शहरं
Join us  
Trending Stories
1
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
2
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
3
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नाही म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
4
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
5
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
6
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
7
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
8
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
9
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
11
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
12
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
14
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
15
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
16
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
17
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
18
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
19
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
20
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?

पाण्याच्या खेपा करून ग्रामीणमधील महिलांचे आरोग्य धोक्यात : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 20:34 IST

मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. 

ठळक मुद्दे- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा दुष्काळी दौरा- चारा छावण्यांसह दुष्काळी गावांना दिली चित्रा वाघ यांनी भेटी- पाहणी करताना शेतकºयांच्या व महिलांच्या समस्या घेतल्या जाणून

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत महिला आणि मुलांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

चित्रा वाघ यांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यानंतर राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की,  ग्रामीण भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. डोक्यावर आणि कमरेवर पाण्याच्या घागरी, हंडे वाहिल्याने ग्रामीण भागातील महिलांना गर्भपात, कमरेच्या विकारासह अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. अनेक छावण्यांवर महिलांना मुक्काम करावा लागत आहे. त्यांच्या मागे मुलांची हेळसांड होत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने बालगृहे सुरू करायला हवीत. महिलांसाठी शाश्वत रोजगार हमी योजना सुरू करायला हवी. ५० वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामस्थांसाठी अनुदान द्यायला हवे. 

अनेक महिलांनी शेळ्या, मेंढ्या यांच्या चाºयासाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. दुष्काळाच्या काळात लोक वैतागलेले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी या सर्व मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, निर्मला बावीकर, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होत्या. 

जनावरांना, माणसांना एकसारखे पाणीचित्रा वाघ यांनी छावण्यांमधील विदारक परिस्थिती कथन केली. छावण्यांवर जनावरांसाठी उपलब्ध असलेले पाणी माणसांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. जनावरांना उसाचा चारा दिला जातोय. एकच प्रकारचा चारा खाऊन जनावरांच्या तोंडाला फेस येतोय. घरदार सोडून लोक जनावरांसाठी छावण्यांवर आले आहेत. सरकारने केवळ पाच जनावरांना चारा मिळेल, अशी अट घातली आहे. त्याचाही त्रास अनेक शेतकºयांना होतोय. मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळChitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाHealthआरोग्य