शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

बॉलिवूड स्टार अक्षयकुमार राजकारणात?; नव्या मैदानात उतरण्याचे ट्विटरवरून संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 14:09 IST

लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेते, अभिनेत्रींना राजकारणाचे वेध लागलेले आहेत. उर्मिला मातोंडकरने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेतली.

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये अभिनेते, अभिनेत्रींना राजकारणाचे वेध लागलेले आहेत. उर्मिला मातोंडकरने नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश करत उमेदवारीची माळ गळ्यात घालून घेतली. आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारदेखील राजकीय क्षेत्रात नशीब आजमावणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अक्षयने काही तासांपूर्वीच एक कोड्यात टाकणारे ट्विट केल्याने या चर्चा झडत आहेत. मात्र, अक्षयनेच या चर्चांना पूर्णविराम देत आपण निवडणूक लढवणार नसल्याचे ट्विट केले आहे. 

अक्षय कुमारने केलेल्या ट्विटमध्ये, 'आज एका अनोळखी आणि अलिखित क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे. जे याआधी कधी केले नाही ते करणार आहे. उत्सुक आणि निराशही आहे. संपर्कात रहा.' असे म्हटले आहे. या त्याच्या ट्विटवरून अक्षयकुमार त्याच्यासाठी नव्या असलेल्या एखाद्या क्षेत्रामध्ये प्रवेश करणार आहे, हे नक्की. तसेच आजवर त्याने जी गोष्ट केली नसेल ती गोष्ट तो करणार आहे. महत्वाचे म्हणजे हे क्षेत्र अस्थिरही असेल. म्हणजेच या क्षेत्रातील भवितव्याबाबत कोणीत काही सांगू शकत नाही. असे कोणते क्षेत्र असेल? राजकारण तर नाही ना... नाही. 

अक्षयकुमारचा दानशूरपणा आणि त्याचे स्टारडम तर सर्वांनाच माहिती आहे. याचा वापर कोणताही पक्ष करण्याचा विचार करू शकतो. सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. आणि काँग्रेस, भाजपासारख्या पक्षांना असेच स्टारडम असलेले चेहरे हवे आहेत. यामुळे अक्षयच्या या ट्विटनंतर लगेचच तो भाजपामध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतांवर चर्चा होऊ लागली होती. यावर अक्षयकुमारने चार तासांनी खुलासा करत राजकारणात जाणार असल्याची अफवा असल्याचे म्हटले आहे. 

माझ्या मागच्या ट्विटला चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. पण मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही., असे त्याने ट्विट केले आहे. 

अक्षयकुमार भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून अक्षयला भाजपा उमेदवारी देऊ शकते. गेल्यावर्षी झालेल्या पंजाबमधील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा-अकाली दलाला सत्ता गमवावी लागली होती. यामुळे अक्षय कुमार भाजपात आल्यास त्याच्या स्टारडमचा पंजाबमधील जागांवर फायदा होऊ शकतो. यामुळे अक्षयच्या भाजपा उमेदवारीवर चर्चा होत होती. मात्र, ही अफवा ठरली आहे. 

  

टॅग्स :Akshay Kumarअक्षय कुमारBJPभाजपाPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक 2019