शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:45 IST

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र आता महाविकास आघाडीचा भाग असलेल्या नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र निवडणुकीसाठी ही योजना आणली गेली असून निकालानंतर ती योजना बंद केली जाणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

"महायुती सरकारचे प्रत्येक योजनेमध्ये पैसे खाण्याचे काम  आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणांचे दुरुस्ती करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. सरकारकडे गेल्यावर सरकारने यामध्ये आमचा काय हिस्सा असं विचारलं. ते म्हणाले तुम्हाला २०० कोटी मिळतील ३०० कोटी कामांवर खर्च करावे लागतील. सरकारने ५०० जागी हजार कोटी वाढवण्यात सांगितले. महाराष्ट्र असा लुटला गेला. माहितीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये अहवाल येणार आहे. एखाद्या छोट्याशा प्रकल्पामध्ये हजार कोटी खाण्याची नियत महायुती सरकारची असेल तर सरकारची तिजोरी रिकामी होणारच," असं नाना पटोले म्हणाले.

"लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढली. खायचा तेलाच्या किमती ६० ते ७० रुपयांनी वाढल्या. म्हणून मी त्यांना बेईमान भाऊ म्हणत आहे. काँग्रेसने बहिणींना नेहमी सन्मान देण्याचे काम केलं आहे," असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

"आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहे. आम्ही महिलांना दीड हजार पेक्षा जास्त पैसे देऊ. हजार दीड हजार रुपयांनी काही संसार चालत नाही. मला महाराष्ट्रात रिसोर्सेस उभे करायचे आहेत. त्यातून बहिणीच्या हाताला आम्ही काम देऊ. गृह उद्योग निर्माण करून देऊ. माझी बहीण स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे. तिला गावामध्ये रोजगार निर्माण करून देण्याचा आमचा प्लॅन आहे. बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करण्याचे स्वप्न आहे म्हणूनच आम्ही या योजनेचे नाव महालक्ष्मी ठेवतो आहोत," असंही नाना पटोले म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस