शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जागतिक इंटरनेट दिन : स्पीडच्या नावाने होतेय फसवणूक,इंटरनेट वापरकर्त्यांपुढे आव्हान  ‘‘बँडव्हिडथचे’’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 09:01 IST

सध्या मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होत असून अनेक कंपन्या ’’ फास्ट नेट स्पीड’’ च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करीत आहेत.

पुणे : डिजीटल इंडिया म्हणून गेल्या काही वर्षांपासून बराच बोलबाला झालेल्या देशात इंटरनेटच्या विविध समस्या आहेत. सध्या मोबाईलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर इंटरनेटचा वापर होत असून अनेक कंपन्या ’’ फास्ट नेट स्पीड’’ च्या नावाखाली ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. दुसरीकडे भौगोलिक क्षेत्राची मर्यादा, त्यातील लोकसंख्येची घनता यासगळ्या पुरेशा संख्येने टॉवर नसल्याने ग्राहकांना बँडविडथ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. कॉल ड्रॉपचे प्रमाण अद्याप आटोक्यात नाही. 

           पाश्चिमात्य देशात 5 आणि 6 जी टप्पा ओलांडला असताना भारतात मात्र अनेक ठिकाणी इंटरनेटच्या बाबत अडथळयांना तोंड द्यावे लागत आहे. विविध सर्व्हिस प्रोव्हायडरकडून टॉवर उभारले न गेल्याने ग्राहकांना इंटरनेटकरिता समस्येला सामोरे जावे लागते. भारतात 50 टक्यांपेक्षा भौगोलिक अधिक भाग असा आहे कि ज्याठिकाणी लोकसंख्या फारच विरळ आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास राजस्थानमधील वाळवंटी भागात कमी संख्येने लोक राहतात. तर शहरी भागातील एक चौ.कि.मी जागेत किमान पन्नास ते साठ हजार लोक राहतात. याचा परिणाम आपल्याला मिळणा-या इंटरनेटच्या सुविधेवर होताना दिसत असल्याचे संगणकतज्ञ डॉ.दिपक शिकारपुर सांगतात. याला तांत्रिक भाषेत  ‘‘टेलि डेन्सिटी’’ असे म्हणतात. परदेशात हेच प्रमाण पाच ते दहा हजारांच्या घरात आहे. आपल्याकडे संगणकाच्या तुलनेत मोबाईलवर सर्वाधिक संख्येने नेट सर्फिंग होते. संख्येच्या गुणोत्तराने मिळणा-या नेट सुविधेकडे पाहिल्यास त्यातील फोलपणा दिसून येतो. आक र्षक जाहिरात करुन ग्राहकांचे लक्ष वेधून घेणे, त्यातून ग्राहकांच्या माथी कमी पैशांत जास्त नेट पँकेज देण्याचे आश्वासन देणे यामुळे शेवटी ग्राहकांना त्याचा तोटा सहन करावा लागतो. 

             एकीकडे नेटसाक्षरता, त्याचे प्रमान वाढीस लागले असताना दुस-या बाजुला नेट सर्विसिंगच्या दृष्टीने वेगवेगळ्या पातळ्यांवर बदल होण्याची गरज आहे. सध्या बाजारात वायमँक्स नावाच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हाय स्पीड बँडविडथ पोहचविली जाते. दरदिवशी माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नवीन यंत्राची, त्याच्यातील अत्याधुनिकतेची भर पडत असली तरी प्रत्यक्षात ’’ग्राऊंड लेव्हल’’ त्याचा होणा-या वापराविषयी उदासीनता आहे. आज अन्न,वस्त्र,निवारा याबरोबरच  ‘‘इंटरनेट’’ ही देखील काळाची गरज बनली असताना इंटरनेट सेवा देणा-या कंपन्यांकडून जलदगतीने इंटरनेटचा पुरवठा शंकास्पद आहे.  

 

  •  कॉल डॉप होणे, चांगल्या गुणवत्तेचे इंटरनेट असणार का आणि  ‘‘नेटवर्क जँम’’ ही प्रमुख भारतातील इंटरनेट समोरील आव्हाने आहेत. रस्त्या उपलब्ध नसल्यास इतर रस्त्यांवर वाहतूकीचा ताण येवून तेथे वाहतूक कोंडी होते. हेच तत्व इंटरनेटला देखील लागु आहे. जास्तीत जास्त संख्येने टॉवरची उभारणी त्यासाठी पर्याय आहे. 

 

  •  इंटरनेटचे प्रस्थ वाढत असताना दुसरीकडे त्यावर काय प्रसिध्द करायचे, काय वगळायचे यावर कुणाचीच  ‘‘सेंसॉरशिप’’ नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे माहितीची देवाण घेवाण न होता गंभीर धोके संभवतात. हँकिंग हा देखील इंटरनेट विश्वात खळबळ उडाल्याने त्यापासून सरंक्षणाचे देखील आव्हान अनेक कंपन्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांंपुढे देखील असल्याचे शिकारपुर सांगतात. 
टॅग्स :PuneपुणेInternetइंटरनेटtechnologyतंत्रज्ञान