शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

लाडकी बहीण योजना सुरु ठेवणार का? नाना पटोले म्हणाले, "बहिणीला पायावर उभं करण्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 17:45 IST

लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

Mukhyamantri Ladki Bahin Yojana: महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरुच आहे. महाविकास आघाडीचे नेते सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे महायुतीच्या नेत्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलं होतं. मात्र आता महाविकास आघाडीचा भाग असलेल्या नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेद्वारे लाभार्थी महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येत आहेत. मात्र निवडणुकीसाठी ही योजना आणली गेली असून निकालानंतर ती योजना बंद केली जाणार असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता. पण आता एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठं विधान केलं आहे.

"महायुती सरकारचे प्रत्येक योजनेमध्ये पैसे खाण्याचे काम  आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणांचे दुरुस्ती करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार होता. सरकारकडे गेल्यावर सरकारने यामध्ये आमचा काय हिस्सा असं विचारलं. ते म्हणाले तुम्हाला २०० कोटी मिळतील ३०० कोटी कामांवर खर्च करावे लागतील. सरकारने ५०० जागी हजार कोटी वाढवण्यात सांगितले. महाराष्ट्र असा लुटला गेला. माहितीचे सरकार भ्रष्टाचारामध्ये अहवाल येणार आहे. एखाद्या छोट्याशा प्रकल्पामध्ये हजार कोटी खाण्याची नियत महायुती सरकारची असेल तर सरकारची तिजोरी रिकामी होणारच," असं नाना पटोले म्हणाले.

"लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महागाई खूप वाढली. खायचा तेलाच्या किमती ६० ते ७० रुपयांनी वाढल्या. म्हणून मी त्यांना बेईमान भाऊ म्हणत आहे. काँग्रेसने बहिणींना नेहमी सन्मान देण्याचे काम केलं आहे," असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं.

"आमचं सरकार आल्यानंतर आम्ही महालक्ष्मी योजना आणणार आहे. आम्ही महिलांना दीड हजार पेक्षा जास्त पैसे देऊ. हजार दीड हजार रुपयांनी काही संसार चालत नाही. मला महाराष्ट्रात रिसोर्सेस उभे करायचे आहेत. त्यातून बहिणीच्या हाताला आम्ही काम देऊ. गृह उद्योग निर्माण करून देऊ. माझी बहीण स्वतःच्या पायावर उभी राहू शकली पाहिजे. तिला गावामध्ये रोजगार निर्माण करून देण्याचा आमचा प्लॅन आहे. बहिणीला स्वतःच्या पायावर उभं करण्याचे स्वप्न आहे म्हणूनच आम्ही या योजनेचे नाव महालक्ष्मी ठेवतो आहोत," असंही नाना पटोले म्हणाले.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस