शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

अजित पवारांना महाविकास आघाडीत उपमुख्यमंत्रिपद का दिलं?; जयंत पाटलांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 14:08 IST

राजकारणात काही गोष्टी होत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात असं जयंत पाटील म्हणाले.

मुंबई - राज्याच्या राजकारणात २०१९ च्या निवडणूक निकालानंतर मोठी घडामोड घडली. या निवडणुकीत एकत्र लढलेले भाजपा-शिवसेना युतीला जनतेने बहुमत दिले होते. परंतु मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षाचे बिनसले. त्यानंतर काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यात अचानक पहाटे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात राज्यात पहाटेचा शपथविधी सोहळा पार पाडत सगळ्यांनाच धक्का दिला. 

अजित पवार यांनी पहाटेचा शपथविधी कुणाच्या सांगण्यावरून केला? की अजितदादा स्वमर्जीने देवेंद्र फडणवीसांसोबत गेले याबाबत अनेक प्रश्न आजही कायम आहेत. मात्र अजित पवार यांनी ७२ तासांच्या सरकारमधून बाहेर पडत महाविकास आघाडीत पुन्हा परतले आणि त्यांना पुन्हा उपमुख्यमंत्रिपद मिळाले हे का याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. 

जयंत पाटील म्हणाले की, पहाटेचा शपथविधी मी टीव्हीवर पाहिला. उद्धव ठाकरेंनी मला फोन केला तेव्हा मी झोपेत होतो. राजकारणात काही गोष्टी होत असतात. सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची नसतात. अजित पवार आमच्या पक्षाचे नेते आहे. काम करण्याचा अनुभव आहे. आक्रमक आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला त्यांची गरज आहे. ते पुन्हा पक्षात आले तेव्हा सगळ्यांनी बसून सर्व समस्यांचे निरसन केले. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री बनवले असं त्यांनी खुलासा केला. 

त्याचसोबत अजित पवार यांनी असं का केले हे सांगण्याची गरज नाही. आम्ही सर्व एकत्रित बसलो. पवारसाहेबांनी तो निर्णय घेतला. आमच्या सगळ्यांच्या वतीने अजित पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले. काही प्रश्नांची उत्तरे शोधायची नाहीत असंही जयंत पाटील म्हणाले. तर पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा मलाही शॉक बसला. मी जयंत पाटलांना फोन केला हा शपथविधी पक्षाचा आहे का? असं विचारले अशी आठवण काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सांगितली. 

अजित पवार भाजपात जाण्याची चर्चाअलीकडच्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपासोबत जातील अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यात अंजली दमानिया यांनी १५ आमदारांसह अजित पवार भाजपात जाणार असा दावा केला होता. त्यावर अंजली दमानिया मोठ्या नेत्या आहेत, मी छोटा कार्यकर्ता आहे अशी खोचक प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील