- विवेक भुसे- पुणे : महाराष्ट्रातील प्राणघातक अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून २०१८ मध्ये रस्त्यावरील अपघातात १३ हजार २६१ जणांचा मृत्यु झाला़. त्यात हेल्मेट परिधान न केलेल्या ५ हजार २५२ जणांचा समावेश असून हे प्रमाण ३९ ़६ टक्के इतके प्रचंड आहे़. त्याखालोखाल ओव्हर स्पिडिंग (अतिवेग)मुळे ३ हजार ९२६ जणांना (२९़६ टक्के) आपले प्राण गमवावे लागले आहेत़. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी (दि. ३१) मुंबईत झाली़. या बैठकीत ही माहिती देण्यात आली़. देशातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बुधवारी संसदेने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीत दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केले़. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राज्यातील वाढत्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली़. राज्यात २०१८ मध्ये २० हजार ३३५ जण विविध अपघातात गंभीर जखमी झाले तर, ११ हजार ३० किरकोळ जखमी झाले होते़. त्यात दुचाकीस्वार व सहप्रवाशांची संख्या मोठी आहे़. हेल्मेट परिधान न करणारे ६ हजार ४२० (३१़६ टक्के) गंभीर जखमी झाले होते तर, ३ हजार ५५१ (३२़१ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. अतिवेगामुळे ५ हजार ६२३ (२७़७टक्के)गंभीर जखमी झाले असून ३ हजार ६० (२८ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़.
जीवघेण्या अपघातात सर्वाधिक प्रमाण विनाहेल्मेटचे ; ५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:53 IST
हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़.
जीवघेण्या अपघातात सर्वाधिक प्रमाण विनाहेल्मेटचे ; ५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू
ठळक मुद्दे५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू; बळींमध्ये ३९.६ टक्क्यांनी परिधान केले नव्हते हेल्मेट