शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
3
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
4
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
5
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
6
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
7
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
8
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
9
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
10
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
11
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
12
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
13
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
14
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
15
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
16
"उद्धव ठाकरे इंडिगोने फिरत नाहीत"; CM फडणवीसांचा खोचक टोला; म्हणाले,"अडचण असल्यास गाडी पाठवून देतो!"
17
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
18
610 कोटी रिफंड, 3000 बॅग परत केल्या..., इंडिगोच्या 1650 फ्लाइट ट्रॅकवर; भाडेवाढीसंदर्भात सरकारचे कडक निर्देश 
19
नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षनेता मिळणार का? CM फडणवीस म्हणाले, "आमचा विरोध नाही, पण..."
20
'बिग बॉस १९'च्या ग्रँड फिनालेला सुरुवात, वोटिंग ट्रेंडनुसार 'हा' स्पर्धक जिंकण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

राजेश टोपेंचं मायक्रो मॅनेजमेंट शिवसेनेवर पडणार पुन्हा भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 11:11 IST

लढत चुरशीची होणार असल्यामुळे एक-एक मतांचा विचार होऊ शकतो. अशा वेळी टोपे यांचे अखेरच्या दिवशीचे मॅनेजमेंट गेमचेंजर ठरू शकते.

- रवींद्र देशमुखमुंबई - जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघातील लढत 2014 मध्ये एकतर्फी झाली होती. आमदार राजेश टोपे यांनी सहज विजय मिळवत जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा उंचावला होता. यावेळी मात्र राजेश टोपे यांना शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. उढाण यांच्या मदतीला भाजपही होते. परंतु, राजेश टोपे यांचे मायक्रो मॅनेजमेंट पुन्हा एकदा शिवसेनेला भारी पडत की काय, अशी स्थिती मतदार संघात आहे.

शिक्षण संस्था,  साखर कारखाने आणि सुतगिरणीच्या माध्यमातून मतदार संघात केलेलं संघटन टोपे यांना फायदेशीर ठरत आहे. कार्यकर्त्यांसह प्रचार कार्यात टोपे यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे सहाजिकच टोपे यांचे पारडे जड झाले आहे.  दुसरीकडे हिकमत उढाण यांची मदार सर्वस्वी शिवसैनिकांवर होती. शिवसैनिकांनी देखील मतदार संघ पिंजून काढला आहे. पण जबाबदारीने काम करणाऱ्या शिवसैनिकांची संख्या किती हाही महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

निवडणूक म्हटलं की, मतदानाचा आणि त्याआधीचा एक दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. संपूर्ण प्रचारात जे साध्य होत नाही, ते या दोन दिवसांत होते. यामध्ये मतदारांना मतदानासाठी घरातून बाहेर काढण्यासापासून बाहेरगावी असलेले मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यापर्यंतच्या गोष्टीला महत्त्व असते. यामध्ये टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी चोख भूमिका बजावल्याचे दिसून आले.

बाहेर गावाच्या मतदारांशी संपर्क करून लोकशाही मजबूत व्हावी, या उद्देशाने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम टोपे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. लढत चुरशीची होणार असल्यामुळे एक-एक मतांचा विचार होऊ शकतो. अशा वेळी टोपे यांचे अखेरच्या दिवशीचे मॅनेजमेंट गेमचेंजर ठरू शकते.