शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

राजेश टोपेंचं मायक्रो मॅनेजमेंट शिवसेनेवर पडणार पुन्हा भारी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 11:11 IST

लढत चुरशीची होणार असल्यामुळे एक-एक मतांचा विचार होऊ शकतो. अशा वेळी टोपे यांचे अखेरच्या दिवशीचे मॅनेजमेंट गेमचेंजर ठरू शकते.

- रवींद्र देशमुखमुंबई - जालना जिल्ह्यातील घनसावंगी मतदार संघातील लढत 2014 मध्ये एकतर्फी झाली होती. आमदार राजेश टोपे यांनी सहज विजय मिळवत जिल्ह्यात राष्ट्रवादीचा झेंडा उंचावला होता. यावेळी मात्र राजेश टोपे यांना शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांनी चांगलीच टक्कर दिली आहे. उढाण यांच्या मदतीला भाजपही होते. परंतु, राजेश टोपे यांचे मायक्रो मॅनेजमेंट पुन्हा एकदा शिवसेनेला भारी पडत की काय, अशी स्थिती मतदार संघात आहे.

शिक्षण संस्था,  साखर कारखाने आणि सुतगिरणीच्या माध्यमातून मतदार संघात केलेलं संघटन टोपे यांना फायदेशीर ठरत आहे. कार्यकर्त्यांसह प्रचार कार्यात टोपे यांची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत होती. त्यामुळे सहाजिकच टोपे यांचे पारडे जड झाले आहे.  दुसरीकडे हिकमत उढाण यांची मदार सर्वस्वी शिवसैनिकांवर होती. शिवसैनिकांनी देखील मतदार संघ पिंजून काढला आहे. पण जबाबदारीने काम करणाऱ्या शिवसैनिकांची संख्या किती हाही महत्त्वाचा विषय ठरणार आहे.

निवडणूक म्हटलं की, मतदानाचा आणि त्याआधीचा एक दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो. संपूर्ण प्रचारात जे साध्य होत नाही, ते या दोन दिवसांत होते. यामध्ये मतदारांना मतदानासाठी घरातून बाहेर काढण्यासापासून बाहेरगावी असलेले मतदार मतदान केंद्रापर्यंत आणण्यापर्यंतच्या गोष्टीला महत्त्व असते. यामध्ये टोपे यांच्या कार्यकर्त्यांनी चोख भूमिका बजावल्याचे दिसून आले.

बाहेर गावाच्या मतदारांशी संपर्क करून लोकशाही मजबूत व्हावी, या उद्देशाने मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे काम टोपे यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. लढत चुरशीची होणार असल्यामुळे एक-एक मतांचा विचार होऊ शकतो. अशा वेळी टोपे यांचे अखेरच्या दिवशीचे मॅनेजमेंट गेमचेंजर ठरू शकते.