शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
2
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
3
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
4
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
5
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
6
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
7
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
8
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
9
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
10
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
11
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
12
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
13
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
14
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
15
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
16
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
17
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
18
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
19
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
20
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेण्या अपघातात सर्वाधिक प्रमाण विनाहेल्मेटचे ; ५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2019 13:53 IST

हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़.

ठळक मुद्दे५ हजार २५२ दुचाकीस्वारांचा मृत्यू; बळींमध्ये ३९.६ टक्क्यांनी परिधान केले नव्हते हेल्मेट

- विवेक भुसे- पुणे : महाराष्ट्रातील प्राणघातक अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून २०१८ मध्ये रस्त्यावरील अपघातात १३ हजार २६१ जणांचा मृत्यु झाला़. त्यात हेल्मेट परिधान न केलेल्या ५ हजार २५२ जणांचा समावेश असून हे प्रमाण ३९ ़६ टक्के इतके प्रचंड आहे़. त्याखालोखाल ओव्हर स्पिडिंग (अतिवेग)मुळे ३ हजार ९२६ जणांना (२९़६ टक्के) आपले प्राण गमवावे लागले आहेत़. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक  बुधवारी (दि. ३१) मुंबईत झाली़. या बैठकीत ही माहिती देण्यात आली़. देशातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी बुधवारी संसदेने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीत दुरुस्ती करणारे विधेयक मंजूर केले़. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीत राज्यातील वाढत्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली़. राज्यात २०१८ मध्ये २० हजार ३३५ जण विविध अपघातात गंभीर जखमी झाले तर, ११ हजार ३० किरकोळ जखमी झाले होते़. त्यात दुचाकीस्वार व सहप्रवाशांची संख्या मोठी आहे़. हेल्मेट परिधान न करणारे ६ हजार ४२० (३१़६ टक्के) गंभीर जखमी झाले होते तर, ३ हजार ५५१ (३२़१ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. अतिवेगामुळे ५ हजार ६२३ (२७़७टक्के)गंभीर जखमी झाले असून ३ हजार ६० (२८ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. 

मोटारीच्या अपघातात प्रामुख्याने सिटबेल्टचा वापर न केल्याने १ हजार ६५६ (१२़५ टक्के) आपले प्राण गमवावे लागले होते़. तसेच २ हजार ९२१ (१४़३ टक्के) गंभीर जखमी तर १ हजार ७१३ जण (१५़५ टक्के) किरकोळ जखमी झाले होते़. हेल्मेट न वापरणे, अतिवेगाने वाहन चालविणे आणि सिटबेल्टचा वापर न करणे, अशा तीन प्रमुख कारणे प्राणघातक अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले़. रॉग साईटने येणाºयामुळे ३८४ (३टक्के) जणांच्या प्राणावर बेतले असून वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्याने झालेल्या अपघातात ५५ (०़४ टक्के) जणांनी प्राण गमावले़ दारू पिऊन गाडी चालविणाºया ४२ जणांना (०़३ टक्के) मृत्युने गाठले होते़ लाल दिवा ओलंडल्याने अपघात होऊन १६ जणांचा मृत्यु झाला़.......पुणे शहरात जानेवारी ते जुलै अखेर झालेल्या अपघातात हेल्मेट परिधान न केलेल्या ४७ जणांना अपघाती मृत्यु झाला आहे़ त्यात ३६ जण चालक होते तर ११ जण सहप्रवासी होते़ तर, हेल्मेटधारक ६ जण मृत्युमुखी पडले आहेत़ तसेच विना हेल्मेट १३४ गंभीर जखमी झाले आहेत. त्यात ९९ वाहनचालक असून ३ सहप्रवासी आहेत़. हेल्मेटधारक तिघे गंभीर जखमी झाले आहेत़.  जुलै अखेर प्राणघातक अपघातात ५९ जणांचा मृत्यु झाला़. अतिवेगामुळे झालेल्या अपघातात ५३ जणांचा मृत्यु झाला असून ११५ जण गंभीर जखमी झाले आहेत़. .....राज्यातील व पुण्यातील प्राणघातक व गंभीर अपघात पाहिले तर विना हेल्मेट असलेल्यांची संख्या भयंकर आहे़. हेल्मेट विना असलेल्यांची गंभीर जखमी असलेल्यांची संख्या अधिक आहे़. हेल्मेट असलेले इतके गंभीर जखमी नाहीत हे महत्वाचे आहे़ डॉ़ के़ व्यंकटेशम, पोलीस आयुक्त, पुणे

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस