शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

पाण्याच्या खेपा करून ग्रामीणमधील महिलांचे आरोग्य धोक्यात : चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 20:34 IST

मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. 

ठळक मुद्दे- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांचा दुष्काळी दौरा- चारा छावण्यांसह दुष्काळी गावांना दिली चित्रा वाघ यांनी भेटी- पाहणी करताना शेतकºयांच्या व महिलांच्या समस्या घेतल्या जाणून

सोलापूर : दुष्काळी परिस्थितीत महिला आणि मुलांचे हाल होत आहेत. राज्य सरकारने त्यांच्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

चित्रा वाघ यांनी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील चारा छावण्यांना भेट दिली. यानंतर राष्ट्रवादी भवनात झालेल्या कार्यक्रमावेळी त्यांनी ‘लोकमत’ शी संवाद साधला़ पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की,  ग्रामीण भागात पाण्याची मोठी टंचाई आहे. डोक्यावर आणि कमरेवर पाण्याच्या घागरी, हंडे वाहिल्याने ग्रामीण भागातील महिलांना गर्भपात, कमरेच्या विकारासह अनेक प्रकारचे आजार जडत आहेत. अनेक छावण्यांवर महिलांना मुक्काम करावा लागत आहे. त्यांच्या मागे मुलांची हेळसांड होत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन सरकारने बालगृहे सुरू करायला हवीत. महिलांसाठी शाश्वत रोजगार हमी योजना सुरू करायला हवी. ५० वर्षांवरील शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या ग्रामस्थांसाठी अनुदान द्यायला हवे. 

अनेक महिलांनी शेळ्या, मेंढ्या यांच्या चाºयासाठी अनुदान देण्याची मागणी केली आहे. ही बाब दुर्लक्ष करण्यासारखी नाही. दुष्काळाच्या काळात लोक वैतागलेले आहेत. सरकारला जाग आणण्यासाठी या सर्व मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयमाला गायकवाड, निर्मला बावीकर, कविता म्हेत्रे आदी उपस्थित होत्या. 

जनावरांना, माणसांना एकसारखे पाणीचित्रा वाघ यांनी छावण्यांमधील विदारक परिस्थिती कथन केली. छावण्यांवर जनावरांसाठी उपलब्ध असलेले पाणी माणसांना पिण्यासाठी वापरावे लागत आहे. जनावरांना उसाचा चारा दिला जातोय. एकच प्रकारचा चारा खाऊन जनावरांच्या तोंडाला फेस येतोय. घरदार सोडून लोक जनावरांसाठी छावण्यांवर आले आहेत. सरकारने केवळ पाच जनावरांना चारा मिळेल, अशी अट घातली आहे. त्याचाही त्रास अनेक शेतकºयांना होतोय. मुख्यमंत्री एसीमध्ये बसून दुष्काळाचे नियोजन करीत आहेत. हे सरकार इलेक्शन मूडमधून बाहेर आलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळChitra Waghचित्रा वाघNCPराष्ट्रवादी काँग्रेसWomenमहिलाHealthआरोग्य