शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

पुन्हा लॉकडाऊन होणार?; ठाकरे सरकारच्या मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 16:19 IST

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून वाढ; दुसऱ्या लाटेची भीती

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळे सरकार आणि आरोग्य व्यवस्थेची चिंता वाढली आहे. दिवाळीत अनेक ठिकाणी गर्दी दिसून आली. त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल जनतेला संबोधित केलं. लॉकडाऊन माझा आवडता विषय नाही. पुन्हा 'लॉकडाऊन'च्या दिशेनं जायचं नसेल तर वेळीच सावध व्हा, असं म्हणत ठाकरेंनी जनतेला खबरदारीचा इशारा दिला. लॉकडाऊन काही माझा आवडता विषय नाही, पण...; मुख्यमंत्री ठाकरे स्पष्टच बोललेगेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे मुंबईत लॉकडाऊन होणार का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबद्दल महत्त्वाचं विधान केलं आहे. 'मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईत बाहेरुन येणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. परराज्यांमधून मुंबईत लोंढे येत असतात. सध्याच्या घडीला देशातील अनेक भागांमध्ये कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती बिघडू नये, यासाठी निर्बंध लादले गेले पाहिजेत,' असं वडेट्टीवार म्हणाले....म्हणून मी तुमच्यावर नाराज; मुख्यमंत्री ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनबद्दलही महत्त्वाचे संकेत दिले. 'मुंबई, पुणे, नागपूर आणि काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पुढील ८ दिवसांत परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतील. पुढील काही दिवस दर दिवशी किती रुग्ण आढळून येतात, त्याचा आढावा घेतला जाईल. मागच्या वेळेसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास त्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील,' असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी थेट लॉकडाऊनचा उल्लेख केलेला नसला, तरी मागच्याप्रमाणे निर्णय घ्यावे लागतील, असं म्हणत रेल्वे, विमानं सेवा बंद करण्याचा उल्लेख केला....तर आपल्याला कोरोनापासून कोणीही वाचवू शकणार नाही; मुख्यमंत्र्यांनी सांगितला पुढचा धोका 

मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल काय म्हणाले?पुन्हा 'लॉकडाऊन'च्या दिशेनं जायचं नसेल तर वेळीच सावध व्हा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना खबरदारीचा इशाराच दिला. कोरोनाची लस अजून आलेली नाही. त्यामुळे कोरोना संपला असं समजू नका. गर्दी वाढली की कोरोना वाढणार. त्यामुळे उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. अनेक जण मास्क वापरत नाहीत. काही ठिकाणी विनाकारण गर्दी होतोना दिसत आहे. ही ढिलाई परवडणारी नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.गेल्या अनेक महिन्यांपासून जनतेकडून मिळत असलेल्या सहकार्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. 'गेल्या आठ महिन्यांत अनेक सण येऊन गेले. मात्र आपण ते अतिशय साधेपणानं साजरे केले. गर्दी टाळली. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला. जनतेकडून मिळालेल्या या सहकार्याला तोड नाही. त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे. यापुढेही सर्वांकडून अशाच प्रकारचं सहकार्य मिळेल,' अशी आशा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस