनता आहे. आज अन्न,वस्त्र,निवारा याबरोबरच  ‘‘इंटरनेट’’ ही देखील काळाची गरज बनली असताना इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांकडून जलदगतीने इंटरनेटचा पुरवठा शंकास्पद आहे.  

 

  •  कॉल डॉप होणे, चांगल्या गुणवत्तेचे इंटरनेट असणार का आणि  ‘‘नेटवर्क जँम’’ ही प्रमुख भारतातील इंटरनेट समोरील आव्हाने आहेत. रस्त्या उपलब्ध नसल्यास इतर रस्त्यांवर वाहतूकीचा ताण येवून तेथे वाहतूक कोंडी होते. हेच तत्व इंटरनेटला देखील लागु आहे. जास्तीत जास्त संख्येने टॉवरची उभारणी त्यासाठी पर्याय आहे. 

 

  •  इंटरनेटचे प्रस्थ वाढत असताना दुसरीकडे त्यावर काय प्रसिध्द करायचे, काय वगळायचे यावर कुणाचीच  ‘‘सेंसॉरशिप’’ नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे माहितीची देवाण घेवाण न होता गंभीर धोके संभवतात. हँकिंग हा देखील इंटरनेट विश्वात खळबळ उडाल्याने त्यापासून सरंक्षणाचे देखील आव्हान अनेक कंपन्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांंपुढे देखील असल्याचे शिकारपुर सांगतात. 
टॅग्स :PuneपुणेInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान