शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

शिवसेना, NCPमधील फुटीमुळे BJPला फायदा होईल का? सर्वेतून समोर आली धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 19:45 IST

Maharashtra Political Update: महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपावर चौफेर टीका होत असते. मात्र आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीचा भाजपाला फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये ठरावीक अंतराने नवनवे अंक समोर येत आहेत. मुख्यमंत्रिपदावर दावेदारी करत उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला अडीच वर्षे महाविकास आघाडीचं सरकार चालवल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडाचा फायदा घेत भाजपाने पुन्हा एकदा राज्यात आपली सत्ता आणली होती. त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडत अजित पवार यांनाही भाजपाने युती सरकारमध्ये सामावून घेतले होते. दरम्यान, या फोडाफोडीच्या राजकारणामुळे भाजपावर चौफेर टीका होत असते. मात्र आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीचा भाजपाला फायदा होईल का, असा प्रश्न विचारला असता सर्व्हेमधून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. 

इंडिया टुडे आणि सी वोटर यांनी देशाचा कल जाणून घेण्यासाठी केलेल्या एका व्यापक सर्वेमध्ये विरोधी पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे महाराष्ट्रात भाजपाला फायदा होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना तब्बल ६० टक्के लोकांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीमुळे भाजपाला फायदा होईल, असं म्हटलं आहे. तर २५ टक्के लोकांनी या फुटीचा भाजपाला काहीही फायदा होणार नाही, असं म्हटलं आहे. तर १५ टक्के लोकांनी काही सांगता येणार नाही, असं मत मांडलं आहे.

याच सर्वेमध्ये भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय का? असा प्रश्न विचारण्यात आला असता तब्बल ४५ टक्के लोकांनी होय असं उत्तर दिलं आहे. तर ३८ टक्के लोकांनी तसा दुरुपयो हा सर्वच पक्ष करतात, असं उत्तर दिलं आहे. 

इंडिया टुडे आणि सी वोटरने हा सर्वे १५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये केला आहे. त्यामध्ये एकूण २५ हजार ९५१ जणांचा कल जाणून घेण्यात आला आहे. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस