शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

"जरांगेंच्या निर्णयामुळे कार्यकर्त्यांचं नुकसान; ...आम्ही व्यवस्थित डाव मारू!"; काय म्हणाले बच्चू कडू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:48 IST

जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला."

मनोज जरांगे यांनी जो काही निर्णय घेतला आहे (निवडणूक न लढवण्याचा) त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे, ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, असे सांगणे, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनीही बोलवून दाखवले आहे. असे बच्चू कडू यांनी म्हटले आहे. याशिवाय, निवडणुकीनंतर, सर्वांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू," असा विशअवासही बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. ते अमरावतीत माध्यमांसोबत बोलत होते.  जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या घोषणेसंदर्भात बोलताना बच्चू कडू म्हणाले, "खरे तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण जो काही निर्णय घेतला, त्याला फार उशिरा केला. एक तर कार्यकर्त्यांना अर्ज भरायला लावणे. ४ तारखेला आम्ही लिस्ट जाहीर करतो, नंतर पुन्हा दुसरी तारीख देणे, यामुळे कार्यकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले. हे कार्यकर्त्यांनी बोलवूनही दाखवले. एक तर आपण सांगायला हवे होते की, निवडणूक लढणार नाही. आता तुम्ही निवडणुकीचे २५ टक्के, ५० टक्के पार्ट झाल्यानंतर सांगत आहात की आता नाही लढत. यात ज्या कार्यकर्त्यांनी इकडून तिकडून पैसे आणून खर्च केला होता, त्याला आर्थिक झळ बसली आहे. 

कडू म्हणाले, "त्यांची (जरांगे) एक गोष्ट मान्य आहे की, एका जातीवर निवडणूक होत नाही आणि एका जातीवर निवडणूक करण्याचा कुणी प्रयत्नही करू नये. कारण देशात जात आणि धर्म आणि पैसा या सगळ्या गोष्टींना दूर ठेवून राजकीय पक्षांना राजकारण करता येत नाही. ही सर्वात मोठी कमजोरी आहे. मात्र सगळे पक्ष धर्म, जात आणि पैसा सोडून जर उतरण्याची तयारी नसल्याने, संपूर्ण देशावर त्याचा मोठा परिणाम होत आहे." 

"लोक मूळ मुद्द्यांऐवजी नको ते मुद्दे बाहेर आणल्याने, आज अतिशय वाईट स्थिती देशात आहे. तुम्ही जर पाहिले, तर रुग्णालयांचे काय हाल आहेत, शाळांचे काय हाल आहेत, शेतीमालाला भाव नाही. या अनेक गोष्टी आपण पाहिल्या, तर याचा प्रचंड रोष लोकांमध्ये आहे. परंतु आम्ही राजकीय लोकांनी जाती-धर्माच्या मुद्द्यावर यश मिळवले आहे. यामुळे मूळ मुद्द्यांपासून दूर जात आहोत," असेही कडू यांनी म्हटले आहे.

किती जागा लढवणार आणि भविष्यात महायुती अथवा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याची वेळ आली तर आपले पर्याय खुले आहेत का? असे विचारले असता, कडू म्हणाले, "आम्ही ४० जागा आता महाशक्तीमध्ये लढणार आहोत. संपूर्ण महाशक्ती १२१ जागा लढते आहे आणि यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काही जागेवर आम्ही विजय मिळवणार आहोत. आता राहिला प्रश्न पुढे काय करणार आहोत? तर मला वाटते आमचे सरकार बनेल. सगळ्यांची सांगड तुटेल. सगळ्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होईल आणि अशा परिस्थितीत आम्ही व्यवस्थित डाव मारू," असा विश्वासही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBachhu Kaduबच्चू कडूElectionनिवडणूक 2024