शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विधिमंडळाच्या महिला-बाल हक्क व कल्याण समिती दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2018 22:40 IST

विधिमंडळाच्या महिला-बाल हक्क व कल्याण समितीनं ग्रामपंचायत,महापालिका, बालसुधारगृह, आदिवासी आश्रमशाळांना दिल्या भेटी

मनोहर कुंभेजकर 

विधिमंडळाच्या महिला व बाल हक्क कल्याण समितीचा दौरा नुकताच उल्हासनगर, जव्हार, मोखाडा आणि भिवंडी येथे आयोजित करण्यात आला होता. या दौ-यामध्ये उल्हासनगर महानगरपालिका, जव्हार ग्रामपंचायत, मोखाडा ग्रामपंचायत, उल्हासनगर आणि भिवंडी येथील बालसुधारगृह, आदिवासी आश्रमशाळांचा आदींचा समावेश होता. समितीने विविध ठिकाणच्या समस्यांचा आढावा घेतला आणि महत्त्वपूर्ण सूचना देऊन त्या सूचनांचे पालन करण्याचे आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य  संस्था, प्रशासनाला दिले आहेत.विधिमंडळाची महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा व वर्सोव्याच्या भाजपा आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी आज वर्सोवा म्हाडा कॉलनी येथील कार्यालयात त्यांची भेट घेतली असता त्यांनी लोकमतला या दौऱ्याविषयी विस्तृत माहिती दिली.

विधिमंडळाची महिला व बाल हक्क आणि कल्याण समिती महिलांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांची माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी भेट देऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्नशील असते. महिलांचे हक्क, त्यांचे संरक्षण तसेच महिलांसाठीच्या योजना व सोयी सुविधांचे पालन होते कि नाही याची पडताळणी करते. महिलांचे हक्क आणि अधिकार अबाधित ठेवण्याच्या महत्त्वपूर्ण सूचनाही ही समिती संबंधित स्वराज्य संस्था, प्राधिकरणांना देत असते. नुकतीच महिला व बाल हक्क आणि कल्याण समितीच्या अध्यक्षा व आमदार डॉ. भारती लव्हेकर आणि समितीच्या अन्य सदस्यांनी ग्रामपंचायती, बालसुधारगृह, आदिवासी आश्रमशाळांना भेट दिली. महिलांना नोक-यांमध्ये प्राधान्य मिळावे या हेतूने शासनाने २५ मे २००१ मध्ये एक जीआर काढला होता.त्यानुसार महिलांना शासकीय व निमशासकीय संस्थांमधील नोक-यांमध्ये ३० % आरक्षण द्यावे असे नमूद करण्यात आले होते. या जीआरची अंमलबजावणी होते कि नाही याची माहिती या दौ-यावेळी घेण्यात आली अशी माहिती डॉ.लव्हेकर यांनी दिली.

तसेच महिला बजेटसाठी वेगळा ५ % निधी राखीव ठेवला जात आहे का नाही, त्यासाठी राखीव असलेल्या निधीचा वापर होतो का याची पडताळणी समितीने केली. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे महिला व बाल कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी होते कि नाही, बचत गटांना गाळे मिळतात कि नाही, महिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृह आहेत कि नाही याची खातरजमा यावेळी समिती सदस्यांनी केली.स्त्रियांना कामाच्या ठिकाणी होणा-या लैंगिक अत्याचाराच्या अनुषंगाने विशाखा समितीची स्थापना करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्यानुसार विविध ठिकाणी विशाखा कमिटीची स्थापना केली आहे कि नाही तसेच या कमिटीच्या पदाधिका-यांच्या नावासह आणि त्यांचे संपर्क क्रमांक असलेला बोर्ड लावणे बंधनकारक असते. हा बोर्ड लावण्यात आलेला आहे का नाही याची खातरजमा केली. तसेच प्रत्येक ऑफिसमध्ये  महिला कक्ष आहे कि नाही, सार्वजनिक स्वच्छतागृह आणि त्यातील सुविधा  आदींचा आढावा यावेळी घेण्यात आला.अलीकडेच विधिमंडळाच्या महिला हक्क आणि कल्याण समितीची कार्यकक्षा वाढली असून त्यामध्ये महिलांच्या प्रश्नांबरोबरच बालकांचे प्रश्न आणि त्यांच्या समस्या यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या समितीचे नावही आता महिला व बाल हक्क आणि कल्याण समिती असे करण्यात आले आहे असे आमदार डॉ.भारती लव्हेकर यांनी शेवटी सांगितले.

टॅग्स :Bharati lavhekarभारती लव्हेकर